शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

दहा वर्षाच्या कष्टाने फोंड्या माळावर फुलविली वनराई

By admin | Updated: June 5, 2014 01:26 IST

तामगावमधील तेंडुलकर कुटुंबीयांची किमया : पर्यावरण रक्षणाचा दिला कृतीतून संदेश; पर्यावरणदिनी साजरा करतात झाडांचा वाढदिवस

संतोष मिठारी ल्ल कोल्हापूर सभोवती असलेली औद्योगिक वसाहत, खडकाळ जमीन, पाण्याचा अभाव, अशा परिस्थितीत तामगाव (ता. करवीर) येथील नारायण नगरमध्ये तेंडुलकर कुटुंबीयांनी चिकाटी आणि जिद्दीने दहा वर्षांच्या प्रयत्नातून वनराई फुलविली आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. मूळचे कोकणातील तेंडुलकर कुटुंबीयांनी दहा वर्षांपूर्वी जेरबेराचे ग्रीन हाऊस करण्याच्या उद्देशाने उजळाईवाडी- नेर्ली मार्गावरील या नारायण नगरमध्ये १६ गुंठे जमीन खरेदी केली. हा परिसर म्हणजे फोंडा माळ होता. खडकाळ जमीन, पाण्याचा अभाव होता. हे वास्तव समजल्यानंतर सुधा आणि सुरेश तेंडुलकर यांनी ग्रीन हाऊसचा निर्णय रद्द करून राहण्यासाठी बंगला बांधण्यासह या माळावर वनराई फुलविण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू केली. त्यांनी ४० ते ४५ ट्रॉली लाल माती आणून याठिकाणी पसरली. बोअर मारली. फुले, फळे विभागातील झाडे त्यांनी या ठिकाणी लावली. त्यासाठी त्यांनी जागेचा एकही कोपरा शिल्लक ठेवला नाही. सध्या नारळ, आंबा, चिकू, जांभूळ, जाम, आवळा, चिंच, लिंबू, पेरू, चाफा, जास्वंदी, मोगरा, मधुमती, हिरवा व सोनचाफा, जास्वंदी अशा विविध प्रकारांतील सुमारे २५० हून अधिक झाडांनी त्यांची वनराई फुलली आहे. चिमणी, भारद्वाज अशा विविध पक्षांचे आश्रयस्थान बनली आहे. या झाडांची खत-पाणी, देखभाल, निगा राखण्याचे काम सुधा करतात. यात त्यांना पती सुरेश, मुलगा संकेत, नातेवाईक अजित देशपांडे हे मदत करतात. उजळाईवाडी-नेर्ली मार्गावरून जाताना अनेकजण तेंडुलकर कुटुंबीयांनी फुलविलेली वनराई पाहून माहिती घेण्यासाठी थांबतात. त्यांचा आदर्श घेवून या परिसरातील काही उद्योजकांनीदेखील आपले वर्कशॉप, बंगल्याच्या आवारात झाडे लावली आहेत.