शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

‘एफआरपी’साठी कारखान्यांना सूट!

By admin | Updated: November 26, 2015 00:09 IST

खरेदी कर माफ : मुख्यमंत्र्यांची घोषणा; कऱ्हाडात कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

कऱ्हाड : ‘एफआरपी’ची रक्कम एकरकमी मिळणार का, याची उत्कंठा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजे, अशी सरकारचीही भूमिका आहे. मात्र, साखरेचे भाव कमी असल्याने कारखानदारांसमोरही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांना मदत व्हावी म्हणून गतवर्षीप्रमाणे यावर्षीही साखर कारखानदारांना सूट देण्यात येणार असून, खरेदी कर माफ करणार आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील होते. सहकार, जलसंधारणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी, नागरी आरोग्य, पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार शंभूराज देसाई, आमदार नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, अ‍ॅड. उदय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनोज घोरपडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात गतवर्षी २४ हजार गावांमध्ये दुष्काळ होता, तर यावर्षी १५ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी उसाला एकरकमी एफआरपी मिळावा, ही मागणी करीत आहे, तर दुसरीकडे कारखान्यांकडूनही अनुदानाची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही सातशे कोटी रुपयांची मदत देणार आहोत. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देण्यात आघाडीवर आहे. नव्वद टक्के उसाचे एफआरपी बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.’ जयंत पाटील म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आज पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी कोयना धरणात पाणी साठा कमी असल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. जर ऊस उत्पादीतच झाला नाही तर कारखाने चालणार कसे आणि कारखान्यापेक्षा शेतकरी महत्त्वाचे आहेत.’ सहकारमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेत तशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांचा अपघात विमा दिला जाणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त करावयाचा आहे. राज्यातील साडेसहा हजार गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविणार आहे.’ ( प्रतिनिधी)एका वानराने केली धमाल !कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनस्थळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर या पशु-पक्षी प्रदर्शनात चक्क एका वानराने हजेरी लावली. हे वानर चक्क व्यासपीठासमोरील ‘डी’ झोनमध्ये फिरू लागले. ते व्यासपीठावर जाते की काय या धास्तीने पोलीस हतबल झाले होते; पण त्यातील एका कर्मचाऱ्याने शक्कल लढविली. कोठून तरी एक पाव आणला आणि तो पाव बाजूला ठेवताच माकड ‘डी’ झोनमधून गेले खरे, मात्र नजीकच्या शेजारच्या एका झाडावर बसून त्याने मन लावून सर्वांची भाषणे ऐकली.