शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सदाभाऊंच्या शिष्टाईला फळे व्यापाऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 01:02 IST

भाजीपाला, कांदा-बटाटा सौदे सुरळीत : दरांत मात्र २५ टक्क्यांचा तडाखा

कोल्हापूर : पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी (दि. १५) दिवसभर बैठका घेऊन अडतीबाबत केलेल्या शिष्टाईला फळे व्यापाऱ्यांनी ठेंगा दाखविला. व्यापारी आपल्या भूमिकेवर अडून बसल्याने शनिवारी फळबाजारातील सौदे होऊ शकले नाहीत. भाजीपाला, कांदा-बटाट्याचे सौदे सुरळीत झाले; पण दरांत शेतकऱ्यांना सरासरी २५ टक्क्यांचा तडाखा बसल्याने चार दिवस बाजारामध्ये थांबूनही घरी जाताना मात्र मोकळे गोणपाट घेऊन जाण्याची वेळच त्यांच्यावर आली. सरकारने भाजीपाला, फळे नियमनमुक्त केली. त्याचबरोबर ती अडत खरेदीदारांकडून घेण्याबाबत निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांबरोबर सरकारलाही वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर तोडगा काढण्यासाठी समिती नेमली असून ६ आॅगस्टपर्यंत ती आपला अहवाल देणार आहे. शुक्रवारी सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी यांनी व्यापारी, शेतकरी, समिती प्रशासन यांच्याशी चर्चा करून सौदे पूर्ववत सुरू करण्याचे आवाहन केले होते. सौदे सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री खोत यांना दिले होते. त्यानुसार भाजीपाला, कांदा-बटाटा बाजारपेठ सुरू झाली. फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सौद्यांसाठी माल बाहेर काढला; पण सौदे होऊ शकले नाहीत. त्यानंतर अडते व खरेदीदार यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले. भाजीपाला, कांदा-बटाटा बाजारपेठ सुरू झाली; पण दरांत दणका बसला. कांद्याच्या दरात ३० ते ४० टक्के, तर भाजीपाल्याच्या दरात २५ ते ३० टक्के घसरण झाली. अडत व्यापाऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल होणार असल्याने व्यापाऱ्यांनी दराच्या रूपाने त्याचा झटका शेतकऱ्यांना दिल्याची चर्चा बाजार समितीत सुरू आहे. (प्रतिनिधी)कांद्याच्या सौद्यात वाद!कांदा-बटाटा सौद्यांत दर पाडल्याचे कारण पुढे करीत शेतकऱ्यांनी काही काळ सौदे बंद पाडले. यावेळी शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद सुरू झाला; पण सहायक सचिव मोहन सालपे व विभागप्रमुखांनी मध्यस्थी करीत सौदे पूर्ववत सुरू केले. व्यापारी नेत्यांच्या कुरघोड्यागेले पाच दिवस बाजारपेठ बंद असल्याने खुद्द पणन राज्यमंत्री बाजार समितीत येऊन सौदे सुरू करण्याचा प्रयत्न करतात; पण दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांचे नेते मात्र श्रेयवाद व कुरघोडीच्या राजकारणात गुंतल्याने पेच निर्माण झाला आहे. शनिवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सौदे सुरू झाले; पण भाज्यांचे दर कवडीमोल ठरले. प्रतिकिलोचे दर असे -४कांदा- ८.५०, कोबी- २०, वांगी- १७, टोमॅटो- १५, गवार- २५, भेंडी- १५, काकडी- ७. कोथिंबीर- २ (पेंढी), पालक, पोकळा, मेथी- ३ रुपये पेंढी. अखेर शेतकऱ्यांच्या पट्टीतून ‘अडत’ गायब झाले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी बाबूराव लाड यांच्या दुकानातील एका शेतकऱ्याची अडतीशिवाय काढलेली पट्टी.