शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
2
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, कोणी पटकावला प्रथम क्रमांक?
3
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
4
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
5
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
6
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
7
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
8
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
9
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
10
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
11
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
12
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
13
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

‘एफआरपी’चे तुकडे चालणार नाहीतच; राजू शेट्टींनी कारखानदारांना ठणकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:48 AM

कोल्हापूर : कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. तुकडे करून दिलेले पैसे शेतकऱ्यांच्या हाताला लागत नसल्याने तुकड्यांची भाषा चालणार ...

कोल्हापूर : कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. तुकडे करून दिलेले पैसे शेतकऱ्यांच्या हाताला लागत नसल्याने तुकड्यांची भाषा चालणार नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना ठणकावून सांगितले. साखरेचे दर घसरल्याने ‘एफआरपी’तील ८० टक्के रक्कम पहिल्या उचलीच्या स्वरूपात देण्याचा प्रस्ताव कारखानदारांनी शेट्टी यांच्यासमोर ठेवला होता.साखरेच्या दरात झालेली घसरण आणि बॅँकांकडून मिळणारी उचल पाहता, एकरकमी एफआरपी देणे अशक्य असल्याचे कारखानदारांचे मत आहे. त्यामुळे सरकारने मदत करण्याबरोबरच एफआरपी दोन टप्प्यांत देण्यासाठी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने अनुमती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करण्यासाठी कारखानदारांनी चौघांची समिती स्थापन केली आहे. त्यांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली. रविवारी सकाळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रा. संजय मंडलिक, गणपतराव पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी खासदार शेट्टी यांची शिरोळ येथे घरी भेट घेतली. साखर कारखानदारीसमोरील अडचणींचा पाढा त्यांनी वाचत, ‘एफआरपी’तील ८० टक्के पहिली उचल देण्याची तयारी दर्शविली. त्याला विरोध करीत ‘एफआरपी’चे तुकडे पाडले तर त्या पैशाचा शेतकºयांना काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे एकरकमी एफआरपीबाबत अजिबात तडजोड करणार नसल्याचे शेट्टी यांनी कारखानदारांना ठणकावून सांगितले.अडचणीच्या काळात कोणत्याही उद्योगाला मदत करणे ही सरकारची जबाबदारी असते. त्यात सरकार कारखान्यांना मदत करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री खासगीत बोलतात. सरकार खरेच मदत करणार असेल तर एफआरपी देण्यासाठी जेवढे पैसे कमी पडतात, तेवढे त्यांनी द्यावेत. कारखानदारांनी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी सूचनाही शेट्टी यांनी केली.निर्यातीसाठी १०० कोटींची मदत अपेक्षितसाखरेचा उठाव व्हायचा झाल्यास सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. बॅँकांकडील तारण साखरेचा प्रश्न सोडविण्यासाठी कारखान्यांना निर्यातीची सक्ती करीत असताना त्यांना मदत केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दर पाहता, प्रतिक्विंटल ५०० रुपये तफावत आहे, त्यात दोनशे रुपये अनुदान मिळणार आहे. राहतो प्रश्न ३०० रुपयांचा. तेवढी सरकारने मदत करावी. ही रक्कम शंभर कोटींपेक्षा जास्त होत नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.