शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात महापूर; धो-धो पाऊस; ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरूच असून विविध धरणांतूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने कोल्हापूरसह जिल्ह्यातील पूरस्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरूच असून विविध धरणांतूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने कोल्हापूरसह जिल्ह्यातील पूरस्थिती २०१९ पेक्षाही गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचाही संपर्क तुटला आहे. पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली (ता. हातकणंगले) येथे महापुराचे पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर शहराचा संपर्क तुटला आहे.

कोल्हापूरजवळच्या राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची ४३ फूट पाणी पातळी धोक्याचा इशारा मानली जाते. गुरुवारी रात्री १२ वाजता ही पातळी गाठली गेली होती. तर शुक्रवारी सायंकाळी ही पातळी ५४ फुटांपर्यंत गेली होती. जिल्ह्यातील १२५ हून अधिक बंधाऱ्यांवर पाणी आले असून ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाणी शिरल्याने हे कार्यालय जिल्हा परिषदेत हलवण्यात आले आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अजूनही राधानगरीसह अन्य काही धरणांचे दरवाजे उघडलेले नाहीत. ते उघडल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे.

कोल्हापुरात अनेक मोठ्या रुग्णालयांमध्येही पाणी गेले असून तेथील रुग्ण हलवताना नातेवाईक, कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. भुदरगड तालुक्यातील पांगिरे येथील पुलावर अडकलेल्या ट्रव्ह्लरमधून................. ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. तर कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील कर्नाटकच्या बसमधून १५ हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आली. एनडीआरएफच्या दोन टीम गुरुवारी तर एक टीम शुक्रवारी दाखल झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पूर आणि भरलेला रंकाळा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याने अनेक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. अखेर केवळ शासकीय वाहने आणि आपत्कालीन यंत्रणेतील वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

--------------------------------

सांगलीत ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटला, कृष्णा, वारणेला पूर

सांगली : जिल्ह्याला शुक्रवारी दिवसभर पावसाने झोडपले. सांगली शहरासह पश्चिम भागातील गावांना पुराचा तडाखा बसला. सांगलीत कृष्णेचे पाणी संध्याकाळपर्यंत पात्रातच होते, पण ४० हून अधिक गावांचा संपर्क मात्र तुटला होता.

चिकुर्डेसह काही ठिकाणी जनावरे पुरात वाहून गेली. डिग्रज, मौजे डिग्रजचा, ब्रह्मनाळ गावांचा संपर्क तुटला. पुराची शक्यता पाहून सांगली एसटी आगारातील ९८ बसेस तासगाव, इस्लामपूर, मिरज व चंदनवाडी कार्यशाळेत हलवण्यात आल्या. भिलवडीमध्ये बाजारपेठेत पाणी शिरले होते. सुखवाडी, चोपडेवाडी, भुवनेश्वरवाडीचा संपर्क सकाळीच तुटला. मांगले परिसरात महापुराने २००५ व २०१९ चे विक्रम मोडले आहेत. वाळव्यात कणेगाव व भरतवाडीत नागरिकांनी जनावरांसह गाव सोडले. चांदोलीत २४ तासांत ५७४ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासूनच्या २४ तासांत तब्बल ५७४ मिलिमीटर पाऊस कोसळला. धरणातील पाणीपातळी सव्वापाच मीटरने वाढली. पाणीसाठा १३.५ टीएमसीने वाढला. त्यामुळे सांगलीकरांच्या चिंतेत भर पडली. सांगलीत आयर्विन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ६ वाजता कृष्णेची पाणीपातळी ३८ फूट होती, दुपारी दोनपर्यंत ती ४३ फुटांपर्यंत गेली. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी, शिवशंभो चौक, जुना बुधगाव रस्ता आदी भागांत पाणी शिरले. कृष्णेची पाणीपातळी ५२ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली. या पातळीला सांगली शहराला महापुराचा फटका बसतो, त्यामुळे प्रमुख बाजारपेठांतील व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी करायला सकाळपासूनच सुरुवात केली होती.

--------------------------------

सातारा जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासात नवजा येथे ७४६ तर कोयना येथे ६१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्येही ५५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. महाबळेश्वरमधील आंबेनळी घाट बंद असून पोलादपूरकडे जाणारा रस्ता २० फूट खाली खचला आहे. त्यामुळे पाहणीसाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील काही काळ अडकून पडल्या होत्या. कोयना धरणातून सध्या ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून कऱ्हाड शहरात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे.