शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

मोबाईल ग्राहक सेवा केंद्रांकडून फसवणूक

By admin | Updated: November 21, 2014 00:54 IST

ग्राहक पंचायत : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : मोबाईल ग्राहक सेवा केंद्रांकडून ग्राहकांना चांगली वागणूक तर दिली जात नाहीच, शिवाय त्यांची फसवणूकही होत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व मोबाईल कंपन्यांच्या ग्राहक सेवा केंद्रप्रमुखांना बोलावून त्यांची ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आज, गुरुवारी ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.जिल्ह्यातील मोबाईल विक्रेते विक्रीपश्चात सेवेसाठी ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्राकडे जाण्यास सांगतात. विविध मोबाईल उत्पादकांची कोल्हापुरात सेवा केंद्रे आहेत; परंतु ती ग्राहकांना योग्य वागणूक देत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देऊन सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य असतानाही त्यांच्याकडून ती दिली जात नाही. यामुळे मोबाईलधारक ग्राहकांची फसवणूक होत आहे. याला प्रतिबंध होणे आवश्यक आहे. यासाठी कोल्हापुरातील सर्व मोबाईल कंपन्यांच्या ग्राहक सेवा केंद्रप्रमुखांना बोलावून घेऊन ग्राहक पंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी. ही केंद्रे मोबाईल सेटमध्ये असणाऱ्या दोषांचे निराकरण करीत नाहीत. मोबाईल सेट ठेवून घेऊन तो वर कंपनीकडे पाठवितो म्हणून सांगितले जाते; परंतु कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न करता नादुरुस्त असलेला मोबाईल जसाच्या तसा परत दिला जातो. यामुळे ग्राहकाला विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकाला याचा विनाकारण भुर्दंड सहन करावा लागतो.अशा प्रकारे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. याला आळा बसणे आवश्यक आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेऊन मार्ग काढावा, असे या निवेदनात म्हटले आहे.शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अरुण यादव, शिवनाथ बियाणी, मोहन शेटे, दत्तात्रय धडेल, दत्तात्रय मिटके, अ‍ॅड. ज्योत्स्ना डासाळकर, सम्राट बच्चे, जगन्नाथ जोशी, डॉ. अनिल अनिखिंडी यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)