शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीतून पाच गावे वगळणार

By admin | Updated: March 5, 2016 00:31 IST

जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस : शिरोली नगरपंचायतीसाठी अहवाल देण्याची सूचना

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा विषय सध्या वादग्रस्त बनला आहे. हा विषय अधिक ताणला जाऊ नये आणि योग्य समन्वय साधला जावा म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनीच राज्य सरकारला पाठविलेल्या हद्दवाढ प्रस्तावात शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली आणि नागांव अशी पाच गावे वगळण्याची शिफारस केल्याची माहिती पुढे आली आहे.शिवाय शिरोली पुलाची या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्याची सूचना नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी केली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ आणि शिरोलीची नगरपंचायत करण्याचे नगरविकास विभागाचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने १८ जानेवारी २०१४ रोजी १६ गावे आणि गोकुळ शिरगांव व शिरोली या दोन औद्योगिक वसाहतीचा समावेश शहराच्या हद्दीत करावा म्हणून प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दि. १२ जून २०१५ रोजी पुन्हा एक सुधारित प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारला पाठविला होता. त्यामध्ये १८ गावे व दोन औद्योगिक वसाहतींचा समावेश होता. त्यानुसार हद्दवाढ विरोधक आणि समर्थक अशा दोन्ही बाजूंचा विचार करून जिल्हाधिकारी अमित सैनी यांना अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू समजावून घेऊन त्यांचा अहवाल दि. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी नगरविकास विभागास सादर केला. त्यात त्यांनी पंचगंगा नदीच्या प्रवाहानुसार शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली, नागांव अशी पाच गांवे आणि शिरोली व गोकुळ शिरगांव या दोन औद्योगिक वसाहती हद्दवाढीतून वगळणे योग्य होईल, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या शिफारशीमुळे हद्दवाढीला होणारा विरोध काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी रा. शा. कौरते यांनी जिल्हाधिकारी अमित सैनी यांना बुधवारी (दि. २ मार्च)ला पत्र पाठवून शिरोली पुलाची ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदी तपासून स्वयंस्पष्ट अहवाल दोन आठवड्यांत सरकारला सादर करण्याची सूचना केली आहे. या पत्रावरून राज्य सरकार शिरोली पुलाची नगरपंचायत करण्यात आणि काही गावे वगळून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यास इच्छुक असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)ही आहेत गावे शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली आणि नागांव अशी पाच गावे वगळण्याची शिफारस केल्याची माहिती पुढे आली आहे.