शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त संचालक पदे भरण्याचा सहकारी संस्थांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:37 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांची रिक्त पदे भरण्याबाबत निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट आदेश काढले ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांची रिक्त पदे भरण्याबाबत निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट आदेश काढले आहेत. ज्या संस्थांची निवडणूक होऊन अडीच वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल, तर त्यांना रिक्त पदे भरण्याची मुभा संचालक मंडळाला दिलीआहे. त्यासाठी निबंधकांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबवावी लागणार आहे. निवडणुकीपासून अडीच वर्षांच्या आत पद रिक्त झाले असेल तर तिथे थेट निवडणूकच घ्यावी लागणार आहे.सहकारी संस्थांच्या निवडणूक नंतर संचालक मंडळातील एखादे पद काही कारणांनी रिक्त झाले तर त्या जागेसाठी वर्षा-दीड वर्षात निवडणूक लावणे संस्थांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होते. त्यामुळे अनेक संस्थांत पदे रिक्तच ठेवली जायची अथवा स्वीकृत करून घेतले जायचे. मग ही नियुक्ती अधिकृत की अनधिकृत हा वाद न्यायालयात जायचा. याबाबत निवडणूक प्राधिकरणाने स्पष्टता देणारे परिपत्रक २६ आॅक्टोबर रोजी जारी केले आहे.तीन संस्थांतीलपदे भरण्याचा मार्ग मोकळाकोल्हापूर जिल्हा बॅँक, कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) व शेतकरी संघ या संस्थांच्या निवडणुका होऊन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने स्वीकृत म्हणून पदे भरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.नोटीस देऊन अर्ज मागवावे लागणाररिक्त पदासाठी संस्था व निबंधक कार्यालयाच्या नोटीस फलकावर जाहीर करून अर्ज मागवावे लागणार आहेत. या नोटिसीचा पंचनामा करण्याबरोबरच अर्ज सादर करण्यासाठी सात ते पंधरा दिवसांचा कालावधी देणे संस्थांना बंधनकारक राहणार आहे.दोनच पदे स्वीकृतीने भरता येणाररिक्त पदे स्वीकृत पद्धतीने भरण्यासाठी संस्था संचालकांच्या कालावधीत दोनपेक्षा अधिक पदे भरता येणार नाहीत. दोन भरल्यानंतर आणखी एखादे रिक्त राहत असेल तर ते पद निवडणुकीद्वारे भरावे लागेल. त्यासाठी प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करायचा आहे.