शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

लोकशाहीचे स्वातंत्र्य अनेक मार्गाने परिसीमित

By admin | Updated: April 2, 2017 23:39 IST

जे. एफ. पाटील : मिरजेत मान्यवरांच्या उपस्थितीत अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा

मिरज : लोकशाहीचे हक्क व स्वातंत्र्य अनेक मार्गाने परिसीमित होत आहे. उदारमतवादी लोकशाहीची संकल्पना विसरली जात आहे. माध्यमांचे स्तंभ पायाभूत होऊन, राजकारणाचे स्वार्थकारण होत आहे. अशा वातावरणात सामाजिक जागरणाची आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले.मिरजेत डॉ. जे. एफ. पाटील यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त अमृतमहोत्सव सत्कार समितीतर्फे डॉ. पाटील व सौ. कमलताई पाटील यांचा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. पाटील म्हणाले, आई-वडिलांना शिक्षणाचे मोल माहीत असल्याने शिकलो. अभियंता होण्याचे उद्दिष्ट असताना शिक्षक झालो. मात्र शिक्षकी व्यवसायाने भरपूर समाधान दिले. अर्थतज्ज्ञ असूनही पैसे मिळविणे जमले नसल्याची खंत नाही. कारण माणसं उदंंड मिळविली. नायक महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण माझे राष्ट्रीय दैवत आहेत. विचारांशी बांधिलकी, निष्कलंक चारित्र्य, दुर्बलांची कणव, राष्ट्रभक्ती व प्रचंड व्यासंग ही या सर्वांची श्रीमंती होती. मात्र सद्यस्थितीत या तुलनेत पर्यावरणीय पोकळी व प्रदूषण जाणवते. सामाजिक व राजकीय समीकरण आता कालबाह्य होत आहे. राजकारणासाठी अनंत काळ संदर्भ असणाऱ्या वैचारिक चौकटीची गरज भूतकाळात जमा होत चालली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या उंचीचे होते. शिवाजी विद्यापीठामुळे मला सामाजिक ओळख मिळाली. इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीमुळे मला सामाजिक निकष व आशय मिळाला. सत्काराबद्दल डॉ. पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. दिलीप नाचणे म्हणाले, जे. एफ. पाटील यांनी सामाजिक बांधिलकी मानून काम करताना व्यासंगी अभ्यासक, ध्येयवादी शिक्षक, कुशल प्रशासक अशी भूमिका बजावली. त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून कृषी व्यवस्थेतील मूलभूत समस्या, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, अर्थकारण, दारिद्र्य निर्मूलन यासाठी काय केले पाहिजे, याविषयी लेखन व मार्गदर्शन केले. आपल्या देशात त्यांच्यासारखे उत्तम संशोधक निर्माण होऊ शकतात. देशाचा आर्थिक सुकाणू सांभाळण्यासाठी परदेशी तज्ज्ञांची गरज नाही. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, जे. एफ. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू झाले नाहीत, मात्र विद्यापीठाचा २० वर्षे जुना अभ्यासक्रम बदलण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आ. जयंत पाटील म्हणाले, जगातील इतर देशात अर्थतज्ज्ञांना मोठे महत्त्व आहे, मात्र आपल्या देशात अर्थतज्ज्ञांना तितके महत्त्व मिळत नाही. डॉ. जे. एफ. पाटील यांच्याइतकी अर्थशास्त्राची सेवा अन्य कोणीही केली नसेल. त्यांचा सत्कार ही अर्थशास्त्रातील ठळक घटना आहे. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी जे. एफ. पाटील यांच्या अध्यापन व संशोधन कार्याची प्रशंसा करून त्यांनी सामाजिक चळवळीला दिशा दिल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, माजी आमदार प्रकाश आवाडे, प्रा. वसंतराव देसाई यांनी डॉ. पाटील यांच्या अर्थशास्त्रातील कार्याचा गौरव केला. डॉ. पाटील यांनी लिहिलेल्या व सत्कार समितीने पुरस्कृत केलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ‘व्यक्ती विचार व अर्थ’ या पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याहस्ते, ‘नोटाबंदी काही निबंध’ या पुस्तकाचे आ. जयंत पाटील यांच्याहस्ते, ‘प्रश्न पाण्याचा’ या पुस्तकाचे माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांच्याहस्ते व ‘कन्फ्रटींग पॉवरटी’ या पुस्तकाचे प्रा. डॉ. दिलीप नाचणे यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. उद्योजक अरविंदराव मराठे, माजी आमदार हाफिज धत्तुरे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे, बापूसाहेब पुजारी, आर. डी. सावंत यांच्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व डॉ. जे. एफ. पाटील सरांचे विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. जे. एफ. पाटील यांच्या चार पुस्तकांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न इंचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीला देण्यात येणार असल्याचे सत्कार समितीतर्फे सांगण्यात आले. यावेळी डॉ. पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रा. सुनीता माळी यांनी तयार केलेली ध्वनिचित्रफित प्रदर्शित करण्यात आली. कार्यवाह सुभाष दगडे यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वागताध्यक्ष प्राचार्य राजू झाडबुके यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अर्जुनराव महाडिक, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. पी. बी. कुलकर्णी, कार्यवाह सुभाष दगडे यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)लाखाची देणगीअमृतमहोत्सवी सत्कारानिमित्त प्रा. बी. जी. गोरे यांनी समाजवादी प्रबोधिनीला एक लाखाची देणगी जाहीर केली. बिल गेटस्, टाटा, बिर्ला यांच्यापेक्षा गोरे यांचे दातृत्व मोठे असल्याचे कौतुक जे. एफ. पाटील यांनी केले. विक्रमी रंगावलीकार आदमअली मुजावर यांनी जे. एफ. पाटील यांचे व्यक्तिचित्र कार्यक्रमस्थळी रांगोळीत रेखाटले होते.