शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजे

By admin | Updated: October 23, 2016 00:35 IST

संजय कोले : साखरेचे पैसे शेतकऱ्यांना, उपपदार्थांत कारखान्याचा खर्च भागवा

सांगली : काही संघटनांनी उसाच्या एफआरपीचे (रास्त आणि किफायतशीर किंमत) तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. ही चूक या हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी द्यावी. जे कारखाने एफआरपी एकरकमी देणार नाहीत, त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. एफआरपी दिल्यानंतर उर्वरित दुसरा हप्ता कारखान्याने उपपदार्थांची विक्री केल्यानंतर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.ते म्हणाले की, मागील हंगामामध्ये साखरेचे दर कमी झाले होते. यामुळे एफआरपी दोन टप्प्यामध्ये घेतली होती. सध्या साखरेचे दर प्रतिक्विंटल ३३०० ते ३५०० रुपये आहेत. भविष्यातही हा दर नियमित राहण्याची शक्यता आहे. यामुळे या हंगामामध्ये एफआरपीचे तुकडे कदापी पाडू देणार नाही. कायद्यानुसारच एफआरपीची रक्कम एकरकमी मिळाली पाहिजे. डॉ. सी. रंगराजन समितीनेही शेतकऱ्यांना एकरकमीच एफआरपी देण्याची सूचना केली आहे. या प्रश्नावर आम्ही आंदोलन करणार आहोत. ते म्हणाले की, साखरेचे सध्याचे दर आणि जिल्ह्यातील कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यानुसार उसाला २२०० ते २८०० रुपये एफआरपी होणार आहे. एफआरपी दिल्यानंतर उर्वरित रक्कम उपपदार्थांची विक्री झाल्यानंतर द्यावी. कारखान्यांना हे अवघड वाटत असेल, तर गुजरातमधील कारखान्यांच्या धर्तीवर साखरेचे सर्व पैसे शेतकऱ्यांना देऊन उपपदार्थांवर कारखान्यांनी त्यांचा खर्च भागवावा.एक टनाचे गणितएक टन उसापासून सरासरी १२० किलो साखर तयार होते. १२० किलो साखरेला ३५ रुपये किलो दर मिळाल्यास ४२०० रुपये रक्कम कारखान्यांकडे येते. तोडणी आणि वाहतूक, अबकारी कर, शासनाचा अधिभार हा सर्व खर्च १४०० रुपये येतो. सर्व खर्च वजा जाता उसाला प्रतिटन २८०० रुपये दर देण्यात काहीच अडचण नाही. याशिवाय, वीज, बगॅस, मोलॅसीस आदी उपपदार्थांपासून प्रतिटन उसापासून किमान ५०० रुपये मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षीच्या हंगामामध्ये प्रतिटन ३२०० रुपये अंतिम दर मिळाला पाहिजे, अशी मागणी संजय कोले यांनी केली.