शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

चौपदरीकरणाच्या कामात विघ्नच विघ्न!

By admin | Updated: June 17, 2016 23:52 IST

पाच टप्प्यात काम : रत्नागिरी-कोल्हापूर प्रकल्प प्राधिकरणकडे

प्रकाश वराडकर --- रत्नागिरी -मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच भूसंपादनाच्या कामात विघ्नच विघ्न समोर येत आहेत. त्यातून वाट काढण्याचे जोरदार प्रयत्न राष्ट्रीय महामार्गच्या रत्नागिरी विभागाकडून सुरू आहेत. कशेळी ते झाराप या मार्गावर पाच टप्प्यात चौपदरीकरणाचे काम होणार असून, त्यातील तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांचे कार्यादेश देणे बाकी असून, उर्वरित दोन टप्प्यांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणात कशेळी ते झाराप (गोवा) या मार्गावर पाच टप्प्यात काम होणार आहे. त्यातील खवटी ते परशुरामघाट (१६१.६०० ते २०५.४०० किलोमीटर), आरवली ते तळेकांटे (२४१.२०० ते २८१.२०० किलोमीटर) व तळेकांटे ते वाकेड (लांजा) (२८१.२०० ते ३३२.२०० किलोमीटर) या तीनही टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांचे कार्यादेश निघणे बाकी आहे. त्यानंतर या तीनही टप्प्यांची कामे सुरू होणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील या टप्प्यांमध्ये समाविष्ट नसलेल्या मार्गावरील काही अंतरात अनेक अडचणींचा सामना महामार्ग विभागाला करावा लागत आहे. त्यामध्ये बाजारपेठा, घरे, प्रार्थनास्थळे यांचा समावेश आहे. बाजारपेठांमधून चौपदरीकरणाचे काम पुढे कसे न्यावे, याबाबतचे आव्हान अद्याप कायम आहे. तीन टप्प्यांतील कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी पेण विभागाकडे असलेल्या कशेळी ते खवटी व रत्नागिरी विभागाकडे असलेले वाकेड ते झाराप या दोन टप्प्यांतील निविदा प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ही प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभाग सुत्रांकडून सांगण्यात आले. पनवेल - महाड - पणजी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (जुना १७) असून, रस्ते वाहतूूक व महामार्ग मंत्रालयाने या मार्गापैकी इंदापूर ते झाराप या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६६.१७० किलोमीटर्स भागाच्या चौपदरीकरण कामाला २१ जून २०१३, ४ जून २०१३ व ६ जून २०१३ अन्वये मान्यता दिली होती. गेल्या दोन दशकांपासून चौपदरीकरणाची मागणी केली जात होती. या काळात मुंबई - गोवा महामार्गावर अपघातांची श्रुंखलाच सुरू आहे. अनेक अपघात होऊन त्यात हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर कित्येक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या महामार्गाला डेड ट्रॅक म्हणूनही ओळखले जाते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली. सुमारे ५ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च या प्रकल्पासाठी येणार आहे.दोन टप्पे बाकी : तीन टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्णरत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम नॅशनल हायवे अथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात एनएचएआयकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडेच असून, त्याबाबत या विभागाने सज्जता केली आहे.