शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

मुख्य बसस्थानकावर चक्का जाम

By admin | Updated: August 30, 2016 00:09 IST

स्वाभिमान रिक्षा संघटनेचे आंदोलन : बेकायदेशीर प्रवासी वाहतूक रोखण्याचे आश्वासन

कोल्हापूर : शहरात वाढलेली बेकायदेशीर वाहतूक, तसेच रिक्षांचा ‘बुलाव डाव’ संदर्भात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी स्वाभिमान रिक्षाचालक - मालक संघटनेने मध्यवर्ती बसस्थानक चौकात रस्त्यावर आडव्या रिक्षा उभ्या करून चक्का जाम आंदोलन केले. यावेळी पोलिस आणि आरटीओच्या खात्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक निरीक्षक अमित गुरव यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारून या बेकायदेशीर वाहतुकीवर आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.कोल्हापूर शहरात वाढलेली बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, अ‍ॅपे रिक्षा, सहा सिटर रिक्षा, बुलाव डाव यासंदर्भात पोलिस खाते, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना वेळोवेळी निवेदन देऊनही संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अधिकृत रिक्षा थांबा असताना काही रिक्षाचालक या स्टॉपबाहेर रिक्षा लावून नंबरातील गाडीच्या चालकांना दमदाटी करून त्यांचे प्रवासी घेऊन जातात. त्यामुळे थांब्यावरील नंबरातील रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे. त्या विरोधात कारवाई होत नसल्याने हे चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याचे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर व रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण घोरपडे यांनी सांगितले. सुमारे अर्धा तास चक्का जाम आंदोलन केल्यामुळे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ घटनास्थळी आले. परंतु, आंदोलन मागे घेण्यात आले नाही. अखेर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक अमित गुरव हे घटनास्थळी आले. त्यांनी बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर आठवड्यात नियोजन करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद वडगावकर, महेश जाधव, मधुकर दिंडे, अमोल पांढरे, सुनील कांबळे, अनिल लांबोरे, बाळू सदिगले, महादेव गायकवाड, शिवाजी पुजारी, भगवान गायकवाड, आदी रिक्षा व्यावसायिक आपल्या रिक्षा घेऊन सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)वाहतुकीची कोंडीनेहमी वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक चक्का जाम आंदोलनामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली. यामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक बस गाड्या स्थानकातच थांबून राहिल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होण्यास किमान तासभर लागला.