शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कोल्हापुरात महापूर; धो-धो पाऊस; ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरूच असून विविध धरणांतूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने कोल्हापूरसह जिल्ह्यातील पूरस्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरूच असून विविध धरणांतूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने कोल्हापूरसह जिल्ह्यातील पूरस्थिती २०१९ पेक्षाही गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचाही संपर्क तुटला आहे. पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली (ता. हातकणंगले) येथे महापुराचे पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर शहराचा संपर्क तुटला आहे.

कोल्हापूरजवळच्या राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची ४३ फूट पाणी पातळी धोक्याचा इशारा मानली जाते. गुरुवारी रात्री १२ वाजता ही पातळी गाठली गेली होती. तर शुक्रवारी सायंकाळी ही पातळी ५४ फुटांपर्यंत गेली होती. जिल्ह्यातील १२५ हून अधिक बंधाऱ्यांवर पाणी आले असून ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाणी शिरल्याने हे कार्यालय जिल्हा परिषदेत हलवण्यात आले आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अजूनही राधानगरीसह अन्य काही धरणांचे दरवाजे उघडलेले नाहीत. ते उघडल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे.

कोल्हापुरात अनेक मोठ्या रुग्णालयांमध्येही पाणी गेले असून तेथील रुग्ण हलवताना नातेवाईक, कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. भुदरगड तालुक्यातील पांगिरे येथील पुलावर अडकलेल्या ट्रव्ह्लरमधून................. ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. तर कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील कर्नाटकच्या बसमधून १५ हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आली. एनडीआरएफच्या दोन टीम गुरुवारी तर एक टीम शुक्रवारी दाखल झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पूर आणि भरलेला रंकाळा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याने अनेक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. अखेर केवळ शासकीय वाहने आणि आपत्कालीन यंत्रणेतील वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

--------------------------------

सांगलीत ४० हून अधिक गावांचा संपर्क तुटला, कृष्णा, वारणेला पूर

सांगली : जिल्ह्याला शुक्रवारी दिवसभर पावसाने झोडपले. सांगली शहरासह पश्चिम भागातील गावांना पुराचा तडाखा बसला. सांगलीत कृष्णेचे पाणी संध्याकाळपर्यंत पात्रातच होते, पण ४० हून अधिक गावांचा संपर्क मात्र तुटला होता.

चिकुर्डेसह काही ठिकाणी जनावरे पुरात वाहून गेली. डिग्रज, मौजे डिग्रजचा, ब्रह्मनाळ गावांचा संपर्क तुटला. पुराची शक्यता पाहून सांगली एसटी आगारातील ९८ बसेस तासगाव, इस्लामपूर, मिरज व चंदनवाडी कार्यशाळेत हलवण्यात आल्या. भिलवडीमध्ये बाजारपेठेत पाणी शिरले होते. सुखवाडी, चोपडेवाडी, भुवनेश्वरवाडीचा संपर्क सकाळीच तुटला. मांगले परिसरात महापुराने २००५ व २०१९ चे विक्रम मोडले आहेत. वाळव्यात कणेगाव व भरतवाडीत नागरिकांनी जनावरांसह गाव सोडले. चांदोलीत २४ तासांत ५७४ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळपासूनच्या २४ तासांत तब्बल ५७४ मिलिमीटर पाऊस कोसळला. धरणातील पाणीपातळी सव्वापाच मीटरने वाढली. पाणीसाठा १३.५ टीएमसीने वाढला. त्यामुळे सांगलीकरांच्या चिंतेत भर पडली. सांगलीत आयर्विन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ६ वाजता कृष्णेची पाणीपातळी ३८ फूट होती, दुपारी दोनपर्यंत ती ४३ फुटांपर्यंत गेली. शहरातील सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी, शिवशंभो चौक, जुना बुधगाव रस्ता आदी भागांत पाणी शिरले. कृष्णेची पाणीपातळी ५२ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली. या पातळीला सांगली शहराला महापुराचा फटका बसतो, त्यामुळे प्रमुख बाजारपेठांतील व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी करायला सकाळपासूनच सुरुवात केली होती.

--------------------------------

सातारा जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासात नवजा येथे ७४६ तर कोयना येथे ६१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्येही ५५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. महाबळेश्वरमधील आंबेनळी घाट बंद असून पोलादपूरकडे जाणारा रस्ता २० फूट खाली खचला आहे. त्यामुळे पाहणीसाठी गेलेल्या महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील काही काळ अडकून पडल्या होत्या. कोयना धरणातून सध्या ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत असून कऱ्हाड शहरात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे.