शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा, कळंबा तलावाभोवतीची वनसंपदा घटतेय, तापमान वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:41 IST

अमर पाटील कळंबा : रंकाळा, कळंबा तलावाभोवती कधीकाळी मुबलक प्रमाणात असणाऱ्या वनसंपदेला प्रशासन विकासकांनी ...

अमर पाटील

कळंबा : रंकाळा, कळंबा तलावाभोवती कधीकाळी मुबलक प्रमाणात असणाऱ्या वनसंपदेला प्रशासन विकासकांनी कसेही ओरबाडल्याने कळंबा, रंकाळा तलावाभोवती असणारी वनसंपदा मोठ्या प्रमाणावर घटत आहे.

गेल्या काही दशकात जळाऊ लाकडांसाठी नागरी वस्त्या निर्माण करण्यासाठी विकासाचे कारण पुढे करत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. परिणामी येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आजमितीला प्रचंड तापमान वाढीने उपनगरांचा उन्हाळा असह्य होत आहे.

रंकाळा, कळंबा तलाव परिसरातील नैसर्गिक ठेवा जतन करण्याबाबतचे अज्ञान, वनीकरणाचे तोकडे प्रयत्न, तसेच निसर्गप्रेमींची अनास्था दिसून येते. १ जुलैला प्रसिद्धीपुरते वृक्षारोपण करण्यात पालिका प्रशासनासह काही सामाजिक संस्था हिरीरीने सहभागी होतात. पुढे लावलेल्या झाडांचे काय होते हे कुणालाच माहीत नसते. पर्यावरण कायदा, जैवविविधता कायदा याची पालिकेत अंमलबजावणी होत नाही. जैवविविधता कायद्यान्वये पालिकेत नागरिकांची जैवविविधता समिती अस्तित्वात आहे का, याचे उत्तर प्रशासनासच ठावूक.

प्रतिक्रिया...

रंकाळा तलावाभोवती चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्षलागवड व संवर्धनाबाबतीत निव्वळ प्रशासनावर अवलंबून न राहता, स्वतः नागरिकांनी पुढाकार घ्यावा. निसर्ग व पर्यावरणप्रेमींनी याबाबत जागरूकता दाखवावी.

- नगरसेवक शारंगधर देशमुख

उपनगरांच्या विकासासाठी रस्ते विकासासाठी विविध योजनांसाठी बेसुमार वृक्षांची तोड झाली, परंतु नव्याने वनसंपदा निर्माण करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. परिणामी उपनगरे बकाल होत आहेत. जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेलचे जलस्त्रोत कमी होत आहेत. प्रशासनाकडूनसुद्धा घनदाट सावली देणाऱ्या, पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या वृक्षांऐवजी शोभेच्या वृक्षांचे रोपण सुरू आहे. वृक्षतोडीने जैवविविधतेचे नुकसान झाल्याने पक्ष्यांचे स्थलांतर सुरू आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात उपनगरे तुंबून नागरी वस्तीत पाणी शिरत आहे. या गंभीर प्रश्नी आताच विचार व कृती नाही केली, तर भविष्यात मोठा धोका अटळ असल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.

चौकट

जैवविविधता समिती कुठे आहे

राज्य शासनाने पालिकेत जैवविविधता समिती नेमण्याचे आदेश दिले. पालिका क्षेत्रातील जलचर, जलसंपत्ती, वनसंपदा, नदी, नाले या माहितीचे तपशीलवार वर्गीकरण करत संवर्धन करणे हे समितीचे काम. पण तिचे अस्तित्व शून्य.

प्रतिक्रिया... - श्रध्दानंद रणदिवे, निसर्गप्रेमी

वृक्षांच्या कत्तलीने उपनगरांचे नुकसान होत आहे. तापमानवाढ, प्रदूषण, पाणीटंचाई आदी समस्या वाढत आहेत. विकासाच्या नावाखाली असेच सुरू राहिले, तर ऱ्हास अटळ आहे .त्यामुळे वृक्षलागवड व संवर्धन उपक्रमात नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सहभागी व्हावे

फोटो ओळ

कधीकाळी वृक्षांचे नंदनवन असणारा परिसर आज बकाल बनत आहे.