शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

मुख्य बसस्थानकावर चक्का जाम

By admin | Updated: August 30, 2016 00:09 IST

स्वाभिमान रिक्षा संघटनेचे आंदोलन : बेकायदेशीर प्रवासी वाहतूक रोखण्याचे आश्वासन

कोल्हापूर : शहरात वाढलेली बेकायदेशीर वाहतूक, तसेच रिक्षांचा ‘बुलाव डाव’ संदर्भात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी स्वाभिमान रिक्षाचालक - मालक संघटनेने मध्यवर्ती बसस्थानक चौकात रस्त्यावर आडव्या रिक्षा उभ्या करून चक्का जाम आंदोलन केले. यावेळी पोलिस आणि आरटीओच्या खात्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक निरीक्षक अमित गुरव यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारून या बेकायदेशीर वाहतुकीवर आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.कोल्हापूर शहरात वाढलेली बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, अ‍ॅपे रिक्षा, सहा सिटर रिक्षा, बुलाव डाव यासंदर्भात पोलिस खाते, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना वेळोवेळी निवेदन देऊनही संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अधिकृत रिक्षा थांबा असताना काही रिक्षाचालक या स्टॉपबाहेर रिक्षा लावून नंबरातील गाडीच्या चालकांना दमदाटी करून त्यांचे प्रवासी घेऊन जातात. त्यामुळे थांब्यावरील नंबरातील रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे. त्या विरोधात कारवाई होत नसल्याने हे चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याचे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर व रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण घोरपडे यांनी सांगितले. सुमारे अर्धा तास चक्का जाम आंदोलन केल्यामुळे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ घटनास्थळी आले. परंतु, आंदोलन मागे घेण्यात आले नाही. अखेर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक अमित गुरव हे घटनास्थळी आले. त्यांनी बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर आठवड्यात नियोजन करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद वडगावकर, महेश जाधव, मधुकर दिंडे, अमोल पांढरे, सुनील कांबळे, अनिल लांबोरे, बाळू सदिगले, महादेव गायकवाड, शिवाजी पुजारी, भगवान गायकवाड, आदी रिक्षा व्यावसायिक आपल्या रिक्षा घेऊन सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)वाहतुकीची कोंडीनेहमी वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक चक्का जाम आंदोलनामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली. यामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक बस गाड्या स्थानकातच थांबून राहिल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होण्यास किमान तासभर लागला.