शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

पाच हजार एकर शेती पाण्यापासून वंचित

By admin | Updated: April 10, 2015 00:26 IST

सातेरी-महादेव डोंगर परिसर : पाण्यासाठी तलावांच्या उभारणीची गरज, कोरडवाहू जमिनीला कायमस्वरूपी पाणी हवे

शिवराज लोंढे -सावरवाडी -‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेचा उडालेला बोजवारा... ना पाझर तलावांची उभारणी, ना पाणी योजनेचे प्रकल्प.... नैसर्गिक पाण्याचे स्रोत असूनही केंद्र व राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे सातेरी-महादेव (ता. करवीर) या ऐतिहासिक डोंगर भागातील गेली ६६ वर्षे पाच हजार एकर शेती पाण्यापासून वंचित राहिलेली आहे. पाण्याची सोय अजूनही उपलब्ध झाली नसल्यामुळे शेतीची उत्पादनक्षमता घटली गेली.परिसरातील २० गावांचा समावेश असलेल्या परिसरात भौगोलिक दृष्टिकोनातून पाच हजार एकर पडीक जमिनीला कायमस्वरूपी पाणी मिळत नसल्यामुळे उत्पादन क्षमता घटली आहे.डोंगर भागातील शेती ही पावसावर अवलंबून आहे. या परिसरात प्रामुख्याने पावसाळ्यात नाचणी, वरी, ज्वारी, भुईमूग, तूर, भात यासारखी पिके वर्षानुवर्षे घेतली जातात. शेतीला बारमाही पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास खुंटला आहे.सातेरी-महादेव डोंगरी भागाला शासनाने तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा दिला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन ही पावसावर अवलंबून आहे. दऱ्या-खोऱ्याचा भाग असलेल्या या भागात पाझर तलावांची उभारणी झालेली नसल्यामुळे पाच हजार एकर शेती ओलिताखाली आणण्याचे स्वप्न भंगले आहे. धोंडेवाडी ते केकतवाडी, शिरोली दुमाला ते केकतवाडी, गणेशवाडी ते केकतवाडी, नरगेवाडी ते शिरोली, बेरकळवाडी ते सडोली, आदी गावांच्यामध्ये मोठमोठ्या दऱ्या आहेत; पण केंद्र व राज्य शासनाने या परिसरात पाझर तलाव उभारणीकडे दुर्लक्ष केले आहे. सातेरी-महादेव डोंगर भागात तलावांच्या उभारणीची खरी गरज आहे. डोंगरी भागातील शेतकऱ्यांनी शेती पाण्याखाली आणण्यासाठी लढ्यात उतरले पाहिजे. पाच हजार एकर शेती ओलिताखाली आणली, तर डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. पाण्यासाठी चळवळ उभारणे गरजेचे आहे. - राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्य व उद्योगपती