शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कर्नाटकातील पाच हजार मराठा बांधवांची मुंबईत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 18:33 IST

 कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक्कांसाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून त्यांची ताकद वाढविणे हे आमचेही कर्तव्य आहे. त्याच भावनेतून कर्नाटक बांधवही मुंबईतील मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी सुमारे पाच हजार मराठा बांधवांनी मुंबईत धडक मारली आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून मुंबईकडे कूच; सीमाभागातील लढ्याला पाठबळ

प्रदीप शिंदे कोल्हापूर : मुंबईतील मराठा क्रांती मूक महामोर्चामुळे मराठा समाजाची एकीची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या एकीमुळेच सीमाभागातील लढ्याला पाठबळ नक्कीच मिळणार आहे, अशी आशा कर्नाटकातील मराठा समाजातील नागरिकांना वाटू लागली आहे. मराठा समाज न्याय हक्कांसाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून त्यांची ताकद वाढविणे हे आमचेही कर्तव्य आहे. त्याच भावनेतून कर्नाटक बांधवही मुंबईतील मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चासाठी सुमारे पाच हजार मराठा बांधवांनी मुंबईत धडक मारली आहे.

मराठा क्रांती मूक मोर्चा ज्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामध्ये कर्नाटक सीमाप्रश्न सोडवावा, ही मागणी आहे. महाराष्ट्रातील या मराठा समाजाचा जर सीमालढ्यासाठी पाठिंबा मिळाला तर नक्कीच प्रश्न सोडण्यासाठी आम्हाला पाठिंबा मिळणार आहे. या गोष्टींमुळे कर्नाटकातील सीमाभागातील लोकांमध्ये त्यामुळे एकप्रकारे चैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळेच बेळगावात सकल मराठा समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. सुमारे दहा लाख नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवून आपली ताकद दाखवून दिली होती. आता मुंबईतील मोर्चातही आपली ताकद दाखवून देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने बेळगाव परिसरातील गावागावांत जनजागृती केली आहे. लहान-मोठ्या बैठका या भागात घेतल्या आहेत. सर्वजण बेळगाव येथील श्री रंगुबाई पॅलेस येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती प्रमुख कार्यालय येथून एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत मुंबईकडे मंगळवारी सायंकाळपर्यंत जात होते.

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुंबईतील मोर्चाबाबत जागृतीचे काम सुरू आहे. आता मराठा मूकमोर्चाच्या रूपातून पुन्हा सीमाभागातील नागरिकांना ताकद मिळाली आहे. महाराष्ट्रातील सरकार जरी आमच्या पाठीशी नसले तरी येथील सकल मराठा बांधवांनी आपल्या प्रमुख मागणीमध्ये बेळगाव सीमाप्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला ताकद मिळाली आहे.- दीपक दळवी,अध्यक्ष, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीगेली ६३ वर्षे सीमाप्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मराठा मूकमोर्चाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली जात आहे. त्यामुळे नक्कीच सीमाप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच बेळगांवसह आसपासच्या गावांतील हजारो मराठाबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत.- गुणवंत पाटील,प्रवक्ता, बेळगाव सकल मराठा समाज