शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

चौपदरीकरणाच्या कामात विघ्नच विघ्न!

By admin | Updated: June 17, 2016 23:52 IST

पाच टप्प्यात काम : रत्नागिरी-कोल्हापूर प्रकल्प प्राधिकरणकडे

प्रकाश वराडकर --- रत्नागिरी -मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच भूसंपादनाच्या कामात विघ्नच विघ्न समोर येत आहेत. त्यातून वाट काढण्याचे जोरदार प्रयत्न राष्ट्रीय महामार्गच्या रत्नागिरी विभागाकडून सुरू आहेत. कशेळी ते झाराप या मार्गावर पाच टप्प्यात चौपदरीकरणाचे काम होणार असून, त्यातील तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांचे कार्यादेश देणे बाकी असून, उर्वरित दोन टप्प्यांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणात कशेळी ते झाराप (गोवा) या मार्गावर पाच टप्प्यात काम होणार आहे. त्यातील खवटी ते परशुरामघाट (१६१.६०० ते २०५.४०० किलोमीटर), आरवली ते तळेकांटे (२४१.२०० ते २८१.२०० किलोमीटर) व तळेकांटे ते वाकेड (लांजा) (२८१.२०० ते ३३२.२०० किलोमीटर) या तीनही टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांचे कार्यादेश निघणे बाकी आहे. त्यानंतर या तीनही टप्प्यांची कामे सुरू होणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील या टप्प्यांमध्ये समाविष्ट नसलेल्या मार्गावरील काही अंतरात अनेक अडचणींचा सामना महामार्ग विभागाला करावा लागत आहे. त्यामध्ये बाजारपेठा, घरे, प्रार्थनास्थळे यांचा समावेश आहे. बाजारपेठांमधून चौपदरीकरणाचे काम पुढे कसे न्यावे, याबाबतचे आव्हान अद्याप कायम आहे. तीन टप्प्यांतील कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी पेण विभागाकडे असलेल्या कशेळी ते खवटी व रत्नागिरी विभागाकडे असलेले वाकेड ते झाराप या दोन टप्प्यांतील निविदा प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ही प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभाग सुत्रांकडून सांगण्यात आले. पनवेल - महाड - पणजी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना १७) असून, रस्ते वाहतूूक व महामार्ग मंत्रालयाने या मार्गापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६६.१७० किलोमीटर्स भागाच्या चौपदरीकरण कामाला २१ जून २०१३, ४ जून २०१३ व ६ जून २०१३ अन्वये मान्यता दिली होती. गेल्या दोन दशकांपासून चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. या काळात मुंबई - गोवा महामार्गावर अपघातांची श्रुंखलाच सुरू आहे. अनेक अपघात होऊन त्यात हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर कित्येक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गाला डेड ट्रॅक म्हणूनही ओळखले जाते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली. सुमारे ५ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च या प्रकल्पासाठी येणार आहे.दोन टप्पे बाकी : तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्णरत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम नॅशनल हायवे अथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात एनएचएआयकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडेच असून, त्याबाबत या विभागाने सज्जता केली आहे.