शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

शहरात पाच उड्डाणपूल, पाच भुयारी मार्ग वाहतूक समस्येवरील ‘मास्टर प्लॅन’ : पालकमंत्र्यांसमोर लवकरच प्रस्तावाचे सादरीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:56 IST

कोल्हापूर : अरूंद रस्ते, छोटे-छोटे चौक, पार्किंगचा उडालेला बोजवारा, अपूर्ण रिंगरोड, रस्त्यावर रेंगाळणारी वाहतूक यामुळे शहरातील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नावर उत्तर शोधण्याचे

भारत चव्हाण ।कोल्हापूर : अरूंद रस्ते, छोटे-छोटे चौक, पार्किंगचा उडालेला बोजवारा, अपूर्ण रिंगरोड, रस्त्यावर रेंगाळणारी वाहतूक यामुळे शहरातील वाहतुकीच्या गंभीर प्रश्नावर उत्तर शोधण्याचे प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिका आणि राज्य शासन यांनी सुरू केले आहेत. त्यातच भाग म्हणून शहरातील वर्दळीच्या विविध भागात पाच उड्डाणपूल तर पाच ठिकाणी भुयारी मार्गांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. लवकरच त्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर सादरीकरण केले जाईल, त्यांच्या काही सूचना असल्यास त्यानुसार बदल करून याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर मंजुरीला पाठविला जाणार आहे.

पाच महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयात शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी यावर पर्याय शोधून त्यावर काम सुरू करा, म्हणून सांगितले होते. बैठकीस वाई येथील गुरव असोसिएटचे संदीप गुरव आणि महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबतसुद्धा उपस्थित होते. गुरव आणि सरनोबत यांनी हे काम आव्हान म्हणून स्वीकारले आणि अवघ्या पाच महिन्यांच्या अभ्यासानंतर शहरात पाच ठिकाणी उड्डाणपूल तर पाच ठिकाणी भुयारी मार्गांचे आराखडे तयार केले. सध्या आराखडे तयार झाले असले तरी अजून त्याच्या खर्चाची अंदाजपत्रके तयार केलेली नसून त्याचे काम सुरू झाले आहे.वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदतशहरातील अरूंद रस्ते, वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न आणि त्यातून पुढे सरकणारी वाहतूक हा शहराला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा एक गंभीर प्रश्न आहे. त्यावर आजपर्यंत केवळ पोलीस खात्यानेच मार्ग काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यास महानगरपालिका प्रशासन अथवा राज्य शासन यांची म्हणावी तितकी साथ मिळाली नाही.परंतु आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच पुढाकार घेतला असून, त्यांनी नवीन वर्षात शहरातील उड्डाणपूल व भुयारी मार्गांना मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करून दिल्यास पुढील पन्नास वर्षांचा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. स्वत: पालकमंत्रीच या प्रकल्पाकरिता आग्रही असल्याने काही तरी चांगले घडेल, अशी अपेक्षा आहे.शहरातील नियोजित उड्डाणपूलरस्त्याचे नाव लांबी रुंदी प्रकारदाभोळकर चौक ते जनता बझार चौक ९५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गदाभोळकर चौक ते दसरा चौक २००० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गजोतिबा हॉटेल चौक ते कावळा नाका चौक २००० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गटाऊन हॉल ते जयंती नाला ७०० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गपापाची तिकटी ते रंकाळा टॉवर चौक २००० मीटर ८ मीटर एकेरी मार्गरस्त्याचे नाव लांबी रुंदी प्रकारसासने मैदान ते दाभोळकर कॉर्नर १५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गखासबाग मैदान चौक १५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गपद्माराजे गर्ल्स हायस्कू ल चौक १५० मीटर ८ मीटर दुहेरी मार्गबी. टी. कॉलेज चौक शाहूपुरी १५० मीटर ४ मीटर एकेरी मार्गविरोधाची भूमिका नकोचकोल्हापूर शहरात काही नवीन करायचे म्हटले की त्यास विरोध झालाच म्हणून समजा; तसा पूर्वानुभव अनेक कामात आलेला आहे. त्यामुळे या कामात तरी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. प्रकल्प काय आहे, रस्ते कसे होणार आहेत याची माहिती घेऊन अभ्यास करूनच मग त्यावर आपले काही म्हणणे असल्यास सादर करणे अपेक्षित आहे. अगदी सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका घेणे सोयीचे होणार नाही, आणि येणारा काळसुद्धा माफ करणार नाही. त्यामुळे चर्चा, संवाद आणि सामंजस्याची भूमिकाच हिताची ठरणार आहे.दाभोळकर कॉर्नर ते जनता बझार चौक या मार्गावर उड्डाणपूल झाल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाहतुकीचा भार बºयाच प्रमाणात हलका होणार आहे, तसेच स्टेशन रोडवरील वाहतूक कमी होईल, शिवाय पादचाºयांची रेल्वे लाईन ओलांडताना होणारी जीवघेणी कसरतही कायमची बंद होणार आहे.शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याने आणि रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्यामुळे एकाच वेळी सगळी कामे करता येणे अशक्य आहे; म्हणून निधी मिळेल तशी कामे करता यावीत म्हणून प्रत्येक कामाचे आराखडे, खर्चाची अंदाजपत्रके स्वतंत्रपणे केली जात आहेत.भास्करराव जाधव पुतळा (पाच बंगला) १५० मीटर ४ मीटर एकेरी मार्ग