शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

नियमांची पायमल्ली केल्याने कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:41 IST

सुप्रीम कोर्टात याचिका; कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सांगली : शासकीय यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा भंग केल्यानेच सांगली, कोल्हापुरातील पूरस्थिती गंभीर बनून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. या प्रकरणी कारवाई करताना योग्य निर्देश न्यायालयामार्फत देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल पवार व अ‍ॅड. सचिन पाटील यांनी दिली.

पवार म्हणाले, केंद्रीय आपत्ती निवारण नियम २०१६ आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा भंग संबंधित शासकीय यंत्रणांनी केल्याचे दिसून येत आहे. यासाठीच महापुरासंदर्भात सर्व गोष्टींची अभ्यासपूर्वक माहिती घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार आहे.

केंद्रीय जलआयोगाच्या नियमानुसार पाऊस सुरू होण्याअगोदर धरणात जूनमध्ये १० टक्के, जुलैच्या शेवटी ५० टक्के, आॅगस्टमध्ये ७५ टक्के व १५ सप्टेंबरपर्यंत १00 टक्के पाणीसाठा करून घेण्याबाबत अत्यंत स्पष्ट शब्दात सूचना व नियम दिलेले आहेत. हे नियम या वर्षी कोयना, वारणा व अलमट्टी या धरणांत कुठेही पाळले गेले नाहीत. कर्नाटक व महाराष्ट्रात पराकोटीचा समन्वयाचा अभाव दिसला. वेळेत निर्णय घेऊ न शकल्याने महापुराची तीव्रता वाढत गेली. पलूस तालुक्यात २४ गावांत पूर असताना, पहिल्या तीन दिवसांमध्ये फक्त १२ बोटी होत्या व सांगलीमध्ये ६0 हजार लोकांसाठी फक्त पाच यांत्रिक बोटी व काहीच लाईफ जॅकेट्स होती. सर्वत्र अतिवृष्टी होत असताना व धरणातून पाणी सोडले जात असताना तुटपुंज्या साहित्याच्या आधारे पूरनियोजन केले. बचाव कार्यात स्थानिक प्रशासन अत्यंत तोकडे पडले. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.दुष्काळी भागात पाणी सोडायला हवेअर्धा सांगली जिल्हा पाण्यात बुडालेला असताना अर्धा जिल्हा कोरडा ठणठणीत होता. पूरपरिस्थिती असताना, कृष्णा खोºयात टेंभू, ताकारी व म्हैसाळ यांसारख्या योजना पूर्ण क्षमतेने चालू करून दुष्काळी पट्ट्यातील जनतेला पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केल्याचे पवार म्हणाले.निर्देश देण्याची मागणीभविष्यात मानवनिर्मित संकट उभे राहू नये, म्हणून आपत्तीचे सुसूत्र व योग्य नियोजन व्हावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट व कडक नियमावली करून ती लागू करण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी न्यायालयात करणार असल्याचे पवार म्हणाले.