शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

विकासकामांना गती देण्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:30 IST

कोल्हापूर - राधानगरी 55 कि.मी. भारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोदी सरकारने पाच वर्षांत अनेक घोषणा ...

कोल्हापूर - राधानगरी55 कि.मी.भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मोदी सरकारने पाच वर्षांत अनेक घोषणा केल्या आहे. त्यातील काहींची पूर्तता होत आहे. अजून बऱ्याच घोषणांची पूर्तता व्हायची आहे. त्याकरिता आणखी पाच वर्षे तरी या सरकारला संधी दिली पाहिजे, अशी स्पष्ट मतं कोल्हापूर -राधानगरी रस्त्यावर धावणाऱ्या एस. टी. बसमधील प्रवाशांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ मांडली. गत १५ वर्षांत जे जमले नाही ते पाच वर्षांत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा करणेदेखील चुकीचे असल्याचे अनेकांनी ठासून सांगितले.महिला मतदारांशी संवाद साधला असता, मतदान करणारच असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला. कोणत्या पक्षाला करायचे हे त्या दिवशीच ठरविणार असल्याचे कुर्डूच्या सावित्रीबाई पाटील यांनी सांगितले. राशिवडे येथील शेतकरी महिपती पाटील यांनी देशात विकास होत असल्याचे चित्र आहे. विकासासाठी पैसा दिला जात आहे; त्यामुळे रस्त्याची कामे होत आहेत, असे सांगितले. गुडाळचे दत्तात्रय पाटील यांनी केंद्र सरकारकडून विकासाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्जमाफी दिल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान असल्याचेही पाटील म्हणाले. राशिवडे येथील बाळू चांदणे यांनी मोदी सरकारच्या काळात खेडोपाडी रस्ते होत असल्याचे सांगत युवकांना रोजगाराच्या संधी वाढविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्तकेली.प्रचाराला जोर नाहीग्रामीण भागात प्रचाराचा जोर नसल्याचे दिसून आले. काही पुरुष प्रवासी मतदार निवडणुकीबाबत सजग झाले आहेत. महिला मतदारांपैकी अनेकांना उमेदवार कोण आहेत याचीही माहिती नाही.निवडणुकीचा अद्याप उत्साह नसल्याचेही दिसून आले. सगळे राजकीय नेते एका माळेची मणी असल्याचे सांगत राजकारण्यांवर प्रवासी राग व्यक्तकरत होते.