शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

सदाभाऊंच्या शिष्टाईला फळे व्यापाऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 01:02 IST

भाजीपाला, कांदा-बटाटा सौदे सुरळीत : दरांत मात्र २५ टक्क्यांचा तडाखा

कोल्हापूर : पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी (दि. १५) दिवसभर बैठका घेऊन अडतीबाबत केलेल्या शिष्टाईला फळे व्यापाऱ्यांनी ठेंगा दाखविला. व्यापारी आपल्या भूमिकेवर अडून बसल्याने शनिवारी फळबाजारातील सौदे होऊ शकले नाहीत. भाजीपाला, कांदा-बटाट्याचे सौदे सुरळीत झाले; पण दरांत शेतकऱ्यांना सरासरी २५ टक्क्यांचा तडाखा बसल्याने चार दिवस बाजारामध्ये थांबूनही घरी जाताना मात्र मोकळे गोणपाट घेऊन जाण्याची वेळच त्यांच्यावर आली. सरकारने भाजीपाला, फळे नियमनमुक्त केली. त्याचबरोबर ती अडत खरेदीदारांकडून घेण्याबाबत निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांबरोबर सरकारलाही वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर तोडगा काढण्यासाठी समिती नेमली असून ६ आॅगस्टपर्यंत ती आपला अहवाल देणार आहे. शुक्रवारी सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी यांनी व्यापारी, शेतकरी, समिती प्रशासन यांच्याशी चर्चा करून सौदे पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले होते. सौदे सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री खोत यांना दिले होते. त्यानुसार भाजीपाला, कांदा-बटाटा बाजारपेठ सुरू झाली. फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सौद्यांसाठी माल बाहेर काढला; पण सौदे होऊ शकले नाहीत. त्यानंतर अडते व खरेदीदार यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले. भाजीपाला, कांदा-बटाटा बाजारपेठ सुरू झाली; पण दरांत दणका बसला. कांद्याच्या दरात ३० ते ४० टक्के, तर भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३० टक्के घसरण झाली. अडत व्यापाऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल होणार असल्याने व्यापाऱ्यांनी दराच्या रूपाने त्याचा झटका शेतकऱ्यांना दिल्याची चर्चा बाजार समितीत सुरू आहे. (प्रतिनिधी)कांद्याच्या सौद्यात वाद!कांदा-बटाटा सौद्यांत दर पाडल्याचे कारण पुढे करीत शेतकऱ्यांनी काही काळ सौदे बंद पाडले. यावेळी शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद सुरू झाला; पण सहायक सचिव मोहन सालपे व विभागप्रमुखांनी मध्यस्थी करीत सौदे पूर्ववत सुरू केले. व्यापारी नेत्यांच्या कुरघोड्यागेले पाच दिवस बाजारपेठ बंद असल्याने खुद्द पणन राज्यमंत्री बाजार समितीत येऊन सौदे सुरू करण्याचा प्रयत्न करतात; पण दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांचे नेते मात्र श्रेयवाद व कुरघोडीच्या राजकारणात गुंतल्याने पेच निर्माण झाला आहे. शनिवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सौदे सुरू झाले; पण भाज्यांचे दर कवडीमोल ठरले. प्रतिकिलोचे दर असे -४कांदा- ८.५०, कोबी- २०, वांगी- १७, टोमॅटो- १५, गवार- २५, भेंडी- १५, काकडी- ७. कोथिंबीर- २ (पेंढी), पालक, पोकळा, मेथी- ३ रुपये पेंढी. अखेर शेतकऱ्यांच्या पट्टीतून ‘अडत’ गायब झाले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी बाबूराव लाड यांच्या दुकानातील एका शेतकऱ्याची अडतीशिवाय काढलेली पट्टी.