शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या वारसदारांकडून मोर्चेबांधणी

By admin | Updated: June 18, 2016 00:15 IST

जिल्हा परिषद अध्यक्षपद : जिल्ह्यातील राजकारण रंगतदार वळण घेणार; लढण्याचे अनेक पर्याय

आयुब मुल्ला --खोची --आगामी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने मातब्बर नेत्यांच्या वारसदारांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. सध्या नेत्यांमध्येच अंतर्गत राजकीय गटबाजी असल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची तयारी सुरु केली आहे. फक्त लढायचं कसं, पक्षातून, पक्षांतर करून की आघाडी करून? या मुद्यावर ते आता अडकले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण रंगतदार वळण घेईल, असे चित्र दिसत आहे.सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची सत्ता आहे. त्यांच्यामध्ये सध्या भयानक गटबाजी वाढली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या गटाकडे अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपद आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडे आहे. मात्र, गोकुळ दूध संघ, विधान परिषद निवडणुकीपासून काँग्रेसच्या या दोन नेत्यांच्या गटांमध्ये चांगलेच वितुष्ट आले आहे. यांच्याबरोबर सत्तेत सहभागी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बांधकाम सभापती व त्याच संघटनेच्या जिल्हा परिषद सदस्या (दोघेही शिरोळ तालुक्यातील) यांच्यात निधी वाटपावरून चांगलाच संघर्ष सुरू आहे. आरोपांमुळे त्यांच्यातील गटबाजी उघड झाली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटांची अशी अवस्था आहे, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकसंघपणाचा अभाव आहे. बहुतेक सदस्य स्वत:लाच नेते समजत आहेत. शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य यांची सदस्यसंख्या अल्प आहे. त्यामुळे विरोधक म्हणून म्हणावे तितके सभागृह प्रश्नांच्या भडिमाराने दणाणतच नाही. हा सर्व संदर्भ लिहिण्यामागे आगामी राजकारण कसे असेल, हे दिसून येते. पूर्वीसारखे अमुक पक्षाचेच तिकीट घेऊन लढले पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता असेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे नुसते अध्यक्षपद खुले झाले म्हणजे नेत्यांच्या वारसदारांचा तेथे नंबर लागेल, असा अंदाज बांधता येणार नाही. कारण दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रचंड सावध झाले आहेत. त्यांच्यापुढे चांगले पर्याय आहेत. त्यासाठी ऐनवेळी कोणतीही भूमिका ते घेऊ शकतात. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप, संघटना, जनसुराज्य या पक्षांच्या नेत्यांनी आपल्याच कुटुंबातील वारसदाराला प्रोजेक्ट करावे, अशी सद्य:स्थिती नाही. त्यांना कार्यकर्त्यांचाही विचार करावाच लागेल. कोणत्याही पक्ष, संघटनेत ऐक्य नाही. गटांतर्गत राजकारणाने त्यांना पोखरले आहे. अशावेळी स्वतंत्र आघाडी स्थापन करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती संयुक्तपणे लढविण्याचा विचार आघाड्यांमध्ये सुरू असल्याचे समजते. आघाडी बांधण्यासाठी पहिले पाऊल हातकणंगलेतून उचलले आहे. सर्व पक्षांतील नाराज, मातब्बर यांच्यावर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आघाड्यांचे पेव फुटणारतालुकानिहाय वेगवेगळ्या नावांच्या आघाड्या उदयास येतील. ज्या-त्या तालुक्यांत परिस्थितीनुरूप त्या नाव धारण करतील. यामुळे आघाड्यांचे पेव मात्र निश्चित फुटणार, हे स्पष्ट आहे. सत्तेवर येण्यासाठी आघाड्यांचीच गरज भासेल, असे सध्याचे चित्र दिसत आहे. नाराज झालेले पक्षांतर करतील, बंडखोरी करतील, आघाडी निर्माण करतील पण लढतील. कोण कोणासाठी थांबणार नाही, इतके पर्याय कार्यकर्त्यांसमोर आहेत.