शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीतच राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : या महिन्याअखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीत राहावे, तसेच ...

कोल्हापूर : या महिन्याअखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीत राहावे, तसेच जनावरांनाही चारा छावण्यांमध्ये ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केले. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त व जनावरांचे प्रशासनाच्या वतीने गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या छावणीला भेट दिल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांची आस्थेने चौकशी केली.

पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या-दुकट्याचं काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करूया, अशा शब्दांत त्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला, तसेच १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी येथेच राहावे. आपल्या राहण्याची, जेवणाची आणि जनावरांच्या चारा-पाण्याची सोय केली जाईल, ‘गोकुळ’च्यावतीने पशुखाद्य दिले जाईल. गुरुदत्त कारखान्याप्रमाणेच दत्त, जवाहर, शरद साखर कारखान्यांचे चेअरमन यांनाही जनावरांना चारा पुरवण्यासाठी विनंती करू, असे सांगितले.

यावेळी पूरग्रस्तांनी प्रशासकीय यंत्रणेला धन्यवाद देत कारखाना छावणीत नाष्टा, जेवणाची चांगली सोय केल्याचेही आवर्जून सांगितले. गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे १५०० पूरग्रस्त व त्यांच्या ८०० जनावरांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पूरग्रस्तांना दोन वेळचा नाष्टा, जेवण, तसेच सर्व जनावरांना चारा दिला जात आहे. यापूर्वीच्या २००५ व २०१९ मधील महापुरात देखील कारखान्याने छावणी उभारून मदत केल्याची माहिती यावेळी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले यांनी दिली. दरम्यान, मंत्री पाटील यांनी घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, सैनिक टाकळी, अकिवाट या भागांतील पूरपरिस्थितीची पाहणी, तसेच कन्या शाळा व कारखान्यावरील चारा छावणीला भेट देऊन पाहणी केली.

सध्या मदतकार्यावर भर, पूर ओसरल्यावर नुकसानीचे पंचनामे

यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना वेळेत चहा, नाष्टा, जेवण मिळतेय का, आरोग्य सुविधा दिली जातेय का, जनावरांना चारा दिला जातोय का, पशुवैद्यकीय सेवा दिली जातेय का, याची विचारणा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासन आपल्या सोबत आहे. सध्या मदतकार्यावर भर आहे. पूर ओसरल्यावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

---

गुुरुदत्त पाहणी

ओळ : पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीत स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना भेटून त्यांची आस्थेने चौकशी केली.

----