शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

म्हैसाळ, ताकारीला एआयबीपीतून निधी

By admin | Updated: April 2, 2016 00:08 IST

संजयकाका पाटील : सांगली-कोल्हापूर रस्त्याला टोल लागणार नाही

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ व ताकारी सिंचन योजनेला वेगवर्धित सिंचन योजनेतून (एआयबीपी) निधी मिळणार असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. सांगली-कोल्हापूर रस्त्याचे काम दर्जाहिन झाले असल्याने या रस्त्याला टोल लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. खा. पाटील म्हणाले की, केंद्र शासनाने एआयबीपी योजना बंद केलेली नाही. या योजनेतून म्हैसाळ व ताकारी योजनेच्या निधीचा प्रस्ताव दिला होता. त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे. टेंभू योजनेचे पाणी नागज (ता. कवठेमहांकाळ) ओढ्यात सोडले जाणार आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत पाणी ओढ्यात येईल. त्यामुळे नागज परिसरातील १७ गावांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सांगली - कोल्हापूर रस्त्याच्या टोलबाबत पाटील म्हणाले की, या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे नागरिकांवर टोलचे भूत बसणार नाही. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत योग्यवेळी निर्णय होईल. गेल्या वर्षभरात शासकीय निधी व खासदार विकास निधीतून जिल्ह्यात कोट्यवधीची कामे मंजूर झाली आहेत. बेदाणा, हळद, गूळ, मिरचीवरील व्हॅट रद्द करण्यात यश आले. मालेगाव-मनमाड-दौंड हा मार्ग मिरजेतून बेळगावला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रियेची काम सुरू आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्ग मिरजेतून जाणार आहे. त्यासाठी मिरजेत उड्डाणपुलाचा प्रस्ताव दिला आहे. पर्यटन विभागातून शुकाचार्य, औदुंबर, सागरेश्वर, हरिपूर, महांकाली देवस्थानसाठी ३ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद घोटाळ्याची चौकशीजिल्हा परिषदेच्या विविध विभागात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या घोटाळ्यातील दोषींची चौकशी होऊन कारवाई होणार आहे, असे सांगत जिल्हा परिषदेला नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी लवकरच नियुक्त केला जाईल. विधिमंडळ अधिवेशनानंतर सीईओ देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.