शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

पदवीचे पहिल्या वर्षीचे प्रवेश रखडणार

By admin | Updated: June 4, 2015 00:03 IST

शिवाजी विद्यापीठ : संलग्नीकरण प्रमाणपत्रे महाविद्यालयांना अद्यापही दिलेली नाहीत

सुहास जाधव -पेठवडगाव -शिवाजी विद्यापीठाने संलग्नीकरण प्रमाणपत्र महाविद्यालयांना अद्यापही दिलेली नाहीत. त्यामुळे महाविद्यालयाच्या माहिती पुस्तकांची अद्यापही छपाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पदवीच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा फटका महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना बसण्याची चिन्हे आहेत. बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर झाला आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षाची माहिती पुस्तिका घेण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात येत आहेत. या माहिती पुस्तिकेमध्ये विद्यापीठाच्या संबंधित महाविद्यालयास परवानगी दिलेल्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र छापल्याशिवाय ते वितरित करू नये, अशी सूचना शिवाजी विद्यापीठाने दिली आहे.शिवाजी विद्यापीठाने एखादी सूचना केली की, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही तत्परता दाखविली जात नाही. याकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यंदा विविध अभ्यासक्रमांचे संलग्नीकरण प्रमाणपत्र विद्यापीठाने न दिल्यामुळे महाविद्यालयांनी माहिती पुस्तकांची छपाई केलेली नाही. पदवीची प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी साधारणत: आठ दिवसांचा कालावधी असतो. तर महाविद्यालये १५ जूनला सुरू करावीत, असेही निर्देश विद्यापीठाचे आहेत. हे संलग्नीकरण प्रमाणपत्र शुक्रवारी (दि. ५ ) मिळणार असल्याचे समजते. त्यानंतर महाविद्यालये अशा प्रमाणपत्रासह माहिती पुस्तिका छपाईला देणार. त्यानंतर माहिती पुस्तिका वितरित होणार. नंतर महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया राबवणार. या साऱ्यात बराच वेळ जाणार असल्याने महाविद्यालये १५ जूनपर्यंत सुरू होतील, याची शक्यता दिसत नाही. याबाबत विद्यापीठाच्या संलग्नीकरण विभागाशी संपर्क साधला असता, सगळ्याच महाविद्यालयांची कामे तत्काळ करण्यासाठी आग्रही असतात. मात्र, आम्हाला इतरही कामे असतात, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.शिवाजी विद्यापीठाकडून अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे महाविद्यालयांचे माहिती पत्रक, छपाई, विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी, त्यानंतर प्रवेश ही सर्व प्रक्रिया लांबणार आहे. - भगवान सोनद, सचिव, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर संघटना.विद्यार्थ्यांच्या माहिती संकलनाचे कामसध्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती पुस्तके देण्याऐवजी विद्यार्थ्यांचे नाव, मिळालेले गुण, मोबाईल क्रमांक घेऊन पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेची प्राथमिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना माहिती पुस्तकाअभावी महाविद्यालयाचे अंतरंग समजू शकत नाहीत. नुसतीच सर्व ठिकाणी चौकशी सुरू असल्याचे दिसून येते.