शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

पूरग्रस्त शेतकरी, व्यापाऱ्यांना तातडीने मदत मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाच्या उभारणीसाठी सवलती, तसेच पूरग्रस्त शेतकरी, नागरिक व व्यापारीवर्गाला तातडीची मदत मिळावी, अशा मागणीचे निवेदन आमदार ...

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाच्या उभारणीसाठी सवलती, तसेच पूरग्रस्त शेतकरी, नागरिक व व्यापारीवर्गाला तातडीची मदत मिळावी, अशा मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यालयाने प्रांत कार्यालयात दिले.

निवेदनात, देशामध्ये ५० टक्के यंत्रमाग उद्योग हा महाराष्ट्रामध्ये आहे. त्याला उभारी देण्यासाठी राज्य शासनाने विविध सवलतींचा निर्णय घेतला आहे; परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. दीड वर्षाचा कालावधी लोटला तरीही २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागांसाठी वीज दरातील प्रतियुनिट अतिरिक्त ७५ पैशांची सवलत अजूनही मिळालेली नाही, तर २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागांसाठी वीज दरामध्ये प्रतियुनिट १ रुपयाची सवलत द्यावी.

तसेच जिल्ह्यासह शहरातील नदीकाठच्या नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. त्या नागरिकांना तातडीची मदत म्हणून प्रतिव्यक्ती दोन हजार रुपये द्यावेत. प्रतिकुटुंब २५ किलो गहू व २५ किलो तांदूळ मोफत द्यावे. नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांचे पंचनामे करावेत. पुरामुळे झालेल्या छोट्या उद्योगांच्या नुकसानीपोटी त्या उद्योगांचा पंचनामा जिल्हा उद्योग केंद्राकडून करून त्यांना तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये द्यावेत. पंतप्रधान आवास योजनेचे दोन लाख ७३ हजार व राज्य शासनाचे दोन लाख ७३ हजार रुपये असे एकत्रित अनुदान देऊन त्यांना घरे बांधण्यासाठी सहकार्य करावे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, संजय केंगार, राजू बोंद्रे, अनिकेत चव्हाण, आदींचा समावेश होता.