शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आजरा तालुक्यातील वनसंवर्धन कमिट्या कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:28 IST

आजरा तालुका हा जंगलाने व्यापलेला असा निसर्गसंपन्न भाग आहे. जंगल हे या ठिकाणचे वैभव आहे. त्यांचे जतन करणे हे ...

आजरा तालुका हा जंगलाने व्यापलेला असा निसर्गसंपन्न भाग आहे. जंगल हे या ठिकाणचे वैभव आहे. त्यांचे जतन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. शासनाकडून यासाठी प्रत्येकवर्षी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यासाठी प्रत्येक गावातील संयुक्त वनसंरक्षण कमिटीच्या खात्यावर निधी पाठवला जातो. परंतु या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शासनाचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही. वनकमिट्या कागदावरच असून, त्यांचा सर्व कारभार त्या कमिटीचे सचिव वनपाल परस्पर करताना निदर्शनास येत आहेत. सदरच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती गठण करण्याची प्रक्रिया ही कायद्यातील मुद्द्याला सुसंगत नसल्याचे दिसत आहे. तरी तालुक्यातील सर्व संबंधित कमिट्यांची रचना व मागील आर्थिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षात झालेल्या खर्चाची तपासणी करून घेऊन संबंधित ग्रामपंचायतीकडे तपशिलाने कळवावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर सरपंच परिषद मुंबई शाखा अध्यक्ष संतोष बेलवाडे, उपाध्यक्ष यु. व्ही. जाधव, राज्य संघटक राजू पोतनीस, संभाजी सरदेसाई, सचिव अमोल बाबरे, जी. एम. पाटील, सुनील देसाई, लक्ष्मण गुडूळकर, लहू पाटील, मनीषा देसाई, वैशाली गुरव, मारुती मोरे यांच्यासह तालुक्यातील सरपंचांच्या सह्या आहेत.

फोटो ओळी : वनसंवर्धन कमिटी यांची रचना कायद्यानुसार करा, या मागणीचे निवेदन वनक्षेत्रपाल स्मिता डाके यांना देताना संतोष बेलवाडे, अमोल बांबरे, मनीष देसाई, वैशाली गुरव, जी. एम. पाटील, सुनील देसाई.

क्रमांक : ०३०९२०२१-गड-०३