शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

शहरातील दुर्मीळ वृक्ष संवर्धनाचा वसा

By admin | Updated: April 23, 2015 00:37 IST

वसुंधरा दिनाचा उपक्रम : ३५० वृक्षांना लावणार फलक; नागरिकांतून करणार जागृती

कोल्हापूर : शहरातील रस्त्याच्या कडेला बागा, शिवाजी विद्यापीठ परिसर, कृषी विद्यापीठ परिसर, शेतवड, आदी ठिकाणी तब्बल ४० दुर्मीळ जातींचे ३५० वृक्ष दुर्लक्षित आहेत. या सर्व दुर्मीळ वृक्षांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड व अनिल चौगुले यांच्या पुढाकारातून बुधवारी ‘वसुंधरा दिना’चे औचित्य साधत फलक लावण्याच्या उपक्रमास सुरुवात झाली. यामुळे शहरातील दुर्मीळ वृक्षांच्या संवर्धनाचा वसा सुरू झाला.लक्ष्मीपुरीतील ‘लोकमत’ शहर कार्यालयाच्या दारात ‘रत्नकुंज’ या जातीचे शहरातील एकमेव झाड आहे. अशा प्रकारचे गोरखचिंच, सीता अशोक, कदंब, हनुमानफळ, टेंभुर्णी, बारतोंडी, सुकाणू, सातवी, जारूळ, टेठू, गोंदणी, चेसनेट, कापूर, अमृतफळ, करंबळी असे अनेक दुर्मीळ वृक्ष दुर्लक्षित आहेत. यातील अनेक वृक्ष शहरात एक किंवा दोनच आहेत. ही झाडे काही कारणांनी तोडली गेल्यास शहरातून त्यांचे अस्तित्वच संपणार आहे.शहरातील दुर्मीळ अशा ४० जातींच्या ३५० वृक्षांचे ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले व विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड यांनी संवर्धन करण्याचे ठरविले आहे. या वृक्षांना त्यांचे नाव व संरक्षित वृक्ष असा फलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे या वृक्षांचे महत्त्व शहरवासीयांना समजेल. या वृक्षांच्या बिया संकलित करून त्यांचे संवर्धन केले जाईल. अशा वृक्षांची काळजी घेऊन त्यांची वाढ केली पाहिजे, ही भावना शहरवासीयांत रुजेल, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे अनिल चौगुले यांनी स्पष्ट केले. या दुर्मीळ वृक्षांना फलक लावण्याचा तसेच त्यांचे संवर्धन करण्याचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, टाउन हॉल येथील दुर्मीळ वृक्षांना आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते असा फलक लावून या उपक्रमाची सुरुवात झाली. (प्रतिनिधी)