शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पूरग्रस्तांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीतच राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : या महिन्याअखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीत राहावे, तसेच ...

कोल्हापूर : या महिन्याअखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीत राहावे, तसेच जनावरांनाही चारा छावण्यांमध्ये ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केले. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त व जनावरांचे प्रशासनाच्या वतीने गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या छावणीला भेट दिल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांची आस्थेने चौकशी केली.

पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या-दुकट्याचं काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करूया, अशा शब्दांत त्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला, तसेच १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी येथेच राहावे. आपल्या राहण्याची, जेवणाची आणि जनावरांच्या चारा-पाण्याची सोय केली जाईल, ‘गोकुळ’च्यावतीने पशुखाद्य दिले जाईल. गुरुदत्त कारखान्याप्रमाणेच दत्त, जवाहर, शरद साखर कारखान्यांचे चेअरमन यांनाही जनावरांना चारा पुरवण्यासाठी विनंती करू, असे सांगितले.

यावेळी पूरग्रस्तांनी प्रशासकीय यंत्रणेला धन्यवाद देत कारखाना छावणीत नाष्टा, जेवणाची चांगली सोय केल्याचेही आवर्जून सांगितले. गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे १५०० पूरग्रस्त व त्यांच्या ८०० जनावरांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पूरग्रस्तांना दोन वेळचा नाष्टा, जेवण, तसेच सर्व जनावरांना चारा दिला जात आहे. यापूर्वीच्या २००५ व २०१९ मधील महापुरात देखील कारखान्याने छावणी उभारून मदत केल्याची माहिती यावेळी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले यांनी दिली. दरम्यान, मंत्री पाटील यांनी घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, सैनिक टाकळी, अकिवाट या भागांतील पूरपरिस्थितीची पाहणी, तसेच कन्या शाळा व कारखान्यावरील चारा छावणीला भेट देऊन पाहणी केली.

सध्या मदतकार्यावर भर, पूर ओसरल्यावर नुकसानीचे पंचनामे

यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना वेळेत चहा, नाष्टा, जेवण मिळतेय का, आरोग्य सुविधा दिली जातेय का, जनावरांना चारा दिला जातोय का, पशुवैद्यकीय सेवा दिली जातेय का, याची विचारणा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासन आपल्या सोबत आहे. सध्या मदतकार्यावर भर आहे. पूर ओसरल्यावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

---

गुुरुदत्त पाहणी

ओळ : पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीत स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना भेटून त्यांची आस्थेने चौकशी केली.

----