शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

पदवीचे पहिल्या वर्षीचे प्रवेश रखडणार

By admin | Updated: June 4, 2015 00:03 IST

शिवाजी विद्यापीठ : संलग्नीकरण प्रमाणपत्रे महाविद्यालयांना अद्यापही दिलेली नाहीत

सुहास जाधव -पेठवडगाव -शिवाजी विद्यापीठाने संलग्नीकरण प्रमाणपत्र महाविद्यालयांना अद्यापही दिलेली नाहीत. त्यामुळे महाविद्यालयाच्या माहिती पुस्तकांची अद्यापही छपाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पदवीच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा फटका महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना बसण्याची चिन्हे आहेत. बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर झाला आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षाची माहिती पुस्तिका घेण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात येत आहेत. या माहिती पुस्तिकेमध्ये विद्यापीठाच्या संबंधित महाविद्यालयास परवानगी दिलेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र छापल्याशिवाय ते वितरित करू नये, अशी सूचना शिवाजी विद्यापीठाने दिली आहे.शिवाजी विद्यापीठाने एखादी सूचना केली की, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही तत्परता दाखविली जात नाही. याकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यंदा विविध अभ्यासक्रमांचे संलग्नीकरण प्रमाणपत्र विद्यापीठाने न दिल्यामुळे महाविद्यालयांनी माहिती पुस्तकांची छपाई केलेली नाही. पदवीची प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी साधारणत: आठ दिवसांचा कालावधी असतो. तर महाविद्यालये १५ जूनला सुरू करावीत, असेही निर्देश विद्यापीठाचे आहेत. हे संलग्नीकरण प्रमाणपत्र शुक्रवारी (दि. ५ ) मिळणार असल्याचे समजते. त्यानंतर महाविद्यालये अशा प्रमाणपत्रासह माहिती पुस्तिका छपाईला देणार. त्यानंतर माहिती पुस्तिका वितरित होणार. नंतर महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया राबवणार. या साऱ्यात बराच वेळ जाणार असल्याने महाविद्यालये १५ जूनपर्यंत सुरू होतील, याची शक्यता दिसत नाही. याबाबत विद्यापीठाच्या संलग्नीकरण विभागाशी संपर्क साधला असता, सगळ्याच महाविद्यालयांची कामे तत्काळ करण्यासाठी आग्रही असतात. मात्र, आम्हाला इतरही कामे असतात, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.शिवाजी विद्यापीठाकडून अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे महाविद्यालयांचे माहिती पत्रक, छपाई, विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी, त्यानंतर प्रवेश ही सर्व प्रक्रिया लांबणार आहे. - भगवान सोनद, सचिव, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटना.विद्यार्थ्यांच्या माहिती संकलनाचे कामसध्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती पुस्तके देण्याऐवजी विद्यार्थ्यांचे नाव, मिळालेले गुण, मोबाईल क्रमांक घेऊन पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची प्राथमिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना माहिती पुस्तकाअभावी महाविद्यालयाचे अंतरंग समजू शकत नाहीत. नुसतीच सर्व ठिकाणी चौकशी सुरू असल्याचे दिसून येते.