शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

संगणक परिचालकांचा मोर्चा

By admin | Updated: April 9, 2016 00:54 IST

मानधनाविना कार्यरत : राज्यातील २७ हजार परिचालकांचा सहभाग

रत्नागिरी : जानेवारी महिन्यापासून संगणक परिचालक मानधनाविना कार्यरत आहेत. संगणक परिचालकांबाबत कोणताही निर्णय शासनाने न घेतल्यामुळे राज्यातील २७ हजार संगणक परिचालकांनी दि. १२ एप्रिल रोजी विधानसभेवर धडकण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हटणार नसल्याचा निर्णय संगणक परिचालक संघटनेने घेतला आहे.संग्राम प्रकल्पांतर्गत २७ हजार संगणक परिचालक गेली चार वर्षे कार्यरत आहेत. महाआॅनलाईन कंपनीकडून ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. प्रामाणिक काम करून संगणक परिचालकांनी सलग तीन वर्षे संग्राम प्रकल्प देशात प्रथम क्रमांकावर ठेवला. तरीही महाआॅनलाईन कंपनीने संगणक परिचालकांची पिळवणूक करून ४ वर्षात मानधन, स्टेशनरी यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला. संगणक परिचालकांना दैनंदिन ५० ते २०० रूपये तर मासिक ५०० ते ३८०० रूपये इतके मानधन देऊन आर्थिक व मानसिक त्रास कंपनीने दिला. मानधन वेळेवर होत नसल्यामुळे यातील चार संगणक परिचालकांनी आत्महत्याही केली. संगणक परिचालकांना कुठल्याही खासगी कंपनीकडून नियुक्ती न देता थेट जिल्हा परिषदेकडून नियुक्ती देऊन किमान मासिक वेतन १५ हजार रूपये द्यावे, या प्रमुख मागणीसाठी गेली दोन वर्षे आंदोलन सुरू आहे. वेळोवेळी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. नागपूर येथे आठ दिवस आंदोलन सुरु असताना शासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्री यांनी २२ डिसेंबर २०१५ ला १५ जानेवारी २०१६पर्यंत मागण्यांबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. परंतु, एप्रिल महिना आला तरीही अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य संघटनेच्यावतीने १२ एप्रिल रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ेहरीश वेदरे : आश्वासनानंतर वेळोवेळी आंदोलन मागेयापूर्वी शासनाच्या आश्वासनांनंतर वेळोवेळी आंदोलन मागे घेण्यात आले. नागपूर येथे दिलेला शब्द शासन पाळेल अशी अपेक्षा संघटनेला होती. मात्र, गेले तीन महिने विना मोबदला संगणक परिचालक कार्यरत आहेत. एकीकडे महागाईचा डोंगर वाढत असतानाच संगणक परिचालक मात्र मोबदल्यापासून वंचितच आहेत. शासनाने आॅगस्ट महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचवेळी संगणक परिचालकांना उपासमारीने दिवस काढावे लागत आहेत. अखेर कंटाळलेल्या संगणक परिचालकांनी विधानभवनावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरीश वेदरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कामाला विरोधराज्यात काम करणाऱ्या संगणक परिचालकांनी मानधनासाठी वेळोवेळी आंदोलन केली आहेत. मात्र, त्यांना यश आलेले नाही. संग्राम अंतर्गत काम करणाऱ्या परिचालकांना आता आधारकार्ड नोंदणीची कामे देण्याबाबतही विचार सुरू आहे. मात्र, त्याला विरोध करण्यात आला आहे.