शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’साठी कारखान्यांना सूट!

By admin | Updated: November 26, 2015 00:09 IST

खरेदी कर माफ : मुख्यमंत्र्यांची घोषणा; कऱ्हाडात कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

कऱ्हाड : ‘एफआरपी’ची रक्कम एकरकमी मिळणार का, याची उत्कंठा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजे, अशी सरकारचीही भूमिका आहे. मात्र, साखरेचे भाव कमी असल्याने कारखानदारांसमोरही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांना मदत व्हावी म्हणून गतवर्षीप्रमाणे यावर्षीही साखर कारखानदारांना सूट देण्यात येणार असून, खरेदी कर माफ करणार आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील होते. सहकार, जलसंधारणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी, नागरी आरोग्य, पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार शंभूराज देसाई, आमदार नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, अ‍ॅड. उदय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनोज घोरपडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात गतवर्षी २४ हजार गावांमध्ये दुष्काळ होता, तर यावर्षी १५ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी उसाला एकरकमी एफआरपी मिळावा, ही मागणी करीत आहे, तर दुसरीकडे कारखान्यांकडूनही अनुदानाची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही सातशे कोटी रुपयांची मदत देणार आहोत. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देण्यात आघाडीवर आहे. नव्वद टक्के उसाचे एफआरपी बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.’ जयंत पाटील म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आज पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी कोयना धरणात पाणी साठा कमी असल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. जर ऊस उत्पादीतच झाला नाही तर कारखाने चालणार कसे आणि कारखान्यापेक्षा शेतकरी महत्त्वाचे आहेत.’ सहकारमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेत तशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांचा अपघात विमा दिला जाणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त करावयाचा आहे. राज्यातील साडेसहा हजार गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविणार आहे.’ ( प्रतिनिधी)एका वानराने केली धमाल !कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनस्थळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर या पशु-पक्षी प्रदर्शनात चक्क एका वानराने हजेरी लावली. हे वानर चक्क व्यासपीठासमोरील ‘डी’ झोनमध्ये फिरू लागले. ते व्यासपीठावर जाते की काय या धास्तीने पोलीस हतबल झाले होते; पण त्यातील एका कर्मचाऱ्याने शक्कल लढविली. कोठून तरी एक पाव आणला आणि तो पाव बाजूला ठेवताच माकड ‘डी’ झोनमधून गेले खरे, मात्र नजीकच्या शेजारच्या एका झाडावर बसून त्याने मन लावून सर्वांची भाषणे ऐकली.