शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

संगणक परिचालकांचा मोर्चा

By admin | Updated: April 9, 2016 00:54 IST

मानधनाविना कार्यरत : राज्यातील २७ हजार परिचालकांचा सहभाग

रत्नागिरी : जानेवारी महिन्यापासून संगणक परिचालक मानधनाविना कार्यरत आहेत. संगणक परिचालकांबाबत कोणताही निर्णय शासनाने न घेतल्यामुळे राज्यातील २७ हजार संगणक परिचालकांनी दि. १२ एप्रिल रोजी विधानसभेवर धडकण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हटणार नसल्याचा निर्णय संगणक परिचालक संघटनेने घेतला आहे.संग्राम प्रकल्पांतर्गत २७ हजार संगणक परिचालक गेली चार वर्षे कार्यरत आहेत. महाआॅनलाईन कंपनीकडून ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. प्रामाणिक काम करून संगणक परिचालकांनी सलग तीन वर्षे संग्राम प्रकल्प देशात प्रथम क्रमांकावर ठेवला. तरीही महाआॅनलाईन कंपनीने संगणक परिचालकांची पिळवणूक करून ४ वर्षात मानधन, स्टेशनरी यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला. संगणक परिचालकांना दैनंदिन ५० ते २०० रूपये तर मासिक ५०० ते ३८०० रूपये इतके मानधन देऊन आर्थिक व मानसिक त्रास कंपनीने दिला. मानधन वेळेवर होत नसल्यामुळे यातील चार संगणक परिचालकांनी आत्महत्याही केली. संगणक परिचालकांना कुठल्याही खासगी कंपनीकडून नियुक्ती न देता थेट जिल्हा परिषदेकडून नियुक्ती देऊन किमान मासिक वेतन १५ हजार रूपये द्यावे, या प्रमुख मागणीसाठी गेली दोन वर्षे आंदोलन सुरू आहे. वेळोवेळी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. नागपूर येथे आठ दिवस आंदोलन सुरु असताना शासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्री यांनी २२ डिसेंबर २०१५ ला १५ जानेवारी २०१६पर्यंत मागण्यांबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. परंतु, एप्रिल महिना आला तरीही अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य संघटनेच्यावतीने १२ एप्रिल रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ेहरीश वेदरे : आश्वासनानंतर वेळोवेळी आंदोलन मागेयापूर्वी शासनाच्या आश्वासनांनंतर वेळोवेळी आंदोलन मागे घेण्यात आले. नागपूर येथे दिलेला शब्द शासन पाळेल अशी अपेक्षा संघटनेला होती. मात्र, गेले तीन महिने विना मोबदला संगणक परिचालक कार्यरत आहेत. एकीकडे महागाईचा डोंगर वाढत असतानाच संगणक परिचालक मात्र मोबदल्यापासून वंचितच आहेत. शासनाने आॅगस्ट महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचवेळी संगणक परिचालकांना उपासमारीने दिवस काढावे लागत आहेत. अखेर कंटाळलेल्या संगणक परिचालकांनी विधानभवनावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरीश वेदरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कामाला विरोधराज्यात काम करणाऱ्या संगणक परिचालकांनी मानधनासाठी वेळोवेळी आंदोलन केली आहेत. मात्र, त्यांना यश आलेले नाही. संग्राम अंतर्गत काम करणाऱ्या परिचालकांना आता आधारकार्ड नोंदणीची कामे देण्याबाबतही विचार सुरू आहे. मात्र, त्याला विरोध करण्यात आला आहे.