शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

पूरग्रस्त शेतकरी, व्यापाऱ्यांना तातडीने मदत मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाच्या उभारणीसाठी सवलती, तसेच पूरग्रस्त शेतकरी, नागरिक व व्यापारीवर्गाला तातडीची मदत मिळावी, अशा मागणीचे निवेदन आमदार ...

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाच्या उभारणीसाठी सवलती, तसेच पूरग्रस्त शेतकरी, नागरिक व व्यापारीवर्गाला तातडीची मदत मिळावी, अशा मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यालयाने प्रांत कार्यालयात दिले.

निवेदनात, देशामध्ये ५० टक्के यंत्रमाग उद्योग हा महाराष्ट्रामध्ये आहे. त्याला उभारी देण्यासाठी राज्य शासनाने विविध सवलतींचा निर्णय घेतला आहे; परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. दीड वर्षाचा कालावधी लोटला तरीही २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागांसाठी वीज दरातील प्रतियुनिट अतिरिक्त ७५ पैशांची सवलत अजूनही मिळालेली नाही, तर २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागांसाठी वीज दरामध्ये प्रतियुनिट १ रुपयाची सवलत द्यावी.

तसेच जिल्ह्यासह शहरातील नदीकाठच्या नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. त्या नागरिकांना तातडीची मदत म्हणून प्रतिव्यक्ती दोन हजार रुपये द्यावेत. प्रतिकुटुंब २५ किलो गहू व २५ किलो तांदूळ मोफत द्यावे. नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांचे पंचनामे करावेत. पुरामुळे झालेल्या छोट्या उद्योगांच्या नुकसानीपोटी त्या उद्योगांचा पंचनामा जिल्हा उद्योग केंद्राकडून करून त्यांना तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये द्यावेत. पंतप्रधान आवास योजनेचे दोन लाख ७३ हजार व राज्य शासनाचे दोन लाख ७३ हजार रुपये असे एकत्रित अनुदान देऊन त्यांना घरे बांधण्यासाठी सहकार्य करावे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, संजय केंगार, राजू बोंद्रे, अनिकेत चव्हाण, आदींचा समावेश होता.