शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

चौपदरीकरणात अडथळे अधिकाऱ्यांचेच!

By admin | Updated: November 22, 2014 00:03 IST

कोल्हापूर-सांगली रस्ता : मुदत संपली तरी प्राथमिक स्तरावरील कामांची पूर्तता नाही; अनेक ठिकाणच्या जागा अजूनही ताब्यात नाहीत

सतीश पाटील - शिरोली -कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची मुदत ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी संपली असली तरी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक स्तरावरील कामांची पूर्तता झालेली नाही, त्यामुळे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे.कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणास आॅक्टोबर २०१२ मध्ये सुरुवात झाली. हे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया कंपनीने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर घेतले. ५२ कि.मी. रस्त्यासाठी १९५ कोटी रुपये प्रकल्प रक्कम ठरली. या रस्त्यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील १५ गावांतील जमिनी हस्तांतरित होणार होत्या. प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर अडचणी आल्यास शासकीय कार्यालयाने मदत करणे हेही ठरले. या रस्त्याचे काम आॅक्टोबर २०१४ मध्ये पूर्ण करण्याचे बंधनकारक होते; पण प्रत्यक्ष दोन वर्षांत १५ पैकी हेर्ले, अतिग्रे, तमदलगे, जैनापूर, निमशिरगाव, सांगली, अंकली या सात गावांच्या जमिनी रस्त्यासाठी मिळाल्या नाहीत. अतिग्रे, हेर्लेतील रस्त्यालगत असणाऱ्या वस्तीचे पुनर्वसन करावे लागते; पण दोन वर्षांत शासकीय कार्यालयातून मंदगतीने हालचाली सुरू असल्यामुळे येथील पुनर्वसन झालेले नाही.तमदलगे येथे समाजमंदिर व देऊळ या रस्त्यात येत असल्याने तेथील प्रश्न सुटलेला नाही. निमशिरगाव येथील शाळाच रस्त्यात जाते, ही शाळा बांधून देण्यावरून वाद सुरू आहे. जैनापूर, अंकली व सांगली येथील जागेचा ताबा कंपनीला मिळालेला नाही.रस्त्यासाठी लागणारा मुरूम देण्यासाठी शासकीय कार्यालयातून मदत होत नाही. खासगी शेतकऱ्यांकडून मुरूम घेतला तर शासकीय अधिकारी रॉयल्टीच्या नावाखाली छापा मारतात. यात शेतकरीही अडचणीत असल्यामुळे ते मुद्दल देण्यास तयार होईनात. यासारख्या कारणांमुळे रस्त्याच्या कामात शासकीय कार्यालये व अधिकाऱ्यांमुळे अडथळेच निर्माण झाले आहेत. चौपदरीकरणासाठी अधिकाऱ्यांचीच उदासीनता दिसते. या पद्धतीनेच रस्त्यांचे काम सुरू राहिले, तर अजून पाच वर्षे रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही.कोल्हापुरातील आयआरबीच्या टोलचा प्रश्न महाराष्ट्रभर गाजत आहे. त्यामुळे कोल्हापूर-सांगली या बीओटी तत्त्वावर चाललेल्या रस्त्यासाठी बॅँका व मोठ्या कंपन्या फायनान्स करण्यास तयार नव्हत्या. सहा महिने रस्त्याचे काम आर्थिक अडचणीमुळे खोळंबले, पण सध्या लार्सन अ‍ॅण्ड टुर्बो कंपनीने अर्थसहाय्य केले आहे.रस्त्याचे ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करून या मार्गावरील प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत.आमच्याकडून तीन गावांचा ताबा देणे राहिले आहे. कंपनीने संबंधित लोकांना पैसे देणे बाकी आहे. म्हणून कंपनीने पैसे वेळेवर न दिल्याने त्यांना जमिनीचा ताबा मिळालेला नाही. पैशामुळेच रस्त्याची कामे रेंगाळली आहेत.- अश्विनी जिरगे, प्रांताधिकारीशासकीय कामात दिरंगाई होत आहे. रस्त्यासाठी मुरूम मिळत नसल्यामुळे काम संथगतीने सुरू आहे. कामाची मुदत संपली तरीही सात गावांचा ताबा मिळालेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांकडूनच रस्त्यासाठी म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे काम रेंगाळले आहे.- अशोक मोहिते, प्रकल्प अधिकारी४कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या कामाबाबत शनिवारी दुपारी चार वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सुप्रीम कंपनी व शासकीय अधिकाऱ्यांची ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहात बैठक होणार आहे.लोकप्रतिनिधींची उदासीनताकोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींनी उदासीनता दाखविली आहे. कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या पट्ट्यात आमदार महादेवराव महाडिक, सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, सुधीर गाडगीळ, खासदार राजू शेट्टी असे एकूण सहा लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी आपापल्या परीने शासकीय यंत्रणा हलवून रस्ता पूर्ण करणे गरजेचे आहे. सध्या रस्त्याचे कामच थंडावल्याने या मार्गावर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.