शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अशासकीय समिती सदस्यासाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: November 17, 2014 23:53 IST

पदांची विभागणी होऊन काही जागा सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे समजते.

कागल : राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप-आरपीआय शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आता विविध समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून जाण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत.तालुका पातळीवर संजय गांधी निराधार योजना समिती, रेशन धान्य दुकान समिती, एस.टी., वीज वितरण सल्लागार समिती, तालुका दक्षता समिती, विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांसह काही जिल्हा पातळीवरील पदेही यामध्ये येतात. मतदारसंघात भाजपकडून परशुराम तावरे यांनी निवडणूक लढविली होती. कोल्हापूर जिल्ह्याचे आर. पी. आय. आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे हे कागल तालुक्यातील आहेत, तर खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत. राज्यातील सत्तेतच आरपीआय, शेतकरी संघटनेला अजून कोणता सहभाग भाजपने दिलेला नसल्याने हे कार्यकर्ते फक्त चाचपणी करीत आहेत. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनीही मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. दरम्यान, या सर्व अशासकीय समित्यांवर विद्यमान आमदारांचेच वर्चस्व असते. त्यातून पदांची विभागणी होऊन काही जागा सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे समजते. त्यासाठी ते आपली नावे पाठवीत आहेत.भाजप सत्तेवर आल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी पदे मिळायला हवीत. पक्षाचेही तसे धोरण आहे. तालुका पातळीवरील पदे अधिकाधिक कार्यकर्त्यांना मिळावीत यासाठी मी प्रयत्न करीत आहे. पक्षाचे नेते माझ्यावर जी जबाबदारी देतील, ती मी स्वीकारणार आहे.- परशुराम तावरे, भाजपचे विधानसभा उमेदवार