शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

नेत्यांच्या वारसदारांकडून मोर्चेबांधणी

By admin | Updated: June 18, 2016 00:15 IST

जिल्हा परिषद अध्यक्षपद : जिल्ह्यातील राजकारण रंगतदार वळण घेणार; लढण्याचे अनेक पर्याय

आयुब मुल्ला --खोची --आगामी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने मातब्बर नेत्यांच्या वारसदारांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. सध्या नेत्यांमध्येच अंतर्गत राजकीय गटबाजी असल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची तयारी सुरु केली आहे. फक्त लढायचं कसं, पक्षातून, पक्षांतर करून की आघाडी करून? या मुद्यावर ते आता अडकले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण रंगतदार वळण घेईल, असे चित्र दिसत आहे.सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची सत्ता आहे. त्यांच्यामध्ये सध्या भयानक गटबाजी वाढली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या गटाकडे अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपद आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडे आहे. मात्र, गोकुळ दूध संघ, विधान परिषद निवडणुकीपासून काँग्रेसच्या या दोन नेत्यांच्या गटांमध्ये चांगलेच वितुष्ट आले आहे. यांच्याबरोबर सत्तेत सहभागी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बांधकाम सभापती व त्याच संघटनेच्या जिल्हा परिषद सदस्या (दोघेही शिरोळ तालुक्यातील) यांच्यात निधी वाटपावरून चांगलाच संघर्ष सुरू आहे. आरोपांमुळे त्यांच्यातील गटबाजी उघड झाली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटांची अशी अवस्था आहे, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकसंघपणाचा अभाव आहे. बहुतेक सदस्य स्वत:लाच नेते समजत आहेत. शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य यांची सदस्यसंख्या अल्प आहे. त्यामुळे विरोधक म्हणून म्हणावे तितके सभागृह प्रश्नांच्या भडिमाराने दणाणतच नाही. हा सर्व संदर्भ लिहिण्यामागे आगामी राजकारण कसे असेल, हे दिसून येते. पूर्वीसारखे अमुक पक्षाचेच तिकीट घेऊन लढले पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता असेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे नुसते अध्यक्षपद खुले झाले म्हणजे नेत्यांच्या वारसदारांचा तेथे नंबर लागेल, असा अंदाज बांधता येणार नाही. कारण दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रचंड सावध झाले आहेत. त्यांच्यापुढे चांगले पर्याय आहेत. त्यासाठी ऐनवेळी कोणतीही भूमिका ते घेऊ शकतात. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप, संघटना, जनसुराज्य या पक्षांच्या नेत्यांनी आपल्याच कुटुंबातील वारसदाराला प्रोजेक्ट करावे, अशी सद्य:स्थिती नाही. त्यांना कार्यकर्त्यांचाही विचार करावाच लागेल. कोणत्याही पक्ष, संघटनेत ऐक्य नाही. गटांतर्गत राजकारणाने त्यांना पोखरले आहे. अशावेळी स्वतंत्र आघाडी स्थापन करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती संयुक्तपणे लढविण्याचा विचार आघाड्यांमध्ये सुरू असल्याचे समजते. आघाडी बांधण्यासाठी पहिले पाऊल हातकणंगलेतून उचलले आहे. सर्व पक्षांतील नाराज, मातब्बर यांच्यावर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आघाड्यांचे पेव फुटणारतालुकानिहाय वेगवेगळ्या नावांच्या आघाड्या उदयास येतील. ज्या-त्या तालुक्यांत परिस्थितीनुरूप त्या नाव धारण करतील. यामुळे आघाड्यांचे पेव मात्र निश्चित फुटणार, हे स्पष्ट आहे. सत्तेवर येण्यासाठी आघाड्यांचीच गरज भासेल, असे सध्याचे चित्र दिसत आहे. नाराज झालेले पक्षांतर करतील, बंडखोरी करतील, आघाडी निर्माण करतील पण लढतील. कोण कोणासाठी थांबणार नाही, इतके पर्याय कार्यकर्त्यांसमोर आहेत.