शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

लाभार्थ्यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: June 12, 2015 00:42 IST

शिरोळमधील आंदोलनकर्ते : संजय गांधी, श्रावणबाळ प्रकरणे निकाली काढण्याची मागणी

इचलकरंजी : संजय गांधी आणि श्रावणबाळ निराधार योजनांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकालात काढावी, यासह विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका शेतमजूर श्रमिक संघटनेच्यावतीने गुरुवारी येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. याची दखल घेत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी शिरोळचे तहसीलदार सचिन गिरी यांना बोलावून घेऊन चर्चा केली. यावेळी मार्ग न निघाल्याने आंदोलन सुरूच राहिले. अपंग, वृद्ध लाभार्थी प्रांत कार्यालय चौकातच ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, आज, शुक्रवारी भीक मागो आंदोलन करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश सासणे यांनी सांगितले.शिरोळ तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करावीत, यासाठी ५ मे रोजी शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात आजतागायत काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संघटनेच्यावतीने गुरुवारी सकाळी अकरा वाजता येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून वृद्ध महिला-पुरुष व अपंगांसह मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यानंतर तेथे प्रांतांना माहिती देण्यात आली. याबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रांताधिकारी जिरंगे यांनी तहसीलदार गिरी यांना बोलावून घेतले. संघटनेचे सासणे यांना बोलावून घेऊन चर्चा केली. मात्र, चर्चेतून मार्ग निघाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत प्रांत कार्यालयाच्या परिसरातून न हलण्याचा निर्णय घेत ठिय्या मारला. आजपासून भीक मागो आंदोलन, दंडवत मोर्चा, तिरडी मोर्चा काढून श्राद्ध घालण्याचा इशारा सासणे यांनी दिला आहे. तसेच राजापूरचे तलाठी सनदी व कोतवाल यांच्या आडमुठ्या धोरणामुळे लाभार्थ्यांची फरफट होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणीही सासणे यांनी केली आहे. (वार्ताहर)कागदपत्रांची तपासणी करून निर्णययाबाबत प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित लाभार्थ्यांचा विषय हा तहसील कार्यालयाच्या अधिकारात येत असून, लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांसह तहसील कार्यालयात दाद मागितल्यास कागदपत्रांची तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे आंदोलकांना सांगितले आहे. मात्र, तुमच्या यंत्रणेमार्फतच चौकशी करून लाभार्थ्यांचा समावेश करावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे तोडगा निघाला नसल्याचे सांगितले.