शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

सहापदरीकरणात त्रुटी दुरुस्त करणार

By admin | Updated: August 13, 2016 00:38 IST

पुणे-बंगलोर महामार्ग : नम्रता रेड्डी यांचे आश्वासन

कागल : पुणे-बंगलोर महामार्गाच्या चौपदरीकरण कामात कागल शहराच्या हद्दीत राहिलेल्या त्रुटी सहापदरीकरणाच्या कामावेळी दूर केल्या जातील. तसेच सहापदरीकरण मार्ग कृती समितीने केलेल्या मागण्याचींही दखल घेतली जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य विकास मंडळाच्या कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डी यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.चौपदरीकरणाच्या कामात त्रुटी राहिल्याने आणि आवश्यक ठिकाणी उड्डाण पूल, बोगदे, बाजूचे रस्ते नसल्याने नागरिकांना गेली दहा -बारा वर्षे हा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ही कृती समिती स्थापन करून आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी याबद्दल संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांना याची कल्पना दिल्यानंतर रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कागलला नुकतीच भेट देऊन या रस्त्याची पाहणी केली. तेव्हा नम्रता रेड्डी यांनी हे आश्वासन दिले. पक्षप्रतोद रमेश माळी, कृती समितीचे उपाध्यक्ष संजय ठाणेकर, नगरसेवक संजय चित्तारी, प्रकाश गाडेकर, सुनील निवृत्ती माळी, अभियंता सुनील माळी, इरफान मुजावर या पदाधिकाऱ्यांसह रस्ते विकास मंडळाचे उपअभियंता समाधान पाटील, सूरज शहा, विनोद चौगुले, आदी उपस्थित होते. चौपदरीकरण कामाच्या वेळी कागलकरांनी निकृष्ट दर्जाचे काम, चुकीच्या पद्धतीने नियोजन याबद्दल काम बंद पाडण्याचेही आंदोलन केले होते. कागलजवळ या महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण पडतो. कारण कागल हे कर्नाटक-महाराष्ट्राला जोडणारे ठिकाण आहे, तसेच मुरगूड-इचलकरंजी या बाजूनेही येथे वाहतूक होते. त्यामुळे येथील रस्ते कुचकामी ठरून वाहतुकीची कोंडी होते. शेजारच्या कर्नाटक हद्दीतील रस्त्यांची कामेही पहावीत, असे यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मागण्या आणि पाहणीलक्ष्मी मंदिर ते नवीन आर. टी. ओ. चेकपोस्टपर्यंत दोन्ही बाजूने ७ मीटर रुंदीचा सर्व्हिस रस्ता, ड्रेनेज करावे. वृक्षारोपण, स्ट्रीट लाईट, स्वच्छतागृहे, पाणी व्यवस्था करावी. या मागण्या केल्या. शिष्टमंडळानेही प्रत्यक्ष या जागांना भेटी देत सर्व नोंदी करून घेतल्या.