शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४११ गावांना पुराची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

कोल्हापूर : यंदाच्या महापुराची झळ जिल्ह्यातील ४११ गावांना बसली आहे. जरी या गावांमधील पाणी ओसरले असले तरीही तेथे ...

कोल्हापूर : यंदाच्या महापुराची झळ जिल्ह्यातील ४११ गावांना बसली आहे. जरी या गावांमधील पाणी ओसरले असले तरीही तेथे काही ना काही नुकसान झाले असून, पंचनाम्यांनाही सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही काेल्हापूर-रत्नागिरी मार्ग मात्र वाहतुकीसाठी बंदच आहे. अनेक गावांतील पूरग्रस्त आपल्या घरी परतत असल्याचे चित्र आहे.

पूर ओसरल्यानंतर आता कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही स्वच्छतेचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले. त्यामुळे आता मुंबई, नवी मुंबई आणि पुणे महापालिकेने यासाठी सहकार्याचा हात पुढे केला असून, टँकर व अन्य यंत्रणा कोल्हापुरात दाखल झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यासह शहराचा दौरा करून शासकीय यंत्रणेला पाठबळ दिले.

चार दिवसांपूर्वी आलेला पूर आता ओसरला असून, शहरातील प्रमुख बंद झालेले रस्ते सुरू झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला असून, अजूनही रत्नागिरी रस्ता बंदच आहे. ५६.३ फुटांवर गेलेली राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी आता ४५.६ फुटांवर आली आहे. ४३ फूट ही धोका पातळी आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक गावांभोवती अजूनही पाणी असले तरी पातळी घटत असल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्यानंतर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूरग्रस्तांसाठी कोणत्या योजना जाहीर होतात याकडे आता पूरग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पवार यांनी सार्वजनिक बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पुण्याहून पाचारण केले होते; तर पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांशीही त्यांनी मंगळवारच्या दौऱ्यात चर्चा केली आहे.

चौकट

आतापर्यंत स्थलांतरित कुटुंबे ३६,६१५

स्थलांतरित लोकसंख्या १,६२,५६४

पैकी नातेवाइकांकडे १,३९,४९१

निवारा कक्षामध्ये २३,०७३

स्थलांतरित जनावरे ५४,५२५

कोविड रुग्ण छावणीत २२

पूर्ण बाधित गावे ३४

अंशत: बाधित ३७७

मृत्यू ७

जनावरांची हानी ११०

वित्तहानी अंदाजे २४३ कोटी