शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

घरफाळा विभागाची झाडाझडती

By admin | Updated: April 23, 2015 01:03 IST

आठ दिवसांत सर्वेक्षणासाठी निविदा : ‘एचसीएल’ अहवालाच्या पडताळणीनंतरच कारवाई - आयुक्त

कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागाच्या ए, बी, सी, डी व ई वॉर्डातील सर्व मूल्यमापन (असेसमेंट) लिपीक व प्रभारी अधीक्षक आदी सर्व कर्मचाऱ्यांची बुधवारी दिवसभर झाडाझडती झाली. पहिल्या टप्प्यांत उपआयुक्त अश्विनी वाघमळे व त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी कसून चौकशी केली. ‘एचसीएल’ कंपनीने कोऱ्या पावत्यांबाबतचा अहवाल सादर केला असून याची पडताळणी केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगीतले. शहरातील किमान दीड हजारांहून अधिक मिळकतधारकांना गेली अनेक वर्षे कोऱ्या पावत्या (बिले) पाठविली जात आहेत. या सर्व प्रकाराबाबत ‘एससीएल’ या ई-गर्व्हनन्स ठेकेदाराने अहवाल सादर केला. या अहवालाची मनपाच्या मूळ कागदपत्रांशी पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे नेमकी कोणाची चूक आहे? अशी चूक होऊ नये, यासाठी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे? याची पडताळणी केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.शहरातील सर्व मिळकतींचे त्रयस्थ संस्थेमार्फत पडताळणी करण्यासाठी येत्या आठ दिवसांत निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. सर्व मिळकतींच्या नव्याने मोजमापांसह व्यापारी, रहिवासी व औद्योगिक अशी वर्गवारी केली जाईल. ही सर्व माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मिळकतधारकांस नेमका किती घरफाळा आकारणी झाला, हे पाहता येणार आहे. तुलनात्मकदृष्ट्या इतर मिळकतींची माहिती उपलब्ध होईल तसेच दिलेल्या तारखेनंतर घरफाळा भरल्यास किती दंडव्याजाची रक्कम होईल, हे नमूद असेल. लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. (प्रतिनिधी)