शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी पालिकेवर मोर्चा

By admin | Updated: April 22, 2016 00:53 IST

नागरी सुविधांची मागणी : नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

इचलकरंजी : जवाहरनगरमधील फकीर मळा परिसरात रस्ते, गटारी, दिवाबत्ती आणि नळ पाणी अशा मूलभूत सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी त्या परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले. त्या परिसरामध्ये कूपनलिका खोदून पिण्याच्या पाण्याची सोय ताबडतोब करण्यात येईल व अन्य सुविधा लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिल्यानंतर हे आंदोलन संपुष्टात आले.जवाहरनगरमधील हनुमाननगर आणि फकीर मळा येथील प्रत्येकी चार गल्ल्यांमध्ये अनुक्रमे भुयारी गटार योजनेबरोबरच रस्ते, गटारी, दिवाबत्ती आणि पाण्याचे नळ ताबडतोब मिळावेत, या मागणीसाठी सुमारे चारशेहून अधिक महिला व पुरुषांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. राजू बोंद्रे व संतोष कांदेकर यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा पालिकेमध्ये येताच तेथील प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तासाच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षा बिरंजे व मुख्याधिकारी रसाळ मोर्चाला सामोरे गेले.यावेळी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या बोंद्रे व कांदेकर यांनी मांडल्या. यावर मुख्याधिकारी डॉ. रसाळ म्हणाले, फकीर मळा परिसरामधील रस्त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे काम लवकरात लवकर केले जाईल. तसेच नजीकच्या एक ते दोन आठवड्यांच्या काळात कूपनलिका खोदून नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करू. यावेळी उपनगराध्यक्ष महावीर जैन, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, नगरसेविका बिस्मिल्ला मुजावर, नगरसेवक रवी रजपुते, शशांक बावचकर, जलअभियंता ए. एन. जकीनकर, अभियंता संजय बागडे, नगररचना अधिकारी बबन खोत, कामगार अधिकारी विजय राजापुरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तथाकथित नेत्यांना नगराध्यक्षांचा टोलाआंदोलनकर्त्यांसमोर भाषण करताना फकीर मळा परिसरातील सेवा-सुविधा सहानुभूतीने नागरिकांना पुरविल्या जातील, असे सांगत नगराध्यक्षा बिरंजे म्हणाल्या, निवडणुका जवळ आल्यामुळे जागे झालेल्या तथाकथित नेत्यांनी मोर्चेबाजी न करता पालिकेतील कामकाजातील तांत्रिक बाजू समजावून घ्याव्यात. आपणच आपल्या समस्यांची सोडवणूक करावयाची आहे. निव्वळ टीकात्मक घोषणाबाजीने कामे होत नाहीत.