शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’प्रश्नी ‘स्वाभिमानी’ आक्रमक

By admin | Updated: May 22, 2015 00:09 IST

ठिकठिकाणी आंदोलने : दहा दिवसांत बिले अदा न केल्यास पुन्हा उग्र आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : २०१४-१५ च्या चालू गळीत हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे थकीत ऊस बिले जिल्ह्यातील सर्व कारखान्यांकडून त्वरित मिळावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गुरुवारी चांगलीच आक्रमक बनली. संघटनेच्या वतीने तालुक्यांच्या ठिकाणी धरणे, निदर्शने व ठिय्या आंदोलने करण्यात आली.शिरोळ येथे धरणे आंदोलनशिरोळ : २०१४-१५ च्या चालू गळीत हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे थकीत ऊस बिले त्वरित मिळावीत, या मागणीसाठी गुरुवारी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ज्या कारखान्यांनी बिले दिली नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदार सचिन गिरी यांना देण्यात आले. दहा दिवसांत थकीत बिले अदा केली नाहीत, तर ‘स्वाभिमानी’च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४-१५ चा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरी उसाची थकीत बिले साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. आंदोलनात जिल्हा परिषदेचे सदस्य सावकर मादनाईक, सुरेश कांबळे, आण्णासाहेब चौगुले, सुवर्णा अपराज, बंडू पाटील, महेश पाटील, रामचंद्र फुलारे, सीमा पाटील, शीला पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.करवीर तहसीलसमोर आंदोलनकोल्हापूर : करवीर तालुक्यातील भोगावती, कुंभी, राजाराम या साखर कारखान्यांनी उसाचे गाळप होऊन दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत. याविरोधात गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करवीर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. येत्या दहा दिवसांत कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सरचिटणीस जनार्दन पाटील, विलास पाटील, विक्रम पाटील, संभाजी कोळी, आदी उपस्थित होते. हातकणंगलेत उपोषणहातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे ्नगुरूवारी लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमोद कदम, अरुण मगदूम, संतोष जाधव, वैभव कांबळे, सुरेश पाटील, शिवाजी माने, डॉ. विनोद चौगुले, रामराव पाटील, सत्त्वशिल जाधव, धनाजी पाटील, सुनील देसाई, यांसह स्वाभिमानी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.शाहूवाडी तहसीलसमोर ठिय्यामलकापूर : आधारभूत (एफआरपी) प्रमाणे ऊस उत्पादकांची बिले वेळेवर द्यावीत, या मागणीसाठी शाहूवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात वसंत पाटील, भीमराव पाटील, शामराव पाटील, आदींसह शेतकरी सामील झाले होते.चंदगडमध्ये लाक्षणिक धरणेचंदगड : चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथील हेमरस व म्हाळुंगे येथील इको-केन शुगर्स या कारखान्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे पहिली उचल न दिल्याच्या निषेधार्थ येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, उपाध्यक्ष जगन्नाथ हुलजी, जोतिबा पाटील, आदी उपस्थित होते. भुदगरड तहसिलसमोर उपोषणगारगोटी : साखर कारखान्यांनी या वषार्तील ऊस बिले एफ.आर.पी.प्रमाणे आजतागायत वेळेत न दिल्याबद्दल एक दिवसीय लाक्षणिक उपोषण भुदरगड तहसिल समोर करण्यात आले. तालुकाध्यक्ष नितीन पोवार व जिल्हा सरचिटणीस एकनाथ जठार यांच्या पुढाकाराने गुरुवारीकरण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात संभाजी देसाई, विश्वास पाटील, मायका डिसोझा, निवृत्ती मिसाळ, ईश्वरा आरडे, दशरथ पाटील, नामदेव भाटले व शेतकरी वर्ग सहभागी झाला होता.राधानगरीत निदर्शने‘एफआरपी’ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांची उसाची थकीत बिले तत्काळ देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. याबाबत कार्यवाही न झाल्यास शेतकरी हिंसक व उग्र आंदोलन करतील, असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, पंचायत समितीचे सदस्य अजित पोवार, मालोजी जाधव यांनी केले.