शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

अर्ज माघारीसाठी आज उडणार झुंबड

By admin | Updated: February 13, 2017 00:41 IST

जि. प. निवडणूक; बंडोबांना थंड करण्यासाठी प्रयत्न

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माघारीसाठी आज, सोमवारी निवडणूक कार्यालयात अक्षरश: झुंबड उडणार आहे. माघारीसाठी एकच दिवस असल्याने राजकीय पक्षांची चांगलीच गोची झाली आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू असून त्यामध्ये काहींना यश, तर काही दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत. माघारीसाठी सर्व प्रकारची आयुधे वापरली जात आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी १ ते ६ फेबु्रवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ७ फेबु्रवारीला छाननी झाल्यानंतर माघारीची तारीख सहा दिवसांनी ठेवली. गेले आठ दिवस इच्छुकांची मनधरणी सुरू आहे. विविध आमिषे दाखवून बंड थंड करण्याचा सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सहकारी संस्थेत संधी देण्याचे आश्वासन देण्याचा स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहे, पण ते बंड शमले नाही, तर थेट जिल्हा पातळीवरील नेत्यांकडूनही मनधरणी केली जात आहे. येनकेनप्रकारे आपल्या विजयाच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. जिथे नात्यातील बंडखोरीची शक्यता आहे, तिथे माघारीसाठी पै-पाहुण्यांची फौजही काम करत आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन या चार तासातच माघार घ्यावी लागणार आहे. कालावधी फारच कमी असल्याने प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी केली आहे. हजारे, आंग्रे, भूषण पाटील यांच्याकडे लक्षराष्ट्रवादी कॉँग्रेसचे बाबूराव हजारे यांनी परिते, शिवसेनेचे भूषण पाटील यांनी बोरवडे, तर अस्मिता आंग्रे यांनी खुपिरे पंचायत समिती मतदारसंघातून बंडखोरीची तयारी केली आहे. त्याशिवाय सर्जेराव मोळे (कळे), सचिन चौगले (वडणगे) यांनी दंड थोपटले असून, पक्षीय पातळीवरून त्यांना शांत करण्यासाठी जोरदार व्यूहरचना लावली आहे. त्यामुळे हे इच्छुक आज काय भूमिका घेणार, याकडे नजरा लागल्या आहेत. यंत्रणेची कसरतजिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अडीच हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. माघारीसाठी केवळ चार तास वेळ असल्याने गर्दी उसळणार आहे. राजकीय पक्षांसह निवडणूक यंत्रणेलाही कसरत करावी लागणार आहे.