शहरं
Join us  
Trending Stories
1
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
4
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
5
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
6
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
7
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
8
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
9
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
10
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
11
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
12
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
13
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
14
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
16
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
17
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
18
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
19
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
20
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

महापूर ओसरला.. दुबार पीक कोणते घ्यायचे याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : महापुराने खरीप हंगामातील पिकांची पुरती वाट लागली. आता यापुढे काय पीक घेता ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : महापुराने खरीप हंगामातील पिकांची पुरती वाट लागली. आता यापुढे काय पीक घेता येईल याची चर्चा शेतकरी करू लागला. विशेष म्हणजे याबाबतीत कृषी विभागाकडे मार्गदर्शक सूचनांची वानवाच आहे. पंचनामे करायच्या नादात पीक कोणते घ्यायचे याचे मार्गदर्शन प्रभावी करणे मुश्कील झाले आहे. तरीसुद्धा मूग,सोयाबीन,मका ही पिके घेण्याचाच पर्याय समोर दिसत आहे.त्यामुळे कडधान्य हाच उत्पन्नाचा थोडा आधार बनण्याची शक्यता आहे. हातकणंगले तालुक्यात सुमारे २७७५ हेक्टर क्षेत्रावर असा प्रयोग होऊ शकतो. तर दोन हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागण करता येऊ शकते, असे कृषी विभागाचा कयास आहे.

शेती ही हवामानावर अवलंबून आहे.योग्य वेळी योग्य पाऊस झाला तर पिकाचे उत्पादन भरघोस येते.पण जुलैमध्ये अतिवृष्टी होऊन महापूर आला. हातकणंगले तालुक्यातील ११ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले. खरीप हंगामातील पिके यामुळे उद‌्ध्वस्त झाली. सर्वाधिक उसाचे क्षेत्र बाधित झाले. सोयाबीन,भुईमूग पिकाचे अस्तित्वच नाहिसे झाले.

पूर ओसरल्यानंतर झालेल्या पिकांच्या नुकसानीचे चित्र पाहून हबकला. शासन काय मदत करणार या चिंतेत व्यस्त झाला. पण अजूनही पंचनामेच सुरू आहेत. भरपाईची नेमकी आकडेवारी सांगता येत नाही. चिंताग्रस्त अवस्थेतच तो आगामी कालखंडासाठी काय पीक घेता येईल.याची विचारपूस शेतकरी करू लागला आहे.पण ठोस माहिती मिळणे अवघड झाले आहे.

हातकणंगले तालुक्यात महापूर व अतिवृष्टीने सुमारे चाळीस गावातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये १ हजार ५०० हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे. भुईमुगाचे १ हजार२७५ हेक्टर क्षेत्र आहे. म्हणजे या दोन्ही क्षेत्रात आता कमी कालावधीचे उडीद,मूग,मका(आफ्रिकन स्टॉल)ही कमी कालावधीत येणारी पिके घेता येणे शक्य असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.ही पिके साठ दिवसांची आहेत. पण खर्चिक असून उत्पन्नदानाची हमी नाही.धाडसाने काही ठिकाणी शेतकरी हा प्रयोग करू पाहत आहेत. सोयाबीनही टोकण्याचे धाडस होताना दिसत आहे.

उसाचे बाधित क्षेत्र आठ हजार हेक्टर आहे.यापैकी दोन महिन्यांपूर्वी लागण केलेल्या उसाचे दीड हजार क्षेत्र समाविष्ट आहे.या क्षेत्रात पुन्हा उसाच्या रोपाची लागण करता येणे शक्य असल्याचे कृषी विभागाचे मत आहे.

पण शासनाचा कृषी विभाकडे अजूनही महापुरानंतर पिके घेता येतील काय?यासंदर्भात कसल्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी स्वतःच्या अभ्यासानुसार पीक घेता येते का या तयारीत आहे.