शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कर्नाटकातील पाच हजार मराठा बांधवांची मुंबईत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 18:33 IST

 कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक्कांसाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून त्यांची ताकद वाढविणे हे आमचेही कर्तव्य आहे. त्याच भावनेतून कर्नाटक बांधवही मुंबईतील मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी सुमारे पाच हजार मराठा बांधवांनी मुंबईत धडक मारली आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून मुंबईकडे कूच; सीमाभागातील लढ्याला पाठबळ

प्रदीप शिंदे कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक्कांसाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून त्यांची ताकद वाढविणे हे आमचेही कर्तव्य आहे. त्याच भावनेतून कर्नाटक बांधवही मुंबईतील मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी सुमारे पाच हजार मराठा बांधवांनी मुंबईत धडक मारली आहे.

मराठा क्रांती मूक मोर्चा ज्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामध्ये कर्नाटक सीमाप्रश्न सोडवावा, ही मागणी आहे. महाराष्ट्रातील या मराठा समाजाचा जर सीमालढ्यासाठी पाठिंबा मिळाला तर नक्कीच प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला पाठिंबा मिळणार आहे. या गोष्टींमुळे कर्नाटकातील सीमाभागातील लोकांमध्ये त्यामुळे एकप्रकारे चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळेच बेळगावात सकल मराठा समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. सुमारे दहा लाख नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवून आपली ताकद दाखवून दिली होती. आता मुंबईतील मोर्चातही आपली ताकद दाखवून देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने बेळगाव परिसरातील गावागावांत जनजागृती केली आहे. लहान-मोठ्या बैठका या भागात घेतल्या आहेत. सर्वजण बेळगाव येथील श्री रंगुबाई पॅलेस येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती प्रमुख कार्यालय येथून एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत मुंबईकडे मंगळवारी सायंकाळपर्यंत जात होते.

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबईतील मोर्चाबाबत जागृतीचे काम सुरू आहे. आता मराठा मूकमोर्चाच्या रूपातून पुन्हा सीमाभागातील नागरिकांना ताकद मिळाली आहे. महाराष्ट्रातील सरकार जरी आमच्या पाठीशी नसले तरी येथील सकल मराठा बांधवांनी आपल्या प्रमुख मागणीमध्ये बेळगाव सीमाप्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला ताकद मिळाली आहे.- दीपक दळवी,अध्यक्ष, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीगेली ६३ वर्षे सीमाप्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मराठा मूकमोर्चाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली जात आहे. त्यामुळे नक्कीच सीमाप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच बेळगांवसह आसपासच्या गावांतील हजारो मराठाबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत.- गुणवंत पाटील,प्रवक्ता, बेळगाव सकल मराठा समाज