शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

मळी मिसळल्याने कासारीतील मासे मृत

By admin | Updated: February 13, 2016 00:45 IST

‘दालमिया’चे पाणी : प्रदूषण मंडळाची कारखान्याला नोटीस; गावाचा पाणीपुरवठा बंद

पोर्ले तर्फ आळते : आसुर्ले - पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर्स) साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी ओढ्यामार्फत थेट कासारी नदीत मिसळल्याने पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. परिणामी, नदीपात्रात मृत माशांचा सडा पसरला आहे. काही मृत मासे ग्रामस्थांनी घरी नेले. तर काही मासे कुजण्याच्या अवस्थेत पाण्यावर तरंगत आहेत. पाणी प्रदूषित झाल्याने पन्हाळा शहरासह नदीकाठच्या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या हंगामात मळी मिश्रित पाणी कासारी नदीत सोडण्याचा कंपनीने दुसऱ्यांदा प्रकार केला आहे. या प्रकाराबाबत प्रदूषण मंडळ फक्त कागदी घोडे नाचवित असून, प्रत्यक्षात कारवाई करीत नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.दत्त कारखान्याचे प्रक्रिया केलेले सांडपाणी लघूममध्ये साठविले जाते; परंतु कारखान्याच्या वाढीव विस्तारीकरणामुळे मळी मिश्रित पाणी साठविणे कंपनीसाठी डोकेदुखी झाले आहे. त्यामुळे रासायनिक युक्त पाणी शेतकऱ्यांना वापरण्यासाठी प्रवृत्त करतात. हेच मळी मिश्रित पाणी शेतीला देताना काहीअंशी ओढ्यात कारखान्याकडून सोडले जाते, असे कारखाना स्थळावरील ग्रामस्थांचे मत आहे. हे मळी मिश्रित पाणी ओढ्यामार्फत थेट कासारी नदीपात्रात मिसळते. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात कारखान्याचा लघूम फुटून मळी मिश्रित पाणी या नदीत मिसळत होते. त्यावेळी पन्हाळ््याचे तहसीलदार, जीवन प्राधिकरण विभागाचे प्रमुख, प्रदूषण मंडळाच्या अधिकारी यांनी प्रदूषणाची पाहणी करून कंपनीला नोटीस बजावली होती. तरीही कंपनीने दुसऱ्यांदा मळी मिश्रित पाणी थेट नदीत सोडण्याचे धाडस केलेच कसे, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. प्रदूषण मंडळाने डिसेंबरमधील ओढ्यातील व नदीपात्रातील मळी मिश्रित पाण्याचे नमुने घेतले होते. ते चिपळूणच्या तपासणी शाळेत पाठविले होते; पण तेथून अहवाल आलाच नसल्याची माहिती आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी शेतीला मळी मिश्रित पाणी देण्याच्या प्रकारातून कारखान्याचे मळी मिश्रित पाणी जाधवाच्या ओढ्यामार्फत थेट कासारी नदीत मिसळले. त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रदूषित होऊन काळे-निळे झाले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी यवलूज-पोर्ले दरम्यान धरणाजवळ मासे मेल्याचे दिसले.‘दालमिया’कडून पन्हाळ्याला टँकरने पाणीपुरवठा पन्हाळा : दत्त दालमिया साखर कारखान्याने कासारी नदीत सोडलेली मळी, मळीमिश्रित पाणी यामुळे उद्भवलेल्या पन्हाळ्यातील गंभीर पाणी प्रश्नाबाबत तहसीलदार रामचंद्र चोबे यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलाविलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अशोक कर्णिक व तांत्रिक विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी तेज नारायणसिंग यांनी यापुढे असे प्रकार होणार नसल्याचे लेखी पत्र देऊन जाहीर माफी मागितली. तसेच पन्हाळा येथील विशेष बैठकीत कारखान्याच्यावतीने कोणकोणते उपक्रम राबविले जातत याची माहिती दिली. यावेळी कारखान्याजवळील पडवळवाडी येथे शेतीला पाणी देण्याचा उपक्रम येत्या आठ ते दहा दिवसांत चालू होणार असून, मळी मिश्रित पाणी येथील सुमारे ६00 एकर शेतीला दिले जाणार असल्याचे कारखान्याचे तेज नारायण सिंग यांनी सांगितले. दरम्यान, कासारी नदी प्रदूषित झाल्याने पन्हाळा शहरासाठी पिण्याचे पाणी टँकरद्वारा कारखान्याच्यावतीने पुरविण्यात येणार आहे. डिसेंबर २0१५ मध्ये पन्हाळा शहरास सलग आठ दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. यावेळी जे टँकरद्वारा पाणी शहरास दिले गेले त्याचा खर्चही पन्हाळा नगर परिषदेस देण्याचे मान्य केले. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठविलेले पाण्याचे नमुन्याच उत्तर अद्यापही आले नसल्याने नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांनी कारखान्याला दोषी धरले आहे. यापूर्वीही कारवाई दोन वर्र्षांपूर्वी कंपनीचे मळी मिश्रित पाणी कासारी नदीत मिसळल्याने १३ दिवस कारखाना बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर मळीमिश्रित पाण्याचा एक थेंबही ओढ्याला सोडणार नाही, असा शब्द कंपनीने दिला होता. तरीसुद्धा कंपनीने यावर्षी दोनवेळा मळीमिश्रित पाणी सोडण्याचे धाडस केले आहे. दालमिया शुगर्सचे मळीमिश्रित पाणी कासारी नदीत मिसळण्याची पाहणी केली आहे. कंपनीला तीन दिवसांत याबाबत खुलासा करावा, अशी नोटीस बजावली आहे. जर यात हयगय झाली, तर कंपनीवर पुढील कारवाई केली जाईल. - जे. ए. कदम, प्रादेशिक विभाग प्रमुख, प्रदूषण मंडळ.