शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

सदाभाऊंच्या शिष्टाईला फळे व्यापाऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 01:02 IST

भाजीपाला, कांदा-बटाटा सौदे सुरळीत : दरांत मात्र २५ टक्क्यांचा तडाखा

कोल्हापूर : पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी (दि. १५) दिवसभर बैठका घेऊन अडतीबाबत केलेल्या शिष्टाईला फळे व्यापाऱ्यांनी ठेंगा दाखविला. व्यापारी आपल्या भूमिकेवर अडून बसल्याने शनिवारी फळबाजारातील सौदे होऊ शकले नाहीत. भाजीपाला, कांदा-बटाट्याचे सौदे सुरळीत झाले; पण दरांत शेतकऱ्यांना सरासरी २५ टक्क्यांचा तडाखा बसल्याने चार दिवस बाजारामध्ये थांबूनही घरी जाताना मात्र मोकळे गोणपाट घेऊन जाण्याची वेळच त्यांच्यावर आली. सरकारने भाजीपाला, फळे नियमनमुक्त केली. त्याचबरोबर ती अडत खरेदीदारांकडून घेण्याबाबत निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांबरोबर सरकारलाही वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर तोडगा काढण्यासाठी समिती नेमली असून ६ आॅगस्टपर्यंत ती आपला अहवाल देणार आहे. शुक्रवारी सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी यांनी व्यापारी, शेतकरी, समिती प्रशासन यांच्याशी चर्चा करून सौदे पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले होते. सौदे सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री खोत यांना दिले होते. त्यानुसार भाजीपाला, कांदा-बटाटा बाजारपेठ सुरू झाली. फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सौद्यांसाठी माल बाहेर काढला; पण सौदे होऊ शकले नाहीत. त्यानंतर अडते व खरेदीदार यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले. भाजीपाला, कांदा-बटाटा बाजारपेठ सुरू झाली; पण दरांत दणका बसला. कांद्याच्या दरात ३० ते ४० टक्के, तर भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३० टक्के घसरण झाली. अडत व्यापाऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल होणार असल्याने व्यापाऱ्यांनी दराच्या रूपाने त्याचा झटका शेतकऱ्यांना दिल्याची चर्चा बाजार समितीत सुरू आहे. (प्रतिनिधी)कांद्याच्या सौद्यात वाद!कांदा-बटाटा सौद्यांत दर पाडल्याचे कारण पुढे करीत शेतकऱ्यांनी काही काळ सौदे बंद पाडले. यावेळी शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद सुरू झाला; पण सहायक सचिव मोहन सालपे व विभागप्रमुखांनी मध्यस्थी करीत सौदे पूर्ववत सुरू केले. व्यापारी नेत्यांच्या कुरघोड्यागेले पाच दिवस बाजारपेठ बंद असल्याने खुद्द पणन राज्यमंत्री बाजार समितीत येऊन सौदे सुरू करण्याचा प्रयत्न करतात; पण दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांचे नेते मात्र श्रेयवाद व कुरघोडीच्या राजकारणात गुंतल्याने पेच निर्माण झाला आहे. शनिवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सौदे सुरू झाले; पण भाज्यांचे दर कवडीमोल ठरले. प्रतिकिलोचे दर असे -४कांदा- ८.५०, कोबी- २०, वांगी- १७, टोमॅटो- १५, गवार- २५, भेंडी- १५, काकडी- ७. कोथिंबीर- २ (पेंढी), पालक, पोकळा, मेथी- ३ रुपये पेंढी. अखेर शेतकऱ्यांच्या पट्टीतून ‘अडत’ गायब झाले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी बाबूराव लाड यांच्या दुकानातील एका शेतकऱ्याची अडतीशिवाय काढलेली पट्टी.