शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

‘कृष्णे’त मासे मृत्युमुखी

By admin | Updated: April 14, 2017 23:44 IST

मळीमिश्रित पाणी : नदी दूषित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

उदगांव : शिरोळ तालुक्याची मुख्य जलवाहिनी असलेल्या कृष्णा नदीत गुरुवारी रात्री मळीमिश्रित पाणी सोडल्याने शुक्रवारी सकाळी कृष्णा नदीकाठावर हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीकाठावरील गावांना आता दूषित पाण्याचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी उदगाव ग्रामपंचायत व ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, ‘आंदोलन अंकुश’चे राकेश जगदाळे, अमर शिंदे, अविनाश पाटील, अक्षय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. शिवाय उदगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नदीकाठाची पाहणी करून प्रदूषण विभागाला लेखी निवेदन दिले. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री केदार, उपसरपंच शिवाजी कोळी, प्रकाश बंडगर, प्रेमनिहाल रांजणे, विजय कोळी, शुभम गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)माशांचा : खच१ सांगली-कोल्हापूर महामार्गावर असणाऱ्या कृष्णा नदीपात्रात मळीमिश्रित पाणी सोडल्याने नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे. २ नदीतील पाणी हिरवेगार बनले असून, हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथळी, उमळवाड, उदगाव, चिंचवाड परिसराच्या नदीकाठावर माशांचा मोठ्या प्रमाणात खच पडला होता. ३ सामाजिक कार्यकर्ते शीतल आंबी व सागर कदम यांनी प्रदूषण विभागाशी संपर्क साधल्यानंतर याठिकाणी प्रदूषण मंडळाच्या पथकाने पाहणी केली.