शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पेयजल योजनेमध्ये अफरातफर

By admin | Updated: November 18, 2014 00:07 IST

आमजाई व्हरवडे : संगनमताने परस्पर ४३ लाखांची रक्कम उचलल्याचा आरोप

सुनिल चौगले -आमजाई व्हरवडे -आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेचे काम सुरू असून, योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच ठेकेदारांचे पूर्ण बील अदा करावे, असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला होता. मात्र, काम अपूर्ण असतानासुद्धा ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने ग्रामपंचायतीच्या चालू खात्यावरून ४३ लाख रुपयांची परस्पर उचल झाली आहे. ग्रामसभेत ठराव करूनसुद्धा पेयजल कमिटीतील सदस्यांच्या परस्पर रक्कम उचलण्याने या पेयजल योजनेतील मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी पेयजल कमिटीतील चौदा सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, राधानगरी यांच्या अंतर्गत सध्या गावामध्ये पेयजल योजनेचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. १५ आॅगस्ट २०१२ रोजी झालेल्या गावसभेत सदर योजनेच्या ठेकेदारांना १३ लाख रुपये अदा करावेत, असा ठराव झाला होता. तसेच योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय कोणतेही बिल अदा करू नये, असा ठराव झाला होता. यानंतर आजअखेर गावसभेमध्ये तसेच सदस्य मिटिंगमध्ये कधीही ठेकेदारांना बिल अदा करण्याबाबतची कोणत्याही प्रकारची चर्चा अथवा लेखी ठराव झाला नाही. तरीदेखील ग्रामपंचायतीच्या बॅँक खात्यावरून ४३ लाखांची उचल ग्रामसेवक व काही पदाधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे दिसून येते. या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट असून, प्लॅन व इस्टिमेटमधील अनेक कामे अपूर्ण, तर काही कामांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. अशा अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या योजनेची बिले कोणाच्या सहमतीने व कोणास अदा करण्यात आली याची चौकशी व्हावी. तसेच या योजनेच्या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी, पदाधिकारी व संबंधित व्यक्ती यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. जर या कामाची चौकशी झाली नाही, तर न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.माजी सरपंच अशोक सुतार, उपसरपंच केरबा वडरे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, निवृत्त केंद्रप्रमुख बंडोपंत पाटील, राजेंद्र चौगले, कृष्णात चौगले, रोहिणी पाटील, स्नेहल पाटील, आनंदी पाटील, मारुती पाटील, मारुती रणदिवे, हेमा कांबळे, शांताबाई पोवार, नंदा पाटील या पेयजल योजनेतील कमिटीच्या चौदा सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.सुभेदारसाहेब स्वत: लक्ष घालाजल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सूत्रे स्वीकारल्याबरोबर त्यांनी प्रशासनाला एक शिस्त लावल्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रशासनावर वचक असल्याने काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आाहेत. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून सुभेदार यांचा जिल्ह्यात लौकिक आहे.राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे ग्राम पंचायत सतत अनेक कारणांनी चर्चेत आहे. येथे जॅकवेल म्हणून सुरू केलेला पाणीपुरवठा तर मोठा गाजला. पाण्यामुळे भांडीच पिवळी पडत होती. ‘लोकमत’ने आवाज उठविल्यावर शासकीय यंत्रणा जागी झाली. आजही पाण्याच्या नमुन्याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या पेयजलच्या कामाच्या चौकशीचे आदेश तत्काळ देऊन अविनाश सुभेदार यांनीच लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.अनेक कामे अपूर्णया पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट असून, प्लॅन व इस्टिमेटमधील अनेक कामे अपूर्ण, तर काही कामांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही.