शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

जिल्ह्यातील ४११ गावांना पुराची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:26 IST

कोल्हापूर : यंदाच्या महापुराची झळ जिल्ह्यातील ४११ गावांना बसली आहे. जरी या गावांमधील पाणी ओसरले असले तरीही तेथे ...

कोल्हापूर : यंदाच्या महापुराची झळ जिल्ह्यातील ४११ गावांना बसली आहे. जरी या गावांमधील पाणी ओसरले असले तरीही तेथे काही ना काही नुकसान झाले असून, पंचनाम्यांनाही सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही काेल्हापूर-रत्नागिरी मार्ग मात्र वाहतुकीसाठी बंदच आहे. अनेक गावांतील पूरग्रस्त आपल्या घरी परतत असल्याचे चित्र आहे.

पूर ओसरल्यानंतर आता कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातही स्वच्छतेचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले. त्यामुळे आता मुंबई, नवी मुंबई आणि पुणे महापालिकेने यासाठी सहकार्याचा हात पुढे केला असून, टँकर व अन्य यंत्रणा कोल्हापुरात दाखल झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दुपारपर्यंत जिल्ह्यासह शहराचा दौरा करून शासकीय यंत्रणेला पाठबळ दिले.

चार दिवसांपूर्वी आलेला पूर आता ओसरला असून, शहरातील प्रमुख बंद झालेले रस्ते सुरू झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला असून, अजूनही रत्नागिरी रस्ता बंदच आहे. ५६.३ फुटांवर गेलेली राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी आता ४५.६ फुटांवर आली आहे. ४३ फूट ही धोका पातळी आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक गावांभोवती अजूनही पाणी असले तरी पातळी घटत असल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्यानंतर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूरग्रस्तांसाठी कोणत्या योजना जाहीर होतात याकडे आता पूरग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पवार यांनी सार्वजनिक बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पुण्याहून पाचारण केले होते; तर पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांशीही त्यांनी मंगळवारच्या दौऱ्यात चर्चा केली आहे.

चौकट

आतापर्यंत स्थलांतरित कुटुंबे ३६,६१५

स्थलांतरित लोकसंख्या १,६२,५६४

पैकी नातेवाइकांकडे १,३९,४९१

निवारा कक्षामध्ये २३,०७३

स्थलांतरित जनावरे ५४,५२५

कोविड रुग्ण छावणीत २२

पूर्ण बाधित गावे ३४

अंशत: बाधित ३७७

मृत्यू ७

जनावरांची हानी ११०

वित्तहानी अंदाजे २४३ कोटी