शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

कर्नाटकातील पाच हजार मराठा बांधवांची मुंबईत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 18:33 IST

 कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक्कांसाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून त्यांची ताकद वाढविणे हे आमचेही कर्तव्य आहे. त्याच भावनेतून कर्नाटक बांधवही मुंबईतील मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी सुमारे पाच हजार मराठा बांधवांनी मुंबईत धडक मारली आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून मुंबईकडे कूच; सीमाभागातील लढ्याला पाठबळ

प्रदीप शिंदे कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक्कांसाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून त्यांची ताकद वाढविणे हे आमचेही कर्तव्य आहे. त्याच भावनेतून कर्नाटक बांधवही मुंबईतील मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी सुमारे पाच हजार मराठा बांधवांनी मुंबईत धडक मारली आहे.

मराठा क्रांती मूक मोर्चा ज्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामध्ये कर्नाटक सीमाप्रश्न सोडवावा, ही मागणी आहे. महाराष्ट्रातील या मराठा समाजाचा जर सीमालढ्यासाठी पाठिंबा मिळाला तर नक्कीच प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला पाठिंबा मिळणार आहे. या गोष्टींमुळे कर्नाटकातील सीमाभागातील लोकांमध्ये त्यामुळे एकप्रकारे चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळेच बेळगावात सकल मराठा समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. सुमारे दहा लाख नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवून आपली ताकद दाखवून दिली होती. आता मुंबईतील मोर्चातही आपली ताकद दाखवून देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने बेळगाव परिसरातील गावागावांत जनजागृती केली आहे. लहान-मोठ्या बैठका या भागात घेतल्या आहेत. सर्वजण बेळगाव येथील श्री रंगुबाई पॅलेस येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती प्रमुख कार्यालय येथून एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत मुंबईकडे मंगळवारी सायंकाळपर्यंत जात होते.

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबईतील मोर्चाबाबत जागृतीचे काम सुरू आहे. आता मराठा मूकमोर्चाच्या रूपातून पुन्हा सीमाभागातील नागरिकांना ताकद मिळाली आहे. महाराष्ट्रातील सरकार जरी आमच्या पाठीशी नसले तरी येथील सकल मराठा बांधवांनी आपल्या प्रमुख मागणीमध्ये बेळगाव सीमाप्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला ताकद मिळाली आहे.- दीपक दळवी,अध्यक्ष, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीगेली ६३ वर्षे सीमाप्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मराठा मूकमोर्चाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली जात आहे. त्यामुळे नक्कीच सीमाप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच बेळगांवसह आसपासच्या गावांतील हजारो मराठाबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत.- गुणवंत पाटील,प्रवक्ता, बेळगाव सकल मराठा समाज