शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
3
महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
4
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
5
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
6
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
7
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
8
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
9
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
10
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
11
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
12
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक
13
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
14
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
15
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
16
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
17
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
18
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
19
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
20
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड

पूरग्रस्तांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीतच राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : या महिन्याअखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीत राहावे, तसेच ...

कोल्हापूर : या महिन्याअखेर पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा पूरपरिस्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी १५ ऑगस्टपर्यंत छावणीत राहावे, तसेच जनावरांनाही चारा छावण्यांमध्ये ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केले. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त व जनावरांचे प्रशासनाच्या वतीने गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या छावणीला भेट दिल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांची आस्थेने चौकशी केली.

पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या-दुकट्याचं काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करूया, अशा शब्दांत त्यांनी पूरग्रस्तांना धीर दिला, तसेच १५ ऑगस्टपर्यंत नागरिकांनी येथेच राहावे. आपल्या राहण्याची, जेवणाची आणि जनावरांच्या चारा-पाण्याची सोय केली जाईल, ‘गोकुळ’च्यावतीने पशुखाद्य दिले जाईल. गुरुदत्त कारखान्याप्रमाणेच दत्त, जवाहर, शरद साखर कारखान्यांचे चेअरमन यांनाही जनावरांना चारा पुरवण्यासाठी विनंती करू, असे सांगितले.

यावेळी पूरग्रस्तांनी प्रशासकीय यंत्रणेला धन्यवाद देत कारखाना छावणीत नाष्टा, जेवणाची चांगली सोय केल्याचेही आवर्जून सांगितले. गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे १५०० पूरग्रस्त व त्यांच्या ८०० जनावरांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पूरग्रस्तांना दोन वेळचा नाष्टा, जेवण, तसेच सर्व जनावरांना चारा दिला जात आहे. यापूर्वीच्या २००५ व २०१९ मधील महापुरात देखील कारखान्याने छावणी उभारून मदत केल्याची माहिती यावेळी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले यांनी दिली. दरम्यान, मंत्री पाटील यांनी घोसरवाड, दत्तवाड, टाकळीवाडी, सैनिक टाकळी, अकिवाट या भागांतील पूरपरिस्थितीची पाहणी, तसेच कन्या शाळा व कारखान्यावरील चारा छावणीला भेट देऊन पाहणी केली.

सध्या मदतकार्यावर भर, पूर ओसरल्यावर नुकसानीचे पंचनामे

यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना वेळेत चहा, नाष्टा, जेवण मिळतेय का, आरोग्य सुविधा दिली जातेय का, जनावरांना चारा दिला जातोय का, पशुवैद्यकीय सेवा दिली जातेय का, याची विचारणा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासन आपल्या सोबत आहे. सध्या मदतकार्यावर भर आहे. पूर ओसरल्यावर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

---

गुुरुदत्त पाहणी

ओळ : पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीत स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना भेटून त्यांची आस्थेने चौकशी केली.

----