शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आजपासून चार दिवस पावसाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून चार दिवस पावसाचे राहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नव्याने पेरणीसाठी शिवार तयार ...

कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून चार दिवस पावसाचे राहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नव्याने पेरणीसाठी शिवार तयार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे, तर भात, नाचणी, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफुलासह उन्हाळी पिकांच्या काढणी खोळंबणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

केरळ ते विदर्भ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने संपूर्ण राज्यभर सोमवारपर्यंत वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुपारपर्यंत कमालीचा उष्मा आणि त्यानंतर पावसाची हजेरी राहील, असेही संभाव्य अंदाजात म्हटले आहे. ढगाळ वातावरणही कायम राहणार आहे. दरम्यान, गुरुवारीही दिवसभर कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी बारापर्यंत कोंदट वातावरण होते. दुपारी एकपर्यंत सूर्यदर्शन झालेच नव्हते. पावसाची शक्यता, पण वातावरण निवळले. संध्याकाळी पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले.

गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार हजेरी लावलेल्या वादळी पावसामुळे मात्र खरीपपूर्व मशागतींना जोर आला आहे. पुढील चार दिवस पावसाचे असल्याचा अंदाज आल्याने तर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने वेगाने नांगरटी आणि सऱ्या सोडण्याचे काम हाती घेतले आहे. भात पिकासाठी धुळवाफ पेरणी करता जमिनी सपाटीकरण सुरू झाले आहे, तर तरवे टाकण्यासाठी वाफे तयार करण्याचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. उन्हाचा तडाखा असतानाही शेतकरी शिवारात घाम गाळतानाचे चित्र जागोजागी दृष्टीस पडत आहे.

ओलिताची बारमाही सोय उपलब्ध असलेल्या ठिकाणी उन्हाळी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. यात भात, नाचणी, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफूल, ज्वारी, मूग, उडीद, तीळ ही पिके जिल्ह्यात प्रामुख्याने घेतली जातात. आता या पिकांची काढणी सुरू आहे. एका बाजूला पेरणीसाठी नव्याने शिवार तयार करण्याचे तर आहे ते शिवार रिकामे करण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहे. पाऊस पाठ सोडत नसल्याने मोड येऊ नयेत म्हणून शेतातून कापणी करून आणून ते घराच्या परिसरात सुरक्षित आणून त्याची मळणी सुरू केल्याचेही चित्र सर्वत्र दृष्टीस पडत आहे.