शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार एकर शेती पाण्यापासून वंचित

By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST

सातेरी-महादेव डोंगर परिसर : पाण्यासाठी तलावांच्या उभारणीची गरज, कोरडवाहू जमिनीला कायमस्वरूपी पाणी हवे

शिवराज लोंढे -सावरवाडी -‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेचा उडालेला बोजवारा... ना पाझर तलावांची उभारणी, ना पाणी योजनेचे प्रकल्प.... नैसर्गिक पाण्याचे स्रोत असूनही केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे सातेरी-महादेव (ता. करवीर) या ऐतिहासिक डोंगर भागातील गेली ६६ वर्षे पाच हजार एकर शेती पाण्यापासून वंचित राहिलेली आहे. पाण्याची सोय अजूनही उपलब्ध झाली नसल्यामुळे शेतीची उत्पादनक्षमता घटली गेली.परिसरातील २० गावांचा समावेश असलेल्या परिसरात भौगोलिक दृष्टिकोनातून पाच हजार एकर पडीक जमिनीला कायमस्वरूपी पाणी मिळत नसल्यामुळे उत्पादन क्षमता घटली आहे.डोंगर भागातील शेती ही पावसावर अवलंबून आहे. या परिसरात प्रामुख्याने पावसाळ्यात नाचणी, वरी, ज्वारी, भुईमूग, तूर, भात यासारखी पिके वर्षानुवर्षे घेतली जातात. शेतीला बारमाही पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास खुंटला आहे.सातेरी-महादेव डोंगरी भागाला शासनाने तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा दिला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ही पावसावर अवलंबून आहे. दऱ्या-खोऱ्याचा भाग असलेल्या या भागात पाझर तलावांची उभारणी झालेली नसल्यामुळे पाच हजार एकर शेती ओलिताखाली आणण्याचे स्वप्न भंगले आहे. धोंडेवाडी ते केकतवाडी, शिरोली दुमाला ते केकतवाडी, गणेशवाडी ते केकतवाडी, नरगेवाडी ते शिरोली, बेरकळवाडी ते सडोली, आदी गावांच्यामध्ये मोठमोठ्या दऱ्या आहेत; पण केंद्र व राज्य शासनाने या परिसरात पाझर तलाव उभारणीकडे दुर्लक्ष केले आहे. सातेरी-महादेव डोंगर भागात तलावांच्या उभारणीची खरी गरज आहे. डोंगरी भागातील शेतकऱ्यांनी शेती पाण्याखाली आणण्यासाठी लढ्यात उतरले पाहिजे. पाच हजार एकर शेती ओलिताखाली आणली, तर डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. पाण्यासाठी चळवळ उभारणे गरजेचे आहे. - राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्य व उद्योगपती