शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महापुराने उद्योगांची धडधड थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : महापुराने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) उद्योगांची धडधड थांबली आहे. बंद असलेला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, ...

कोल्हापूर : महापुराने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) उद्योगांची धडधड थांबली आहे. बंद असलेला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, खंडित झालेला वीजपुरवठा आणि कामगारांची अनुपस्थिती या अडचणीमुळे गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश कारखान्यातील कामे बंद आहेत.

कोरोनाच्या नियमांचे पालन करीत जिल्ह्यातील शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील कारखाने, मशिन शॉप, फौंड्री सुरू आहेत. कोरोनाच्या काळातही या औद्योगिक वसाहतींमधील कामाचे प्रमाण चांगले आहे. उद्योगचक्राची गती वाढत असतानाच गेल्या तीन दिवसांमध्ये कोल्हापुरात झालेल्या जोरदार पावसामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील या प्रमुख चार औद्योगिक वसाहतींचा पाणी आणि काहीवेळा वीजपुरवठा खंडित झाला आहे. विविध ठिकाणी पाणी असल्याने मार्ग बंद आहेत. त्यामुळे कामगारांना त्यांच्या कारखान्यामध्ये येणे शक्य झालेले नाही. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली आणि कागलपासून पुढे काही अंतरावर महापुराचे पाणी आल्याने तेथील मालवाहतूक बंद आहे. या सर्व कारणांमुळे बहुतांश उद्योगांची धडधड थांबली आहे. शिवाजी उद्यमनगरमधील ओढ्यालगतच्या काही कारखान्यांमध्ये पाणी शिरले आहे. येथील बहुतांश कारखान्यातील काम बंद आहे. पुराचे पाणी ओसरण्याकडे उद्योजक, कामगारांच्या नजरा लागल्या आहेत.

चौकट

शिरोली एमआयडीसीला शंभर कोटींचा फटका

शिरोली एमआयडीसीतील ८० टक्के उद्योग बंद आहेत. किरकोळ स्वरूपात काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गासह शहराला जोडणाऱ्या मार्गावर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद आहेत. कामगार हे आपापल्या गावांमध्ये अडकले आहेत. या स्थितीमुळे एमआयडीसीला सुमारे शंभर कोटींचा फटका बसला असल्याचे ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी रविवारी सांगितले.

प्रतिक्रिया

महापुराच्या स्थितीमुळे गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील साधारणत: ५५ टक्के उद्योग सुरू आहेत. पाणीपुरवठा बंद आहे. वीजपुरवठा काहीवेळा खंडित होत आहे. महामार्ग बंद असल्याने कच्च्या मालाची आयात आणि तयार उत्पादनांची निर्यात थांबली आहे. या एमआयडीसीला सुमारे दीडशे कोटींचा फटका बसला आहे.

-श्रीकांत पोतनीस, अध्यक्ष, गोशिमा.

महापुराचा उद्योगांना फटका बसला आहे. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील निम्म्याहून अधिक कारखाने, उद्योग बंद आहेत. उर्वरित उद्योगांतील कामाची गती मंदावली आहे.

-गोरख माळी, अध्यक्ष, मॅक

औद्योगिक वसाहतनिहाय आकडेवारी

वसाहत उद्योग कामगार

शिवाजी उद्यमनगर ८५० १००००

शिरोली १००० ३००००

गोकुळ शिरगाव ८०० १५०००

कागल-हातकणंगले ४५० ४००००