शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

हत्तीच्या पाठलागातून पाच शेतकरी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:51 IST

बाजारभोगाव : जांभळी खोऱ्यात शुक्रवारी रात्री पुनरागमन केलेल्या टस्करने शनिवारी पहाटे गोठणेच्या जंगलातून मानवाडच्या दिशेने कूच केले. आढाववाडीतील शिवारात ...

बाजारभोगाव : जांभळी खोऱ्यात शुक्रवारी रात्री पुनरागमन केलेल्या टस्करने शनिवारी पहाटे गोठणेच्या जंगलातून मानवाडच्या दिशेने कूच केले. आढाववाडीतील शिवारात राखणीसाठी असलेल्या पाच शेतकºयांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. टस्करच्या पाठलागातून हे पाचही शेतकरी सुरक्षितरीत्या वाचले. टस्कर सोंडेने हलवून मचाण पाडत असताना उडी मारुन पळ काढताना आठ ते दहा फूट उंचीच्या बांधावरून पडल्याने पांडुरंग बारकू जाधव जखमी झाले.घटनास्थळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गव्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी आढाववाडीतील शेतकरी रात्री आपापल्या शेतातील मचाणावर मुक्कामाला असतात. सध्या थंडी पडू लागल्यामुळे आसपासच्या मचाणावरील शेतकरी परसा (शेकोटी) करून एकत्र गप्पा मारत बसतात. शनिवारी रात्रीही सत्तू बाळकू पाटील, पांडुरंग ज्ञानू जाधव, बाळकू धोंडू पाटील, चिमाजी लक्ष्मण पाटील, रोंगू बापू खापणे हे आढाववाडीच्या शिवारातील ‘भुत्या’ नावाच्या शिवारात आपापल्या मचाणावर राखणीसाठी गेले होते. पहाटे बोचºया थंडीमुळे ते सत्तू पाटील यांच्या मचाणाच्या बाजूला परसा पेटवून शेकत बसले होते, तर मचाणावर सत्तू पाटील बसले होते. त्यावेळी शेजारुन त्यांना ऊस मोडण्याचा कडाकड असा आवाज ऐकू आला. पाटील यांनी आवाजाच्या दिशेने प्रकाशझोत सोडताच त्यांना मचाणाच्या दिशेने चाल करून येणारा महाकाय हत्ती दिसला. त्यांनी खाली शेकत बसलेल्यांना सावध करताच ते पळाले, तर पाटील हे मचाणावरून उतरेपर्यंत हत्ती समोर उभा राहिला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी धूम ठोकली. हत्तीने त्यांचा सुमारे दोनशे मीटरपर्यंत पाठलाग केला.यानंतर टस्करने शेजारच्या पांडुरंग जाधव यांच्या मचाणाकडे कूच केले. त्यांनीही मचाणावरून उडी मारुन पळ काढला. टस्करने त्यांचाही पाठलाग केल्याने त्यांनी मोठ्या बांधावरून उडी घेतली. यात त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, हत्तीने सत्तू पाटील व पांडुरंग जाधव या दोघांच्याही मचाणावरील बिछाने दूरवर भिरकावले.पहाटे साडेसहाच्या सुमारास त्याने थठीच्या जंगलाशेजारील गणपती रामू पाटील, आनंदा बापू पाटील, धोंडिराम चंद्राप्पा पाटील यांच्या ऊसपिकाचे नुकसान केले.वनमजूर हिंदुराव पाटील, शामराव जाधव, नाथा कांबळे, आकाराम पाटील, शंकर पोवार यांनी रविवारी सकाळी नुकसानीचे पंचनामे केले. टस्कर चाल करू लागल्याने संपूर्ण जांभळी खोरा त्याच्या दहशतीखाली आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.‘काळ आला...पण वेळ नाही’टस्कर काळ बनून माझ्यासमोर उभा ठाकला होता, पण प्रसंगावधान राखत पळ काढला. काळ आला पण माझी वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया जखमी पांडुरंग जाधव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.