शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मळी मिसळल्याने कासारीतील मासे मृत

By admin | Updated: February 13, 2016 00:45 IST

‘दालमिया’चे पाणी : प्रदूषण मंडळाची कारखान्याला नोटीस; गावाचा पाणीपुरवठा बंद

पोर्ले तर्फ आळते : आसुर्ले - पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर्स) साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी ओढ्यामार्फत थेट कासारी नदीत मिसळल्याने पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. परिणामी, नदीपात्रात मृत माशांचा सडा पसरला आहे. काही मृत मासे ग्रामस्थांनी घरी नेले. तर काही मासे कुजण्याच्या अवस्थेत पाण्यावर तरंगत आहेत. पाणी प्रदूषित झाल्याने पन्हाळा शहरासह नदीकाठच्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या हंगामात मळी मिश्रित पाणी कासारी नदीत सोडण्याचा कंपनीने दुसऱ्यांदा प्रकार केला आहे. या प्रकाराबाबत प्रदूषण मंडळ फक्त कागदी घोडे नाचवित असून, प्रत्यक्षात कारवाई करीत नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.दत्त कारखान्याचे प्रक्रिया केलेले सांडपाणी लघूममध्ये साठविले जाते; परंतु कारखान्याच्या वाढीव विस्तारीकरणामुळे मळी मिश्रित पाणी साठविणे कंपनीसाठी डोकेदुखी झाले आहे. त्यामुळे रासायनिक युक्त पाणी शेतकऱ्यांना वापरण्यासाठी प्रवृत्त करतात. हेच मळी मिश्रित पाणी शेतीला देताना काहीअंशी ओढ्यात कारखान्याकडून सोडले जाते, असे कारखाना स्थळावरील ग्रामस्थांचे मत आहे. हे मळी मिश्रित पाणी ओढ्यामार्फत थेट कासारी नदीपात्रात मिसळते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात कारखान्याचा लघूम फुटून मळी मिश्रित पाणी या नदीत मिसळत होते. त्यावेळी पन्हाळ््याचे तहसीलदार, जीवन प्राधिकरण विभागाचे प्रमुख, प्रदूषण मंडळाच्या अधिकारी यांनी प्रदूषणाची पाहणी करून कंपनीला नोटीस बजावली होती. तरीही कंपनीने दुसऱ्यांदा मळी मिश्रित पाणी थेट नदीत सोडण्याचे धाडस केलेच कसे, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. प्रदूषण मंडळाने डिसेंबरमधील ओढ्यातील व नदीपात्रातील मळी मिश्रित पाण्याचे नमुने घेतले होते. ते चिपळूणच्या तपासणी शाळेत पाठविले होते; पण तेथून अहवाल आलाच नसल्याची माहिती आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी शेतीला मळी मिश्रित पाणी देण्याच्या प्रकारातून कारखान्याचे मळी मिश्रित पाणी जाधवाच्या ओढ्यामार्फत थेट कासारी नदीत मिसळले. त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होऊन काळे-निळे झाले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी यवलूज-पोर्ले दरम्यान धरणाजवळ मासे मेल्याचे दिसले.‘दालमिया’कडून पन्हाळ्याला टँकरने पाणीपुरवठा पन्हाळा : दत्त दालमिया साखर कारखान्याने कासारी नदीत सोडलेली मळी, मळीमिश्रित पाणी यामुळे उद्भवलेल्या पन्हाळ्यातील गंभीर पाणी प्रश्नाबाबत तहसीलदार रामचंद्र चोबे यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलाविलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अशोक कर्णिक व तांत्रिक विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी तेज नारायणसिंग यांनी यापुढे असे प्रकार होणार नसल्याचे लेखी पत्र देऊन जाहीर माफी मागितली. तसेच पन्हाळा येथील विशेष बैठकीत कारखान्याच्यावतीने कोणकोणते उपक्रम राबविले जातत याची माहिती दिली. यावेळी कारखान्याजवळील पडवळवाडी येथे शेतीला पाणी देण्याचा उपक्रम येत्या आठ ते दहा दिवसांत चालू होणार असून, मळी मिश्रित पाणी येथील सुमारे ६00 एकर शेतीला दिले जाणार असल्याचे कारखान्याचे तेज नारायण सिंग यांनी सांगितले. दरम्यान, कासारी नदी प्रदूषित झाल्याने पन्हाळा शहरासाठी पिण्याचे पाणी टँकरद्वारा कारखान्याच्यावतीने पुरविण्यात येणार आहे. डिसेंबर २0१५ मध्ये पन्हाळा शहरास सलग आठ दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. यावेळी जे टँकरद्वारा पाणी शहरास दिले गेले त्याचा खर्चही पन्हाळा नगर परिषदेस देण्याचे मान्य केले. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठविलेले पाण्याचे नमुन्याच उत्तर अद्यापही आले नसल्याने नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांनी कारखान्याला दोषी धरले आहे. यापूर्वीही कारवाई दोन वर्र्षांपूर्वी कंपनीचे मळी मिश्रित पाणी कासारी नदीत मिसळल्याने १३ दिवस कारखाना बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर मळीमिश्रित पाण्याचा एक थेंबही ओढ्याला सोडणार नाही, असा शब्द कंपनीने दिला होता. तरीसुद्धा कंपनीने यावर्षी दोनवेळा मळीमिश्रित पाणी सोडण्याचे धाडस केले आहे. दालमिया शुगर्सचे मळीमिश्रित पाणी कासारी नदीत मिसळण्याची पाहणी केली आहे. कंपनीला तीन दिवसांत याबाबत खुलासा करावा, अशी नोटीस बजावली आहे. जर यात हयगय झाली, तर कंपनीवर पुढील कारवाई केली जाईल. - जे. ए. कदम, प्रादेशिक विभाग प्रमुख, प्रदूषण मंडळ.