शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

हद्दवाढीतून पाच गावे वगळणार

By admin | Updated: March 5, 2016 00:31 IST

जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस : शिरोली नगरपंचायतीसाठी अहवाल देण्याची सूचना

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा विषय सध्या वादग्रस्त बनला आहे. हा विषय अधिक ताणला जाऊ नये आणि योग्य समन्वय साधला जावा म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनीच राज्य सरकारला पाठविलेल्या हद्दवाढ प्रस्तावात शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली आणि नागांव अशी पाच गावे वगळण्याची शिफारस केल्याची माहिती पुढे आली आहे.शिवाय शिरोली पुलाची या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्याची सूचना नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी केली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ आणि शिरोलीची नगरपंचायत करण्याचे नगरविकास विभागाचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने १८ जानेवारी २०१४ रोजी १६ गावे आणि गोकुळ शिरगांव व शिरोली या दोन औद्योगिक वसाहतीचा समावेश शहराच्या हद्दीत करावा म्हणून प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दि. १२ जून २०१५ रोजी पुन्हा एक सुधारित प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारला पाठविला होता. त्यामध्ये १८ गावे व दोन औद्योगिक वसाहतींचा समावेश होता. त्यानुसार हद्दवाढ विरोधक आणि समर्थक अशा दोन्ही बाजूंचा विचार करून जिल्हाधिकारी अमित सैनी यांना अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू समजावून घेऊन त्यांचा अहवाल दि. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी नगरविकास विभागास सादर केला. त्यात त्यांनी पंचगंगा नदीच्या प्रवाहानुसार शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली, नागांव अशी पाच गांवे आणि शिरोली व गोकुळ शिरगांव या दोन औद्योगिक वसाहती हद्दवाढीतून वगळणे योग्य होईल, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या शिफारशीमुळे हद्दवाढीला होणारा विरोध काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी रा. शा. कौरते यांनी जिल्हाधिकारी अमित सैनी यांना बुधवारी (दि. २ मार्च)ला पत्र पाठवून शिरोली पुलाची ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदी तपासून स्वयंस्पष्ट अहवाल दोन आठवड्यांत सरकारला सादर करण्याची सूचना केली आहे. या पत्रावरून राज्य सरकार शिरोली पुलाची नगरपंचायत करण्यात आणि काही गावे वगळून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यास इच्छुक असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)ही आहेत गावे शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली आणि नागांव अशी पाच गावे वगळण्याची शिफारस केल्याची माहिती पुढे आली आहे.