शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

‘अंबाबाई’साठी तोडगा काढा

By admin | Updated: December 6, 2014 00:32 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीला वज्रलेप करण्यावरून गेल्या चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर सर्व संबंधित घटकांनी सकारात्मक भूमिका घेतली, तर देवीची मूर्ती अनंतकालापर्यंत भक्तांना शुभाशीर्वाद देत राहील; कारण सर्वांनी उपस्थित राहून तोडगा काढला तर वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या अवघ्या तीन ते चार सुनावणींमध्ये हा वाद मिटणार आहे. अंबाबाईच्या मूर्तीला वज्रलेप करण्याच्या निर्णयाला श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी विरोध केल्यानंतर हा वाद न्यायालयात गेला. ‘केमिकल कॉन्झर्व्हेशन की वज्रलेप?’ या वादात न पडता मूर्तीच्या संरक्षणासाठी एक पाऊल मागे येण्याची तयारी त्यावेळी दाखविली गेली नाही. त्यावर कोणताच तोडगा निघत नाही; पण मूर्तीची झीज काही थांबत नाही, हे पाहून हक्कदार श्रीपूजक मंडळ व प्रतिवादींनी हा वाद वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग करण्याची विनंती केली. या प्रकरणात एक वादी आणि आठ प्रतिवादी आहेत. आता हा वाद वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे जाऊन तो मिटण्याची चिन्हे निर्माण झाल्यानंतर श्रेयवादावरून वितुष्ट येऊ नये, अशी श्रीपूजक मंडळाची भूमिका आहे. हे प्रकरण मार्गी लागावे यासाठी वादींप्रमाणे प्रतिवादी असलेल्या श्रीपूजक मंडळानेही तितकेच प्रयत्न केले आहे. तसेच केमिकल कॉन्झर्व्हेशनला संमती दर्शविली आहे, असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. ‘पुरातत्त्व’ने वज्रलेपाविरोधात अहवाल दिला. केमिकल कॉन्झर्व्हेशनचा मार्ग मोकळा झाला. वादी-प्रतिवादींनी सुनावणीस उपस्थित राहिल्यास देवीच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलली जातील.जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावेवज्रलेप समितीचे अध्यक्षपद, जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष ही तीनही महत्त्वाची पदे असलेल्या जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी या प्रकरणात लक्ष घातले तर वज्रलेपाचा प्रश्न तातडीने मिटणार आहे. वज्रलेप समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी किंवा अन्य प्र्रतिनिधींनी केमिकल कॉन्झर्व्हेशनला होकार दिला की मूर्ती संवर्धनाचा मार्ग सुकर होईल; पण त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. वज्रलेपाचा वाद गजानन मुनीश्वर यांच्यामुळे खोळंबला आहे. त्यावेळी कोर्टात वज्रलेप, केमिकल कॉन्झर्व्हेशन या शाब्दिक खेळीत न अडकता मूर्तिसंवर्धनासाठी आपण सकारात्मकतेने पुढाकार घेऊ. यासाठी गजानन मुनीश्वर यांना राजी करण्यासाठी श्रीपूजक मंडळाने प्रयत्न केले होते. आता त्यांना केमिकल कॉन्झर्व्हेशन योग्य वाटत असेल तर जगदंबेने त्यांना इतक्या वर्षांनी सद्बुद्धीच दिली असे म्हणावे लागेल. - अजित ठाणेकर (श्रीपूजक)