शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांना गती देण्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:30 IST

कोल्हापूर - राधानगरी 55 कि.मी. भारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोदी सरकारने पाच वर्षांत अनेक घोषणा ...

कोल्हापूर - राधानगरी55 कि.मी.भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मोदी सरकारने पाच वर्षांत अनेक घोषणा केल्या आहे. त्यातील काहींची पूर्तता होत आहे. अजून बऱ्याच घोषणांची पूर्तता व्हायची आहे. त्याकरिता आणखी पाच वर्षे तरी या सरकारला संधी दिली पाहिजे, अशी स्पष्ट मतं कोल्हापूर -राधानगरी रस्त्यावर धावणाऱ्या एस. टी. बसमधील प्रवाशांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ मांडली. गत १५ वर्षांत जे जमले नाही ते पाच वर्षांत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा करणेदेखील चुकीचे असल्याचे अनेकांनी ठासून सांगितले.महिला मतदारांशी संवाद साधला असता, मतदान करणारच असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला. कोणत्या पक्षाला करायचे हे त्या दिवशीच ठरविणार असल्याचे कुर्डूच्या सावित्रीबाई पाटील यांनी सांगितले. राशिवडे येथील शेतकरी महिपती पाटील यांनी देशात विकास होत असल्याचे चित्र आहे. विकासासाठी पैसा दिला जात आहे; त्यामुळे रस्त्याची कामे होत आहेत, असे सांगितले. गुडाळचे दत्तात्रय पाटील यांनी केंद्र सरकारकडून विकासाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्जमाफी दिल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान असल्याचेही पाटील म्हणाले. राशिवडे येथील बाळू चांदणे यांनी मोदी सरकारच्या काळात खेडोपाडी रस्ते होत असल्याचे सांगत युवकांना रोजगाराच्या संधी वाढविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्तकेली.प्रचाराला जोर नाहीग्रामीण भागात प्रचाराचा जोर नसल्याचे दिसून आले. काही पुरुष प्रवासी मतदार निवडणुकीबाबत सजग झाले आहेत. महिला मतदारांपैकी अनेकांना उमेदवार कोण आहेत याचीही माहिती नाही.निवडणुकीचा अद्याप उत्साह नसल्याचेही दिसून आले. सगळे राजकीय नेते एका माळेची मणी असल्याचे सांगत राजकारण्यांवर प्रवासी राग व्यक्तकरत होते.