शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरण वाद पेटणार?

By admin | Updated: March 10, 2016 01:34 IST

निर्णयाकडे लक्ष : पालीत बायपासला व्यावसायिकांचा विरोधच

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय भूसंपादनाच्या विषयावरून वादग्रस्त बनला आहे. पाली येथून मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असतानाच रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाचे चौपदरीकरणही पालीतूनच होणार आहे. मात्र, जमीन संपादनाच्या विषयावरून पालीत दोन मतप्रवाह निर्माण झाले असून, पाली बाजारपेठेतून चौपदरीकरण होणार की बायपासचा पर्याय मान्य केला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पाली बाजारपेठेतूनच मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे. रस्ता रुंदीकरणासाठी १५ मीटर्स जागा देण्यास पालीतील ८० टक्के प्रकल्पग्रस्त व्यावसायिक व नागरिकांची तयार आहे, असा दावा पाली बाजारपेठेतील व्यावसायिक व नागरिकांच्या पाली विकास समिती अध्यक्ष सदानंद राऊत व पदाधिकारी अमेय वेल्हाळ यांनी बुधवारी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत केला. यावेळी समितीचे पदाधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामध्ये गोकुळ लिंगायत, विनोद रसाळ, भालचंद्र ढवळे, विलास राऊत, श्रीकांत राऊत, सुरेश ठाकुर, अशोक लिंगायत, चंद्रशेखर कोठावळे, उमेश शिंदे, सुमंत पालकर, भाऊ वेल्हाळ, मनोज कोलते, सुहास सुर्वे, चंद्रशेखर सुर्वे, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते. पालीतूनच चौपदरीकरण हवे, अशी भूमिका मांडताना जागेबाबत शिथिलता द्यावी, घाटातील रस्त्याबाबतचा निकष वापरावा, अशी मागणी असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाली बाजारपेठेची लांबी मुख्य रस्त्यावर ६०० मीटर्स असून, त्यातील दिडशे मीटर्समध्येच दुकाने, घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठीच घाटातील रुंदीकरणाचा निकष वापरून कमीत कमी जागा चौपदरीकरणासाठी घेतली जावी. बाजारपेठेतील साडेचारशे मीटर अंतरात मुळातच २५ मीटर्स अंतर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे तेथे समस्या नाहीत, असेही समितीतर्र्फे स्पष्ट करण्यात आले. दिडशे मीटर्समधील व्यावसायिकांची कमीत कमी जागा घेतली जावी, त्यांचा व्यवसायही टिकावा, हीच समितीची भूमिका आहे. बायपासला आपला विरोध असल्याचे निवेदन समितीतर्फे आमदार उदय सामंत यांना देण्यात आले आहे, तर खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही गुरुवारी (१० मार्च) बायपास नको, ही मागणी करणारे निवेदन दिले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.पालीतून बायपास नको, कमीत कमी जागा वापरून चौपदरीकरण व्हावे व ही बाजारपेठ टिकावी या मागणीसाठी समितीने अनेक मुद्दे मांडले आहेत. पालीतूनच चौपदरीकरण व्हावे. बायपासने अंतर वाढेल व मार्ग उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांर्च अधिक खर्च करावा लागेल. जमिन व वास्तू यांच्या निर्धारित दराप्रमाणे रक्कम ही ह्यमालकांना त्वरित दिली जावी आणि अन्य मागण्यांवरही विचार करावा, यासारख्या मुद्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)पालीतील सर्वच व्यावसायिकांनी बाजारपेठेतून कमीत कमी जागेत चौपदरीकरण व्हावे, यासाठी एकत्र यावे. आता मागणीच्या पूर्ततेसाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहनही समितीतर्फे करण्यात आले. पाली बाजारपेठेतून चौपदरीकरण न झाल्यास पाली बाजारपेठेचे अस्तित्वच संपुष्टात येईल. गेल्या काही वर्षात महामार्गावरील बाजारपेठा वाचविण्यासाठी बायपास काढले गेले. त्याठिकाणच्या बाजारपेठा ओस पडल्या आहेत, त्यांचे वैभव संपुष्टात आले आहे, सावंतवाडी बाजारपेठ हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. ...तर बायपासचा पर्याय?दुसरीकडे पालीतून चौपदरीकरण न करता बायपास काढावा, अशी मागणी तेथीलच काही व्यावसायिकांनी केली आहे. मात्र, चौपदरीकरणात अधिक प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिल्यास पाली बाजारपेठेतून चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा होईल. मात्र, विरोध झाल्यास बायपासचा पर्याय राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.