शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

जिल्ह्यातील ४११ गावांना पुराची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

कोल्हापूर : यंदाच्या महापुराची झळ जिल्ह्यातील ४११ गावांना बसली आहे. जरी या गावांमधील पाणी ओसरले असले तरीही तेथे ...

कोल्हापूर : यंदाच्या महापुराची झळ जिल्ह्यातील ४११ गावांना बसली आहे. जरी या गावांमधील पाणी ओसरले असले तरीही तेथे काही ना काही नुकसान झाले असून, पंचनाम्यांनाही सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही काेल्हापूर-रत्नागिरी मार्ग मात्र वाहतुकीसाठी बंदच आहे. अनेक गावांतील पूरग्रस्त आपल्या घरी परतत असल्याचे चित्र आहे.

पूर ओसरल्यानंतर आता कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही स्वच्छतेचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले. त्यामुळे आता मुंबई, नवी मुंबई आणि पुणे महापालिकेने यासाठी सहकार्याचा हात पुढे केला असून, टँकर व अन्य यंत्रणा कोल्हापुरात दाखल झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यासह शहराचा दौरा करून शासकीय यंत्रणेला पाठबळ दिले.

चार दिवसांपूर्वी आलेला पूर आता ओसरला असून, शहरातील प्रमुख बंद झालेले रस्ते सुरू झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला असून, अजूनही रत्नागिरी रस्ता बंदच आहे. ५६.३ फुटांवर गेलेली राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी आता ४५.६ फुटांवर आली आहे. ४३ फूट ही धोका पातळी आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक गावांभोवती अजूनही पाणी असले तरी पातळी घटत असल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्यानंतर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूरग्रस्तांसाठी कोणत्या योजना जाहीर होतात याकडे आता पूरग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पवार यांनी सार्वजनिक बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पुण्याहून पाचारण केले होते; तर पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांशीही त्यांनी मंगळवारच्या दौऱ्यात चर्चा केली आहे.

चौकट

आतापर्यंत स्थलांतरित कुटुंबे ३६,६१५

स्थलांतरित लोकसंख्या १,६२,५६४

पैकी नातेवाइकांकडे १,३९,४९१

निवारा कक्षामध्ये २३,०७३

स्थलांतरित जनावरे ५४,५२५

कोविड रुग्ण छावणीत २२

पूर्ण बाधित गावे ३४

अंशत: बाधित ३७७

मृत्यू ७

जनावरांची हानी ११०

वित्तहानी अंदाजे २४३ कोटी