शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

चौपदरीकरण वाद पेटणार?

By admin | Updated: March 10, 2016 01:34 IST

निर्णयाकडे लक्ष : पालीत बायपासला व्यावसायिकांचा विरोधच

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय भूसंपादनाच्या विषयावरून वादग्रस्त बनला आहे. पाली येथून मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असतानाच रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाचे चौपदरीकरणही पालीतूनच होणार आहे. मात्र, जमीन संपादनाच्या विषयावरून पालीत दोन मतप्रवाह निर्माण झाले असून, पाली बाजारपेठेतून चौपदरीकरण होणार की बायपासचा पर्याय मान्य केला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पाली बाजारपेठेतूनच मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे. रस्ता रुंदीकरणासाठी १५ मीटर्स जागा देण्यास पालीतील ८० टक्के प्रकल्पग्रस्त व्यावसायिक व नागरिकांची तयार आहे, असा दावा पाली बाजारपेठेतील व्यावसायिक व नागरिकांच्या पाली विकास समिती अध्यक्ष सदानंद राऊत व पदाधिकारी अमेय वेल्हाळ यांनी बुधवारी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत केला. यावेळी समितीचे पदाधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामध्ये गोकुळ लिंगायत, विनोद रसाळ, भालचंद्र ढवळे, विलास राऊत, श्रीकांत राऊत, सुरेश ठाकुर, अशोक लिंगायत, चंद्रशेखर कोठावळे, उमेश शिंदे, सुमंत पालकर, भाऊ वेल्हाळ, मनोज कोलते, सुहास सुर्वे, चंद्रशेखर सुर्वे, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते. पालीतूनच चौपदरीकरण हवे, अशी भूमिका मांडताना जागेबाबत शिथिलता द्यावी, घाटातील रस्त्याबाबतचा निकष वापरावा, अशी मागणी असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाली बाजारपेठेची लांबी मुख्य रस्त्यावर ६०० मीटर्स असून, त्यातील दिडशे मीटर्समध्येच दुकाने, घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठीच घाटातील रुंदीकरणाचा निकष वापरून कमीत कमी जागा चौपदरीकरणासाठी घेतली जावी. बाजारपेठेतील साडेचारशे मीटर अंतरात मुळातच २५ मीटर्स अंतर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे तेथे समस्या नाहीत, असेही समितीतर्र्फे स्पष्ट करण्यात आले. दिडशे मीटर्समधील व्यावसायिकांची कमीत कमी जागा घेतली जावी, त्यांचा व्यवसायही टिकावा, हीच समितीची भूमिका आहे. बायपासला आपला विरोध असल्याचे निवेदन समितीतर्फे आमदार उदय सामंत यांना देण्यात आले आहे, तर खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही गुरुवारी (१० मार्च) बायपास नको, ही मागणी करणारे निवेदन दिले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.पालीतून बायपास नको, कमीत कमी जागा वापरून चौपदरीकरण व्हावे व ही बाजारपेठ टिकावी या मागणीसाठी समितीने अनेक मुद्दे मांडले आहेत. पालीतूनच चौपदरीकरण व्हावे. बायपासने अंतर वाढेल व मार्ग उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांर्च अधिक खर्च करावा लागेल. जमिन व वास्तू यांच्या निर्धारित दराप्रमाणे रक्कम ही ह्यमालकांना त्वरित दिली जावी आणि अन्य मागण्यांवरही विचार करावा, यासारख्या मुद्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)पालीतील सर्वच व्यावसायिकांनी बाजारपेठेतून कमीत कमी जागेत चौपदरीकरण व्हावे, यासाठी एकत्र यावे. आता मागणीच्या पूर्ततेसाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहनही समितीतर्फे करण्यात आले. पाली बाजारपेठेतून चौपदरीकरण न झाल्यास पाली बाजारपेठेचे अस्तित्वच संपुष्टात येईल. गेल्या काही वर्षात महामार्गावरील बाजारपेठा वाचविण्यासाठी बायपास काढले गेले. त्याठिकाणच्या बाजारपेठा ओस पडल्या आहेत, त्यांचे वैभव संपुष्टात आले आहे, सावंतवाडी बाजारपेठ हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. ...तर बायपासचा पर्याय?दुसरीकडे पालीतून चौपदरीकरण न करता बायपास काढावा, अशी मागणी तेथीलच काही व्यावसायिकांनी केली आहे. मात्र, चौपदरीकरणात अधिक प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिल्यास पाली बाजारपेठेतून चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा होईल. मात्र, विरोध झाल्यास बायपासचा पर्याय राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.