शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

पाणलोट गैरव्यवहाराचा पाठपुरावा करू : शेट्टी

By admin | Updated: September 30, 2016 01:35 IST

जिल्हा सनियंत्रण समिती सभा : समितीला माहिती न देणाऱ्या विभागांबाबत थेट केंद्रालाच कळवू

कोल्हापूर : पाणलोट योजनेमधील पैसे खर्च झालेत, पण जागेवर कामे दिसत नाहीत. स्वत: फिरून पाहिल्यानंतरच हे बोलतोय. त्या पैशांचे नेमके काय झाले, अशी विचारणा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली; परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेट्टी यांनी या गैरव्यवहारप्रकरणी स्वत: पाठपुरावा करू, असा इशारा दिला. तसेच सनियंत्रण समितीला वेळेवर माहिती न देणाऱ्या विभागांची नावे थेट केंद्र सरकारला कळवू, अशी तराटणीही त्यांनी यावेळी दिली. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी तत्काळ संबंधित विभागांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी छत्रपती ताराराणी सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरीष जगताप, आदी मान्यवरांची होती.पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी नेमलेल्या पाणलोट जिल्हा समितीकडून व शासनाकडून कोणती कारवाई झाली? अशी विचारणा राजू शेट्टी यांनी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांच्यासह त्यांच्या सहायक कृषी अधिकाऱ्यांना केली. यावर समितीच्या सूचनेनुसार कारवाई झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले; गैरव्यवहाराची रक्कमही काही लहान नाही, योजनांवर खर्च झाला आहे, परंतु कामे जागेवर दिसत नाही, त्यामुळे आपण स्वत:च याचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले असून, यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविल्याचे स्पष्ट केले.जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, जिल्ह्यात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरिता शासन पातळीवर उसाचा नगदी पिकांमध्ये समावेश करण्याकरिता तसा ठराव सादर करावा. अधिकाऱ्यांनी केंद्राच्या योजनांसाठी पाठपुरावा करावाप्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा कार्यक्रम तसेच आवास योजना यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असून, त्यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी ग्राम पातळीवर प्रबोधन करावे. तसेच शिबिरांचे आयोजन करावे. छत्रपती शाहू टर्मिनस वास्तूला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या वास्तूची दुरुस्ती करणे आवश्यक असून, तसा प्रस्ताव केंद्राकडे सादर करावा, अशी सूचनाही खा.राजू शेट्टी यांनी यावेळी केली. अतिवृष्टीत शंभरकोटींचे नुकसानजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन अतिवृष्टीसंदर्भात आढावा घेतला आहे. यामध्ये शंभर कोटी रुपयांवर नुकसान झाले असून, याबाबतचा अहवाल शासनाला पाठवून जास्तीत जास्त रक्कम यासाठी आणण्यासाठी प्रयत्न करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. एक लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजना अनुज्ञेय असून, संंबंधितांना याचा लाभ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.