शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पेयजल योजनेमध्ये अफरातफर

By admin | Updated: November 18, 2014 00:07 IST

आमजाई व्हरवडे : संगनमताने परस्पर ४३ लाखांची रक्कम उचलल्याचा आरोप

सुनिल चौगले -आमजाई व्हरवडे -आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेचे काम सुरू असून, योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच ठेकेदारांचे पूर्ण बील अदा करावे, असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला होता. मात्र, काम अपूर्ण असतानासुद्धा ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने ग्रामपंचायतीच्या चालू खात्यावरून ४३ लाख रुपयांची परस्पर उचल झाली आहे. ग्रामसभेत ठराव करूनसुद्धा पेयजल कमिटीतील सदस्यांच्या परस्पर रक्कम उचलण्याने या पेयजल योजनेतील मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी पेयजल कमिटीतील चौदा सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, राधानगरी यांच्या अंतर्गत सध्या गावामध्ये पेयजल योजनेचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. १५ आॅगस्ट २०१२ रोजी झालेल्या गावसभेत सदर योजनेच्या ठेकेदारांना १३ लाख रुपये अदा करावेत, असा ठराव झाला होता. तसेच योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय कोणतेही बिल अदा करू नये, असा ठराव झाला होता. यानंतर आजअखेर गावसभेमध्ये तसेच सदस्य मिटिंगमध्ये कधीही ठेकेदारांना बिल अदा करण्याबाबतची कोणत्याही प्रकारची चर्चा अथवा लेखी ठराव झाला नाही. तरीदेखील ग्रामपंचायतीच्या बॅँक खात्यावरून ४३ लाखांची उचल ग्रामसेवक व काही पदाधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे दिसून येते. या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट असून, प्लॅन व इस्टिमेटमधील अनेक कामे अपूर्ण, तर काही कामांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. अशा अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या योजनेची बिले कोणाच्या सहमतीने व कोणास अदा करण्यात आली याची चौकशी व्हावी. तसेच या योजनेच्या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी, पदाधिकारी व संबंधित व्यक्ती यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. जर या कामाची चौकशी झाली नाही, तर न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.माजी सरपंच अशोक सुतार, उपसरपंच केरबा वडरे, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, निवृत्त केंद्रप्रमुख बंडोपंत पाटील, राजेंद्र चौगले, कृष्णात चौगले, रोहिणी पाटील, स्नेहल पाटील, आनंदी पाटील, मारुती पाटील, मारुती रणदिवे, हेमा कांबळे, शांताबाई पोवार, नंदा पाटील या पेयजल योजनेतील कमिटीच्या चौदा सदस्यांनी लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.सुभेदारसाहेब स्वत: लक्ष घालाजल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सूत्रे स्वीकारल्याबरोबर त्यांनी प्रशासनाला एक शिस्त लावल्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रशासनावर वचक असल्याने काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आाहेत. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून सुभेदार यांचा जिल्ह्यात लौकिक आहे.राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे ग्राम पंचायत सतत अनेक कारणांनी चर्चेत आहे. येथे जॅकवेल म्हणून सुरू केलेला पाणीपुरवठा तर मोठा गाजला. पाण्यामुळे भांडीच पिवळी पडत होती. ‘लोकमत’ने आवाज उठविल्यावर शासकीय यंत्रणा जागी झाली. आजही पाण्याच्या नमुन्याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या पेयजलच्या कामाच्या चौकशीचे आदेश तत्काळ देऊन अविनाश सुभेदार यांनीच लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.अनेक कामे अपूर्णया पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट असून, प्लॅन व इस्टिमेटमधील अनेक कामे अपूर्ण, तर काही कामांना अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही.