शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाणी नाही... ऊसतोडच जगण्याचा आधार

By admin | Updated: December 12, 2015 00:11 IST

व्यथा ऊसतोड मजुरांच्या : जन्मत: पडते गाठ कोयत्याशी; मुले शिक्षणापासून वंचित

रवींद्र येसादे -- उत्तूर--दुष्काळानं होरपळून गेलेल्या विदर्भ, मराठवाडा येथील ऊस मजुरांचे तांडे पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आॅक्टोबर महिन्यापासून आले आहेत. आपल्या गावात चारा नाही, पाणी नाही, ऊसतोडच आमच्या जगण्याचा आधार बनल्याची व्यथा ऊसतोड कामगारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.उत्तूर, चिमणे, झुलपेवाडी, धामणे या परिसरात विदर्भ, मराठवाड्यातील ऊस मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. यावर्षी पावसाचे अपुरे प्रमाण यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हिरवाई पाहून आनंद होतो, तो केवळ कारखाने सुरू असेपर्यंतच. गावाकडे जाताना इथल्या मातीला विसरून गावाकडे सुन्न मनाने जावे लागते.केवळ घर उघडे असावे म्हणून वृद्ध तेवढेच गावात आहेत. बाकीचे लहान मुले, महिला तरुण वर्गाच्या हातात ‘कोयताच’ नशिबी आला आहे. ऊस तोडणीवेळी भटकंती असते तशीच ती लहान मुलांची असते. त्यामुळे शाळा शिकणं दुरापास्त होऊन बसलं आहे. नकळत सहा वर्षांचा चिमुरडा हातात कोयता घेतो, हे वास्तव आहे.टोळीवरच्या महिलांची अवस्था तर फार केविलवाणी आहे. गुजेरी (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील टोळीतील महिला व्यथा मांडताना म्हणाल्या, स्त्रियांना पहाटे चार वाजता उठावे लागते. सहा वाजेपर्यंत जेवण आटोपून फडात जावे लागते.लेकरांना पहाटेची झोप मिळत नाही. सहा महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन जावे लागते. कधी झाडाच्या फांदीला पाळणा, तर कधी फडात, ट्रकच्या सावलीत निपचित पडावे लागते. रात्रीच्या वेळेस आईला सोडून बोचऱ्या थंडीत विव्हळत पडावे लागते. बिचाऱ्या बाळाला काही कळत नाही. माय मात्र डोकीवर मोळी घेत छकुल्याकडे पहात शेकोटीची बाळाला ऊब देत पावलं टाकीत असते. रात्रीत ऊस भरण्यासाठी वाहन केव्हा येईल याची खात्री नसते. या साऱ्या त्रासाचा सामना करावा लागतो. पहाट कधी होईल याकडेच लक्ष द्यावे लागते. ऊन, वारा, पाऊस या साऱ्यांचा सामना करावा लागतो.शिक्षण अपूर्णचजून ते आॅक्टोबरपर्यंतच मुलं शाळेत जातात. त्यानंतर मुल आई-वडिलांसमवेत फडामध्ये येतात. वारंवार कारखान्याकडून होणाऱ्या बदल्या, टोळीचे ठिकाण, कामाचे ठिकाण यामुळे मुलांच्या शाळेचा मेळ बसत नाही. त्यामुळे या मुलांचे शिक्षण अपुरेच राहते.पाच रुपयास एक घागर लातूर परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. पिण्यासाठी पाचरुपयास एक घागर पाणी मिळते. तुमच्याकडे पाणी, चारा मुबलक आहे. आमच्याकडे ऊस तोडून जनावरांना घालावा लागतो, अशी केविलवाणी प्रतिक्रिया महिला व्यक्त करतात.