शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

मुख्य बसस्थानकावर चक्का जाम

By admin | Updated: August 30, 2016 00:09 IST

स्वाभिमान रिक्षा संघटनेचे आंदोलन : बेकायदेशीर प्रवासी वाहतूक रोखण्याचे आश्वासन

कोल्हापूर : शहरात वाढलेली बेकायदेशीर वाहतूक, तसेच रिक्षांचा ‘बुलाव डाव’ संदर्भात कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी स्वाभिमान रिक्षाचालक - मालक संघटनेने मध्यवर्ती बसस्थानक चौकात रस्त्यावर आडव्या रिक्षा उभ्या करून चक्का जाम आंदोलन केले. यावेळी पोलिस आणि आरटीओच्या खात्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक निरीक्षक अमित गुरव यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारून या बेकायदेशीर वाहतुकीवर आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.कोल्हापूर शहरात वाढलेली बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, अ‍ॅपे रिक्षा, सहा सिटर रिक्षा, बुलाव डाव यासंदर्भात पोलिस खाते, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना वेळोवेळी निवेदन देऊनही संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अधिकृत रिक्षा थांबा असताना काही रिक्षाचालक या स्टॉपबाहेर रिक्षा लावून नंबरातील गाडीच्या चालकांना दमदाटी करून त्यांचे प्रवासी घेऊन जातात. त्यामुळे थांब्यावरील नंबरातील रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे. त्या विरोधात कारवाई होत नसल्याने हे चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याचे स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर व रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण घोरपडे यांनी सांगितले. सुमारे अर्धा तास चक्का जाम आंदोलन केल्यामुळे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ घटनास्थळी आले. परंतु, आंदोलन मागे घेण्यात आले नाही. अखेर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक अमित गुरव हे घटनास्थळी आले. त्यांनी बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर आठवड्यात नियोजन करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद वडगावकर, महेश जाधव, मधुकर दिंडे, अमोल पांढरे, सुनील कांबळे, अनिल लांबोरे, बाळू सदिगले, महादेव गायकवाड, शिवाजी पुजारी, भगवान गायकवाड, आदी रिक्षा व्यावसायिक आपल्या रिक्षा घेऊन सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)वाहतुकीची कोंडीनेहमी वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक चक्का जाम आंदोलनामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली. यामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक बस गाड्या स्थानकातच थांबून राहिल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होण्यास किमान तासभर लागला.