शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

पूर पातळी घटली, पण रस्ता कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने उघडीप दिल्याने कोल्हापूरच्या पूरपातळीत तीन फुटांनी घट झाली आहे. शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने उघडीप दिल्याने कोल्हापूरच्या पूरपातळीत तीन फुटांनी घट झाली आहे. शहरातील अनेक ठिकाणचे पाणी ओसरले असले तरी सखल भागात पाणी तुंबूनच आहे. दरम्यान, रविवारी दुपारनंतर ‘राधानगरी’ धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्याने त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. सलग तिसऱ्या दिवशीही कोल्हापूरहून पुणे, बेळगाव, कोकणाकडे जाणारे रस्ते बंदच राहिले आहेत.

धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाले असून काही धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे. शहरातही दिवसभर एखादे, दुसरे सरवट वगळता पाऊन नसल्याने अनेक भागांतील पाणी उतरले. सकाळीच दसरा चौकातून वाहतूक सुरू झाली. व्हीनस कॉर्नर परिसरात अजूनही पाणी आहे. कसबा बावड्याकडे जाणारा रस्ताही अजून पाण्याखाली असून पेट्रोल आणि पाण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र रविवारीही पहावयास मिळाले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारनंतर शिरोळ तालुक्याचा दौरा करून तेथील पूरग्रस्तांना धीर दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत सायंकाळपासून आढावा बैठक घेतली.

चौकट

ठाकरे, पवार यांच्या दौऱ्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला नव्हता, तर पवार हे येणार इतकेच निश्चित झाले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या पातळीवर बैठकांची तयारी आणि जिल्हा परिषदेची स्वच्छता करून घेण्यात आली. कारण याच ठिकाणी आढावा बैठक घेतली जाऊ शकते.

चौकट

राधानगरीच्या विसर्गाचा परिणाम सौम्य करण्यासाठी प्रयत्न

धरणक्षेत्रातील प्रचंड पावसामुळे जरी कोल्हापूर शहरासह काही तालुके जलमय झाले असले तरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या राधानगरी धरणातून रविवारी दुपारपर्यंत पाणी बाहेर पडले नव्हते. त्यामुळे तो एक दिलासा होता. भर पावसात राधानगरीचे उघडलेले दरवाजे आणखी गंभीर स्थितीला निमंत्रण ठरले असते. रविवारी दुपारनंतर या धरणाचे चार दरवाजे उघडले असले तरी ५६०० क्युसेकचे हे पाणी नदीत येणार असल्याने कुंभी आणि कासारी धरणातून २८०० क्युसेकहून अधिक पाणी रोखण्यात आले आहे. त्यामुळे जादा पाण्याचा परिणाम सौम्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

चौकट

सर्वांचे लक्ष हायवे कडे

सलग तिसऱ्या दिवशी बंद झालेला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग कधी सुरू होणार याचीच चौकशी दिवसभर केली जात होती. थेट गोव्याहून, मुंबईहून नागरिक फोन करून याबाबत माहिती घेत होते. अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी अडकले असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. मात्र, रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताही हाय वे वर जेसीबीच्या माध्यमातून पाण्याचा वेग किती आहे याचा अंदाज घेण्यात आला. तेव्हा तो वाहतूक खुला करण्यासाठी धोक्याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोमवारी सकाळी याबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्यावर्षी पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ५० फूट असताना राष्ट्रीय महामार्ग खुला करण्यात आला होता. रविवारी सायंकाळी ही पातळी ५१ फूट होती. त्यामुळे सोमवारी सकाळी हा महामार्ग खुला होण्याची शक्यता आहे.