शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’प्रश्नी ‘स्वाभिमानी’ आक्रमक

By admin | Updated: May 22, 2015 00:09 IST

ठिकठिकाणी आंदोलने : दहा दिवसांत बिले अदा न केल्यास पुन्हा उग्र आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : २०१४-१५ च्या चालू गळीत हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे थकीत ऊस बिले जिल्ह्यातील सर्व कारखान्यांकडून त्वरित मिळावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी चांगलीच आक्रमक बनली. संघटनेच्या वतीने तालुक्यांच्या ठिकाणी धरणे, निदर्शने व ठिय्या आंदोलने करण्यात आली.शिरोळ येथे धरणे आंदोलनशिरोळ : २०१४-१५ च्या चालू गळीत हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे थकीत ऊस बिले त्वरित मिळावीत, या मागणीसाठी गुरुवारी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ज्या कारखान्यांनी बिले दिली नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन गिरी यांना देण्यात आले. दहा दिवसांत थकीत बिले अदा केली नाहीत, तर ‘स्वाभिमानी’च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४-१५ चा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरी उसाची थकीत बिले साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. आंदोलनात जिल्हा परिषदेचे सदस्य सावकर मादनाईक, सुरेश कांबळे, आण्णासाहेब चौगुले, सुवर्णा अपराज, बंडू पाटील, महेश पाटील, रामचंद्र फुलारे, सीमा पाटील, शीला पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.करवीर तहसीलसमोर आंदोलनकोल्हापूर : करवीर तालुक्यातील भोगावती, कुंभी, राजाराम या साखर कारखान्यांनी उसाचे गाळप होऊन दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. याविरोधात गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करवीर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. येत्या दहा दिवसांत कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सरचिटणीस जनार्दन पाटील, विलास पाटील, विक्रम पाटील, संभाजी कोळी, आदी उपस्थित होते. हातकणंगलेत उपोषणहातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे ्नगुरूवारी लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमोद कदम, अरुण मगदूम, संतोष जाधव, वैभव कांबळे, सुरेश पाटील, शिवाजी माने, डॉ. विनोद चौगुले, रामराव पाटील, सत्त्वशिल जाधव, धनाजी पाटील, सुनील देसाई, यांसह स्वाभिमानी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.शाहूवाडी तहसीलसमोर ठिय्यामलकापूर : आधारभूत (एफआरपी) प्रमाणे ऊस उत्पादकांची बिले वेळेवर द्यावीत, या मागणीसाठी शाहूवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात वसंत पाटील, भीमराव पाटील, शामराव पाटील, आदींसह शेतकरी सामील झाले होते.चंदगडमध्ये लाक्षणिक धरणेचंदगड : चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथील हेमरस व म्हाळुंगे येथील इको-केन शुगर्स या कारखान्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे पहिली उचल न दिल्याच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, उपाध्यक्ष जगन्नाथ हुलजी, जोतिबा पाटील, आदी उपस्थित होते. भुदगरड तहसिलसमोर उपोषणगारगोटी : साखर कारखान्यांनी या वषार्तील ऊस बिले एफ.आर.पी.प्रमाणे आजतागायत वेळेत न दिल्याबद्दल एक दिवसीय लाक्षणिक उपोषण भुदरगड तहसिल समोर करण्यात आले. तालुकाध्यक्ष नितीन पोवार व जिल्हा सरचिटणीस एकनाथ जठार यांच्या पुढाकाराने गुरुवारीकरण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात संभाजी देसाई, विश्वास पाटील, मायका डिसोझा, निवृत्ती मिसाळ, ईश्वरा आरडे, दशरथ पाटील, नामदेव भाटले व शेतकरी वर्ग सहभागी झाला होता.राधानगरीत निदर्शने‘एफआरपी’ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांची उसाची थकीत बिले तत्काळ देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याबाबत कार्यवाही न झाल्यास शेतकरी हिंसक व उग्र आंदोलन करतील, असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, पंचायत समितीचे सदस्य अजित पोवार, मालोजी जाधव यांनी केले.