शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

महापूर ओसरला.. दुबार पीक कोणते घ्यायचे याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : महापुराने खरीप हंगामातील पिकांची पुरती वाट लागली. आता यापुढे काय पीक घेता ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : महापुराने खरीप हंगामातील पिकांची पुरती वाट लागली. आता यापुढे काय पीक घेता येईल याची चर्चा शेतकरी करू लागला. विशेष म्हणजे याबाबतीत कृषी विभागाकडे मार्गदर्शक सूचनांची वानवाच आहे. पंचनामे करायच्या नादात पीक कोणते घ्यायचे याचे मार्गदर्शन प्रभावी करणे मुश्कील झाले आहे. तरीसुद्धा मूग,सोयाबीन,मका ही पिके घेण्याचाच पर्याय समोर दिसत आहे.त्यामुळे कडधान्य हाच उत्पन्नाचा थोडा आधार बनण्याची शक्यता आहे. हातकणंगले तालुक्यात सुमारे २७७५ हेक्टर क्षेत्रावर असा प्रयोग होऊ शकतो. तर दोन हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागण करता येऊ शकते, असे कृषी विभागाचा कयास आहे.

शेती ही हवामानावर अवलंबून आहे.योग्य वेळी योग्य पाऊस झाला तर पिकाचे उत्पादन भरघोस येते.पण जुलैमध्ये अतिवृष्टी होऊन महापूर आला. हातकणंगले तालुक्यातील ११ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले. खरीप हंगामातील पिके यामुळे उद‌्ध्वस्त झाली. सर्वाधिक उसाचे क्षेत्र बाधित झाले. सोयाबीन,भुईमूग पिकाचे अस्तित्वच नाहिसे झाले.

पूर ओसरल्यानंतर झालेल्या पिकांच्या नुकसानीचे चित्र पाहून हबकला. शासन काय मदत करणार या चिंतेत व्यस्त झाला. पण अजूनही पंचनामेच सुरू आहेत. भरपाईची नेमकी आकडेवारी सांगता येत नाही. चिंताग्रस्त अवस्थेतच तो आगामी कालखंडासाठी काय पीक घेता येईल.याची विचारपूस शेतकरी करू लागला आहे.पण ठोस माहिती मिळणे अवघड झाले आहे.

हातकणंगले तालुक्यात महापूर व अतिवृष्टीने सुमारे चाळीस गावातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये १ हजार ५०० हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे. भुईमुगाचे १ हजार२७५ हेक्टर क्षेत्र आहे. म्हणजे या दोन्ही क्षेत्रात आता कमी कालावधीचे उडीद,मूग,मका(आफ्रिकन स्टॉल)ही कमी कालावधीत येणारी पिके घेता येणे शक्य असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.ही पिके साठ दिवसांची आहेत. पण खर्चिक असून उत्पन्नदानाची हमी नाही.धाडसाने काही ठिकाणी शेतकरी हा प्रयोग करू पाहत आहेत. सोयाबीनही टोकण्याचे धाडस होताना दिसत आहे.

उसाचे बाधित क्षेत्र आठ हजार हेक्टर आहे.यापैकी दोन महिन्यांपूर्वी लागण केलेल्या उसाचे दीड हजार क्षेत्र समाविष्ट आहे.या क्षेत्रात पुन्हा उसाच्या रोपाची लागण करता येणे शक्य असल्याचे कृषी विभागाचे मत आहे.

पण शासनाचा कृषी विभाकडे अजूनही महापुरानंतर पिके घेता येतील काय?यासंदर्भात कसल्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी स्वतःच्या अभ्यासानुसार पीक घेता येते का या तयारीत आहे.