शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

शासनाच्या मदतीवेळी निकषात अडकणार 'पूरग्रस्त'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST

* पंचनाम्यावेळी तंटे सुरू उदगाव: महापूर ओसरायला सुरुवात झाली आहे.२०१९ पेक्षा हा पूर विध्वंसक जरी नसला तरी गावेच्या गावे ...

* पंचनाम्यावेळी तंटे सुरू

उदगाव:

महापूर ओसरायला सुरुवात झाली आहे.२०१९ पेक्षा हा पूर विध्वंसक जरी नसला तरी गावेच्या गावे चहूबाजूने वेढल्याने पूर्णतः गावे स्थलांतर झालेली होती. परंतु किमान दोन दिवस घरात पाणी असावे अशी अट सानुग्रह अनुदानासाठी घातल्याने सगळीकडून पाणी वेढलेल्या पूरग्रस्तानी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१९ ची पूररेषा पकडून आम्ही बाहेर पडलो ही आमची चूक झाली काय? असा प्रश्न पंचनाम्यावेळी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरिक विचारत आहेत.

शिरोळ तालुक्यातील बेचाळीस गावांना महापुरामुळं धोका पोहोचतो. गेल्या महापुरावेळी मोठा महाप्रलय आल्याने तो सावधगिरीचा इशारा बाळगत गाव पुढाऱ्यांनी सर्वांना बाहेर काढले. त्यांची होईल तशी व्यवस्था केली. परंतु उंबऱ्याला पाणी लागले तरी पंचनाम्यात सानुग्रह अनुदानाला खाट मारण्याचे काम महसूल व ग्रामपंचायत विभागाकडून सुरू आहे. जर पूर्ण गाव बाधित असेल तर सर्वांनाच दहा हजारांचे सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे, अशी मागणी ही लोकप्रतिनिधीना पूरग्रस्त गावांनी केली आहे.परंतु पंचनामे संपत आले तरी त्यावर निर्णय होत नसल्याने वारंवार वाद उफाळत आहेत.

चिंचवाड ता. शिरोळ येथील सरपंच ज्योती काटकर यांच्यासह सदस्यांनी सर्वांना सानुग्रह अनुदान मिळावे याचा ठराव केला आहे. तेथील ४२०कुटुंबे स्थलांतरित झाली होती. महसूल विभागाच्या धोरणानुसार त्यापैकी फक्त १२० कुटुंबाना लाभ मिळणार आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण तालुक्यातील पूरग्रस्ताची आहे. याच मागणीसाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन जाचक अटी बदलाव्यात व सर्वांना अनुदान मिळावे यासाठी भेट घेणार आहेत.

---------

ग्रामपंचायतचा ठराव करून आम्ही शासनाला तातडीने म्हणणे मांडणार आहे.

अनुदान नाही मिळाले तर सर्व पूरग्रस्त तहसील कार्यालयाला समोर ठिय्या मारतील.

ज्योती काटकर,सरपंच,चिंचवाड

----

फोटो ओळ- उदगाव ता. शिरोळ येथे पूरग्रस्ताचे पंचनामे करताना तलाठी सचिन चांदणे,ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, जालिंदर बंडगर,मोहन भंडारे,कर्मचारी व पूरग्रस्त

छाया- अजित चौगुले, उदगाव