शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात एकाच कुटुंबात डेंग्यूचे पाच संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:03 IST

कोल्हापूर : मंगळवार पेठ, मंगेशकरनगर येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. याकडे महापालिकेच्या प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष ...

कोल्हापूर : मंगळवार पेठ, मंगेशकरनगर येथील एकाच कुटुंबातील पाचजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. याकडे महापालिकेच्या प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांमधून उमटत आहेत. आतापर्यंत शहरात डेंग्यूने पाचहून अधिक जणांचा बळी गेला आहे.महापालिका हद्दीत जूनमध्ये २९१ डेंग्यूचे रुग्ण आढळले. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात त्यात आणखी वाढ होऊन ती संख्या ४६८ पर्यंत गेली. आॅगस्ट महिन्यात त्यात घट होऊन ती संशयित रुग्णांची संख्या ३१५, सप्टेंबरमध्ये १५८ झाली. ग्रामीण भागात सद्य:स्थितीत डेंग्यूचे ४७ रुग्ण अशी एकूण १३९ रुग्णसंख्या आहे.मंगेशकरनगरात एकाच कुटुंबातील दोन महिला आणि तीन पुरुष अशा पाचजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. चार-पाच दिवसांपासून हे रुग्ण तापाने आजारी आहेत. त्यांतील चार रुग्ण हे घरी, तर एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.या परिसरात अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे. गटारींची स्वच्छता नाही, औषधांची फवारणी झाली नाही अथवा महापालिकेच्या कोणत्याही वैद्यकीय पथकाने तसेच नगरसेवकाने या भागाला भेट दिली नसल्याचे नागरिकांनी रविवारी सांगितले.शहरात प्रामुख्याने जून व जुलैमध्ये जवाहरनगर परिसरातील सासने-जमादार कॉलनी, सरनाईक वसाहतसह नेहरूनगर, कनाननगर या भागांत डेंग्यूची साथ होती. सध्या तेथील डेंग्यूची साथ कमी झाली आहे; पण डेंग्यूचा विळखा मंगेशकरनगर भागात अद्यापही असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.साडेदहा महिन्यांत डेंग्यूचे १३७८ रुग्णकोल्हापूर शहरात १ जानेवारी ते २७ आॅक्टोबर अखेर १३७८, तर ग्रामीण भागात ३९६ असे एकूण १७७४ डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.डेंंग्यूचे बळीतीन महिन्यांत कनाननगरातील शाळकरी मुलीचा, नेहरूनगर परिसरातील एकाचा तर दोन आठवड्यांपूर्वी पाटाकडील तालीम परिसरातील फुटबॉल खेळाडूचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे.