शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर फुलली वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

कोल्हापूर : साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग शिवाजी विद्यापीठात झाला आहे. कमी खर्चात नैसर्गिक पद्धतीने वृक्षारोपण ...

कोल्हापूर : साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग शिवाजी विद्यापीठात झाला आहे. कमी खर्चात नैसर्गिक पद्धतीने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाला बळ देण्याचे काम या प्रयोगातून झाले आहे. गेल्या नऊ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपांची त्यांच्या वाणानुसार १७ ते १८ फुटांपर्यंत वाढ झाली आहे.

दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. मात्र, या रोपणाच्या प्रमाणात झाडे वाढताना दिसत नाहीत. हे लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठामध्ये सन २०१३ मध्ये प्रयोगात्मक वृक्ष लागवड करण्याचा तत्कालीन प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी निर्णय घेतला. या प्रयोगाची जबाबदारी उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्यावर सोपविली. त्यांनी उद्यान अधीक्षक बाबा कदम आणि कर्मचाऱ्यांच्या साथीने काम सुरू केले. या सर्वांनी या वृक्षारोपणासाठी खडकाळ, माळरान आणि एकही झाड नसलेल्या दूरशिक्षण केंद्रापासून प्रवेशद्वार क्रमांक सहाकडे जाणाऱ्या रस्त्यामधील त्रिकोणी माळ निवडला. या परिसरात खोल खड्डे काढून त्यातील मुरूम, माती मोकळी केली. पाऊस पडेपर्यंत हे खड्डे तसेच ठेवले. या माळावरील मुरमाड जमिनीवर साग, लाल भुगा मुरूम असणाऱ्या जमिनीवर चिंच, करंज, कडुनिंब आणि जांभूळ, तर कडक मुरूम असणाऱ्या जमिनीवर शिसमची झाडे लावली. त्यांची उंची एक फुटापेक्षा कमी होती. एकूण साडेआठ एकराच्या परिसरामध्ये एक हजार झाडे लावली. दोन झाडांमध्ये मोठे अंतर ठेवले. खड्डे खोदणे, वृक्ष लागवड आणि पहिल्या वर्षी बुंध्यातील माती हलवणे या तीन कामासाठीच काय तो खर्च आला. खड्डे भरण्यासाठी तीच माती किंवा मुरूम वापरल्याने पावसाळा संपल्यानंतर झाडांच्या खड्ड्यात भेगा पडलेल्या आढळल्या नाहीत. पावसाळा संपण्यापूर्वीच या झाडांच्या बुंध्यातील माती हलवली असल्याने भेगा पडल्या नाहीत किंवा त्या वाढल्या नाहीत. उष्ण हवेचा मुळांशी संपर्क होणे टळले. त्यामुळे झाडांचे जगण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहिले.

चौकट

नैसर्गिक संसाधनांनी झाडे वाढविली

लहानपणापासून झाडे लावण्याची पाहिलेली पद्धत आणि वृक्ष लागवडीसाठी सांगण्यात येणारी पद्धत वेगळी असल्याने जरा वेगळा प्रयोग करण्याचे आम्ही ठरवले. नैसर्गिक संसाधनाचा वापर करून कमी खर्चात केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याचे समाधान वाटते, असे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सांगितले. उन्हाळा सुरू झाल्यानंतर केवळ त्या झाडांच्या बुंध्यांमध्ये भेगा पडणार नाहीत, याची दक्षता घेतली. या झाडांना गेल्या आठ वर्षांत एकदाही पाणी घातलेले नाही. त्यांना नैसर्गिक संसाधनासह वाढू दिले. झाडांची वाढ हळू होत होती. मात्र झाडांचे मरण्याचे प्रमाण अगदी कमी होते. काही वनस्पती खडकाळ जागी उगवणाऱ्या, त्याही पूर्वीप्रमाणेच येत आहेत. त्यामुळे जैवविविधता अबाधित राहिली. येथे लावलेल्या रोपांतील ९० टक्के रोपांचे वृक्षात रूपांतर झाले असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

फोटो (०४०६२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ वनराई ०१, ०२,०३) : शिवाजी विद्यापीठात नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि कमीत कमी खर्चात साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग झाला आहे.

===Photopath===

040621\04kol_3_04062021_5.jpg~040621\04kol_4_04062021_5.jpg~040621\04kol_5_04062021_5.jpg

===Caption===

फोटो (०४०६२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ वनराई ०१, ०२,०३) : शिवाजी विद्यापीठात नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि कमीत कमी खर्चात साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग  झाला आहे.~फोटो (०४०६२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ वनराई ०१, ०२,०३) : शिवाजी विद्यापीठात नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि कमीत कमी खर्चात साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग  झाला आहे.~फोटो (०४०६२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ वनराई ०१, ०२,०३) : शिवाजी विद्यापीठात नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि कमीत कमी खर्चात साडेआठ एकराच्या खडकाळ माळावर वनराई फुलविण्याचा यशस्वी प्रयोग  झाला आहे.