शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

हत्तीच्या पाठलागातून पाच शेतकरी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:51 IST

बाजारभोगाव : जांभळी खोऱ्यात शुक्रवारी रात्री पुनरागमन केलेल्या टस्करने शनिवारी पहाटे गोठणेच्या जंगलातून मानवाडच्या दिशेने कूच केले. आढाववाडीतील शिवारात ...

बाजारभोगाव : जांभळी खोऱ्यात शुक्रवारी रात्री पुनरागमन केलेल्या टस्करने शनिवारी पहाटे गोठणेच्या जंगलातून मानवाडच्या दिशेने कूच केले. आढाववाडीतील शिवारात राखणीसाठी असलेल्या पाच शेतकºयांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. टस्करच्या पाठलागातून हे पाचही शेतकरी सुरक्षितरीत्या वाचले. टस्कर सोंडेने हलवून मचाण पाडत असताना उडी मारुन पळ काढताना आठ ते दहा फूट उंचीच्या बांधावरून पडल्याने पांडुरंग बारकू जाधव जखमी झाले.घटनास्थळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गव्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी आढाववाडीतील शेतकरी रात्री आपापल्या शेतातील मचाणावर मुक्कामाला असतात. सध्या थंडी पडू लागल्यामुळे आसपासच्या मचाणावरील शेतकरी परसा (शेकोटी) करून एकत्र गप्पा मारत बसतात. शनिवारी रात्रीही सत्तू बाळकू पाटील, पांडुरंग ज्ञानू जाधव, बाळकू धोंडू पाटील, चिमाजी लक्ष्मण पाटील, रोंगू बापू खापणे हे आढाववाडीच्या शिवारातील ‘भुत्या’ नावाच्या शिवारात आपापल्या मचाणावर राखणीसाठी गेले होते. पहाटे बोचºया थंडीमुळे ते सत्तू पाटील यांच्या मचाणाच्या बाजूला परसा पेटवून शेकत बसले होते, तर मचाणावर सत्तू पाटील बसले होते. त्यावेळी शेजारुन त्यांना ऊस मोडण्याचा कडाकड असा आवाज ऐकू आला. पाटील यांनी आवाजाच्या दिशेने प्रकाशझोत सोडताच त्यांना मचाणाच्या दिशेने चाल करून येणारा महाकाय हत्ती दिसला. त्यांनी खाली शेकत बसलेल्यांना सावध करताच ते पळाले, तर पाटील हे मचाणावरून उतरेपर्यंत हत्ती समोर उभा राहिला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी धूम ठोकली. हत्तीने त्यांचा सुमारे दोनशे मीटरपर्यंत पाठलाग केला.यानंतर टस्करने शेजारच्या पांडुरंग जाधव यांच्या मचाणाकडे कूच केले. त्यांनीही मचाणावरून उडी मारुन पळ काढला. टस्करने त्यांचाही पाठलाग केल्याने त्यांनी मोठ्या बांधावरून उडी घेतली. यात त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, हत्तीने सत्तू पाटील व पांडुरंग जाधव या दोघांच्याही मचाणावरील बिछाने दूरवर भिरकावले.पहाटे साडेसहाच्या सुमारास त्याने थठीच्या जंगलाशेजारील गणपती रामू पाटील, आनंदा बापू पाटील, धोंडिराम चंद्राप्पा पाटील यांच्या ऊसपिकाचे नुकसान केले.वनमजूर हिंदुराव पाटील, शामराव जाधव, नाथा कांबळे, आकाराम पाटील, शंकर पोवार यांनी रविवारी सकाळी नुकसानीचे पंचनामे केले. टस्कर चाल करू लागल्याने संपूर्ण जांभळी खोरा त्याच्या दहशतीखाली आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.‘काळ आला...पण वेळ नाही’टस्कर काळ बनून माझ्यासमोर उभा ठाकला होता, पण प्रसंगावधान राखत पळ काढला. काळ आला पण माझी वेळ आली नव्हती, अशी प्रतिक्रिया जखमी पांडुरंग जाधव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.