शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विकासकामांना गती देण्यावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:30 IST

कोल्हापूर - राधानगरी 55 कि.मी. भारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोदी सरकारने पाच वर्षांत अनेक घोषणा ...

कोल्हापूर - राधानगरी55 कि.मी.भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मोदी सरकारने पाच वर्षांत अनेक घोषणा केल्या आहे. त्यातील काहींची पूर्तता होत आहे. अजून बऱ्याच घोषणांची पूर्तता व्हायची आहे. त्याकरिता आणखी पाच वर्षे तरी या सरकारला संधी दिली पाहिजे, अशी स्पष्ट मतं कोल्हापूर -राधानगरी रस्त्यावर धावणाऱ्या एस. टी. बसमधील प्रवाशांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ मांडली. गत १५ वर्षांत जे जमले नाही ते पाच वर्षांत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा करणेदेखील चुकीचे असल्याचे अनेकांनी ठासून सांगितले.महिला मतदारांशी संवाद साधला असता, मतदान करणारच असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला. कोणत्या पक्षाला करायचे हे त्या दिवशीच ठरविणार असल्याचे कुर्डूच्या सावित्रीबाई पाटील यांनी सांगितले. राशिवडे येथील शेतकरी महिपती पाटील यांनी देशात विकास होत असल्याचे चित्र आहे. विकासासाठी पैसा दिला जात आहे; त्यामुळे रस्त्याची कामे होत आहेत, असे सांगितले. गुडाळचे दत्तात्रय पाटील यांनी केंद्र सरकारकडून विकासाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्जमाफी दिल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान असल्याचेही पाटील म्हणाले. राशिवडे येथील बाळू चांदणे यांनी मोदी सरकारच्या काळात खेडोपाडी रस्ते होत असल्याचे सांगत युवकांना रोजगाराच्या संधी वाढविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्तकेली.प्रचाराला जोर नाहीग्रामीण भागात प्रचाराचा जोर नसल्याचे दिसून आले. काही पुरुष प्रवासी मतदार निवडणुकीबाबत सजग झाले आहेत. महिला मतदारांपैकी अनेकांना उमेदवार कोण आहेत याचीही माहिती नाही.निवडणुकीचा अद्याप उत्साह नसल्याचेही दिसून आले. सगळे राजकीय नेते एका माळेची मणी असल्याचे सांगत राजकारण्यांवर प्रवासी राग व्यक्तकरत होते.