शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

चौपदरीकरण वाद पेटणार?

By admin | Updated: March 10, 2016 01:34 IST

निर्णयाकडे लक्ष : पालीत बायपासला व्यावसायिकांचा विरोधच

रत्नागिरी : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय भूसंपादनाच्या विषयावरून वादग्रस्त बनला आहे. पाली येथून मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत असतानाच रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गाचे चौपदरीकरणही पालीतूनच होणार आहे. मात्र, जमीन संपादनाच्या विषयावरून पालीत दोन मतप्रवाह निर्माण झाले असून, पाली बाजारपेठेतून चौपदरीकरण होणार की बायपासचा पर्याय मान्य केला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पाली बाजारपेठेतूनच मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे. रस्ता रुंदीकरणासाठी १५ मीटर्स जागा देण्यास पालीतील ८० टक्के प्रकल्पग्रस्त व्यावसायिक व नागरिकांची तयार आहे, असा दावा पाली बाजारपेठेतील व्यावसायिक व नागरिकांच्या पाली विकास समिती अध्यक्ष सदानंद राऊत व पदाधिकारी अमेय वेल्हाळ यांनी बुधवारी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत केला. यावेळी समितीचे पदाधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामध्ये गोकुळ लिंगायत, विनोद रसाळ, भालचंद्र ढवळे, विलास राऊत, श्रीकांत राऊत, सुरेश ठाकुर, अशोक लिंगायत, चंद्रशेखर कोठावळे, उमेश शिंदे, सुमंत पालकर, भाऊ वेल्हाळ, मनोज कोलते, सुहास सुर्वे, चंद्रशेखर सुर्वे, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते. पालीतूनच चौपदरीकरण हवे, अशी भूमिका मांडताना जागेबाबत शिथिलता द्यावी, घाटातील रस्त्याबाबतचा निकष वापरावा, अशी मागणी असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पाली बाजारपेठेची लांबी मुख्य रस्त्यावर ६०० मीटर्स असून, त्यातील दिडशे मीटर्समध्येच दुकाने, घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठीच घाटातील रुंदीकरणाचा निकष वापरून कमीत कमी जागा चौपदरीकरणासाठी घेतली जावी. बाजारपेठेतील साडेचारशे मीटर अंतरात मुळातच २५ मीटर्स अंतर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे तेथे समस्या नाहीत, असेही समितीतर्र्फे स्पष्ट करण्यात आले. दिडशे मीटर्समधील व्यावसायिकांची कमीत कमी जागा घेतली जावी, त्यांचा व्यवसायही टिकावा, हीच समितीची भूमिका आहे. बायपासला आपला विरोध असल्याचे निवेदन समितीतर्फे आमदार उदय सामंत यांना देण्यात आले आहे, तर खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन मेलद्वारे पाठविण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही गुरुवारी (१० मार्च) बायपास नको, ही मागणी करणारे निवेदन दिले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.पालीतून बायपास नको, कमीत कमी जागा वापरून चौपदरीकरण व्हावे व ही बाजारपेठ टिकावी या मागणीसाठी समितीने अनेक मुद्दे मांडले आहेत. पालीतूनच चौपदरीकरण व्हावे. बायपासने अंतर वाढेल व मार्ग उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांर्च अधिक खर्च करावा लागेल. जमिन व वास्तू यांच्या निर्धारित दराप्रमाणे रक्कम ही ह्यमालकांना त्वरित दिली जावी आणि अन्य मागण्यांवरही विचार करावा, यासारख्या मुद्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)पालीतील सर्वच व्यावसायिकांनी बाजारपेठेतून कमीत कमी जागेत चौपदरीकरण व्हावे, यासाठी एकत्र यावे. आता मागणीच्या पूर्ततेसाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहनही समितीतर्फे करण्यात आले. पाली बाजारपेठेतून चौपदरीकरण न झाल्यास पाली बाजारपेठेचे अस्तित्वच संपुष्टात येईल. गेल्या काही वर्षात महामार्गावरील बाजारपेठा वाचविण्यासाठी बायपास काढले गेले. त्याठिकाणच्या बाजारपेठा ओस पडल्या आहेत, त्यांचे वैभव संपुष्टात आले आहे, सावंतवाडी बाजारपेठ हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. ...तर बायपासचा पर्याय?दुसरीकडे पालीतून चौपदरीकरण न करता बायपास काढावा, अशी मागणी तेथीलच काही व्यावसायिकांनी केली आहे. मात्र, चौपदरीकरणात अधिक प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिल्यास पाली बाजारपेठेतून चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा होईल. मात्र, विरोध झाल्यास बायपासचा पर्याय राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.