शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

पूर पातळी घटली, पण रस्ता कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने उघडीप दिल्याने कोल्हापूरच्या पूरपातळीत तीन फुटांनी घट झाली आहे. शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने उघडीप दिल्याने कोल्हापूरच्या पूरपातळीत तीन फुटांनी घट झाली आहे. शहरातील अनेक ठिकाणचे पाणी ओसरले असले तरी सखल भागात पाणी तुंबूनच आहे. दरम्यान, रविवारी दुपारनंतर ‘राधानगरी’ धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्याने त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. सलग तिसऱ्या दिवशीही कोल्हापूरहून पुणे, बेळगाव, कोकणाकडे जाणारे रस्ते बंदच राहिले आहेत.

धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाले असून काही धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे. शहरातही दिवसभर एखादे, दुसरे सरवट वगळता पाऊन नसल्याने अनेक भागांतील पाणी उतरले. सकाळीच दसरा चौकातून वाहतूक सुरू झाली. व्हीनस कॉर्नर परिसरात अजूनही पाणी आहे. कसबा बावड्याकडे जाणारा रस्ताही अजून पाण्याखाली असून पेट्रोल आणि पाण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र रविवारीही पहावयास मिळाले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारनंतर शिरोळ तालुक्याचा दौरा करून तेथील पूरग्रस्तांना धीर दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत सायंकाळपासून आढावा बैठक घेतली.

चौकट

ठाकरे, पवार यांच्या दौऱ्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला नव्हता, तर पवार हे येणार इतकेच निश्चित झाले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठकांची तयारी आणि जिल्हा परिषदेची स्वच्छता करून घेण्यात आली. कारण याच ठिकाणी आढावा बैठक घेतली जाऊ शकते.

चौकट

राधानगरीच्या विसर्गाचा परिणाम सौम्य करण्यासाठी प्रयत्न

धरणक्षेत्रातील प्रचंड पावसामुळे जरी कोल्हापूर शहरासह काही तालुके जलमय झाले असले तरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या राधानगरी धरणातून रविवारी दुपारपर्यंत पाणी बाहेर पडले नव्हते. त्यामुळे तो एक दिलासा होता. भर पावसात राधानगरीचे उघडलेले दरवाजे आणखी गंभीर स्थितीला निमंत्रण ठरले असते. रविवारी दुपारनंतर या धरणाचे चार दरवाजे उघडले असले तरी ५६०० क्युसेकचे हे पाणी नदीत येणार असल्याने कुंभी आणि कासारी धरणातून २८०० क्युसेकहून अधिक पाणी रोखण्यात आले आहे. त्यामुळे जादा पाण्याचा परिणाम सौम्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चौकट

सर्वांचे लक्ष हायवे कडे

सलग तिसऱ्या दिवशी बंद झालेला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग कधी सुरू होणार याचीच चौकशी दिवसभर केली जात होती. थेट गोव्याहून, मुंबईहून नागरिक फोन करून याबाबत माहिती घेत होते. अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी अडकले असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. मात्र, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताही हाय वे वर जेसीबीच्या माध्यमातून पाण्याचा वेग किती आहे याचा अंदाज घेण्यात आला. तेव्हा तो वाहतूक खुला करण्यासाठी धोक्याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोमवारी सकाळी याबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्यावर्षी पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ५० फूट असताना राष्ट्रीय महामार्ग खुला करण्यात आला होता. रविवारी सायंकाळी ही पातळी ५१ फूट होती. त्यामुळे सोमवारी सकाळी हा महामार्ग खुला होण्याची शक्यता आहे.