शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

शहरातील दुर्मीळ वृक्ष संवर्धनाचा वसा

By admin | Updated: April 23, 2015 00:37 IST

वसुंधरा दिनाचा उपक्रम : ३५० वृक्षांना लावणार फलक; नागरिकांतून करणार जागृती

कोल्हापूर : शहरातील रस्त्याच्या कडेला बागा, शिवाजी विद्यापीठ परिसर, कृषी विद्यापीठ परिसर, शेतवड, आदी ठिकाणी तब्बल ४० दुर्मीळ जातींचे ३५० वृक्ष दुर्लक्षित आहेत. या सर्व दुर्मीळ वृक्षांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड व अनिल चौगुले यांच्या पुढाकारातून बुधवारी ‘वसुंधरा दिना’चे औचित्य साधत फलक लावण्याच्या उपक्रमास सुरुवात झाली. यामुळे शहरातील दुर्मीळ वृक्षांच्या संवर्धनाचा वसा सुरू झाला.लक्ष्मीपुरीतील ‘लोकमत’ शहर कार्यालयाच्या दारात ‘रत्नकुंज’ या जातीचे शहरातील एकमेव झाड आहे. अशा प्रकारचे गोरखचिंच, सीता अशोक, कदंब, हनुमानफळ, टेंभुर्णी, बारतोंडी, सुकाणू, सातवी, जारूळ, टेठू, गोंदणी, चेसनेट, कापूर, अमृतफळ, करंबळी असे अनेक दुर्मीळ वृक्ष दुर्लक्षित आहेत. यातील अनेक वृक्ष शहरात एक किंवा दोनच आहेत. ही झाडे काही कारणांनी तोडली गेल्यास शहरातून त्यांचे अस्तित्वच संपणार आहे.शहरातील दुर्मीळ अशा ४० जातींच्या ३५० वृक्षांचे ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले व विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड यांनी संवर्धन करण्याचे ठरविले आहे. या वृक्षांना त्यांचे नाव व संरक्षित वृक्ष असा फलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे या वृक्षांचे महत्त्व शहरवासीयांना समजेल. या वृक्षांच्या बिया संकलित करून त्यांचे संवर्धन केले जाईल. अशा वृक्षांची काळजी घेऊन त्यांची वाढ केली पाहिजे, ही भावना शहरवासीयांत रुजेल, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे अनिल चौगुले यांनी स्पष्ट केले. या दुर्मीळ वृक्षांना फलक लावण्याचा तसेच त्यांचे संवर्धन करण्याचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, टाउन हॉल येथील दुर्मीळ वृक्षांना आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते असा फलक लावून या उपक्रमाची सुरुवात झाली. (प्रतिनिधी)