शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून चार दिवस पावसाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून चार दिवस पावसाचे राहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नव्याने पेरणीसाठी शिवार तयार ...

कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून चार दिवस पावसाचे राहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नव्याने पेरणीसाठी शिवार तयार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे, तर भात, नाचणी, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफुलासह उन्हाळी पिकांच्या काढणी खोळंबणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

केरळ ते विदर्भ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने संपूर्ण राज्यभर सोमवारपर्यंत वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुपारपर्यंत कमालीचा उष्मा आणि त्यानंतर पावसाची हजेरी राहील, असेही संभाव्य अंदाजात म्हटले आहे. ढगाळ वातावरणही कायम राहणार आहे. दरम्यान, गुरुवारीही दिवसभर कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी बारापर्यंत कोंदट वातावरण होते. दुपारी एकपर्यंत सूर्यदर्शन झालेच नव्हते. पावसाची शक्यता, पण वातावरण निवळले. संध्याकाळी पुन्हा पावसाचे वातावरण तयार झाले.

गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार हजेरी लावलेल्या वादळी पावसामुळे मात्र खरीपपूर्व मशागतींना जोर आला आहे. पुढील चार दिवस पावसाचे असल्याचा अंदाज आल्याने तर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने वेगाने नांगरटी आणि सऱ्या सोडण्याचे काम हाती घेतले आहे. भात पिकासाठी धुळवाफ पेरणी करता जमिनी सपाटीकरण सुरू झाले आहे, तर तरवे टाकण्यासाठी वाफे तयार करण्याचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. उन्हाचा तडाखा असतानाही शेतकरी शिवारात घाम गाळतानाचे चित्र जागोजागी दृष्टीस पडत आहे.

ओलिताची बारमाही सोय उपलब्ध असलेल्या ठिकाणी उन्हाळी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. यात भात, नाचणी, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफूल, ज्वारी, मूग, उडीद, तीळ ही पिके जिल्ह्यात प्रामुख्याने घेतली जातात. आता या पिकांची काढणी सुरू आहे. एका बाजूला पेरणीसाठी नव्याने शिवार तयार करण्याचे तर आहे ते शिवार रिकामे करण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करीत आहे. पाऊस पाठ सोडत नसल्याने मोड येऊ नयेत म्हणून शेतातून कापणी करून आणून ते घराच्या परिसरात सुरक्षित आणून त्याची मळणी सुरू केल्याचेही चित्र सर्वत्र दृष्टीस पडत आहे.